शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

“देवेंद्र फडणवीसांमुळेच नद्यांच्या पूररेषेचा गोंधळ झाला अन् पुराचा फटका बसला”: मेधा पाटकर

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 8, 2021 19:29 IST

देवेंद्र फडणवीसांमुळेच (Devendra Fadnavis) नद्यांच्या पूररेषेचा गोंधळ झाला आणि सामान्यांना पुराचा फटका बसला, अशी टीका मेधा पाटकर यांनी केली आहे. 

कोल्हापूर: यंदाच्या वर्षी राज्यातील अनेक भागांना पुराचा मोठा फटका बसला. अगदी कोकणापासून ते विदर्भापर्यंत मुसळधार पावसामुळे जनजीवनावर मोठा परिणाम झाल्याचे पाहायला मिळाले. शेतकऱ्यांचे तर मोठेच नुकसान झाले. यातच आता पर्यावरण अभ्यासक आणि चळवळीतील कार्यकर्त्या मेधा पाटकर (Medha Patkar) यांनी नद्यांच्या पूररेषेवरून याधीच्या सरकारवर निशाणा साधला आहे. देवेंद्र फडणवीसांमुळेच (Devendra Fadnavis) नद्यांच्या पूररेषेचा गोंधळ झाला आणि सामान्यांना पुराचा फटका बसला, अशी टीका मेधा पाटकर यांनी केली आहे. 

कोल्हापुरात पत्रकारांशी बोलताना मेधा पाटकर म्हणाल्या की, पूररेषा आणि नदीची पाणीपातळी यामधील फरक माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना समजला नाही. त्यामुळे त्यांनी क्रिडाईने पूर रेषेच्या बाबतीत दिलेला अहवाल स्वीकारला गेला. याशिवाय निळ्या आणि लाल रेषेतील बांधकामांना सरसकट सूट दिली. त्यामुळेच पश्चिम महाराष्ट्रातील जिल्ह्यांना पुराचा सामना करावा लागत आहे, असे पाटकर यांनी सांगितले. 

देशातील परिस्थितीकडे मात्र दुर्लक्ष केले जात आहे

पंतप्रधान नरेंद्र मोदी जागतिक पातळीवर जाऊन पर्यावरणासंदर्भात मोठमोठी वक्तव्य करत आहेत. पण, त्याच वेळी देशात काय परिस्थिती सुरू आहेत याकडे मात्र दुर्लक्ष केले जात आहे. गेल्या दोन-तीन वर्षांपासून महापूराची तीव्रता वाढली आहे. या सर्वाला पूररेषेच्या बाबतीत बेजबाबदारपणे निर्णय घेणाऱ्या घेणारे देवेंद्र फडणवीस जबाबदार आहेत, असा घणाघात मेधा पाटकर यांनी केला. 

पूररेषेची नव्याने आखणी करणे गरजेचे 

किमान आतातरी पूररेषेची नव्याने आखणी करणे गरजेचे आहे. नद्यांमधील गाळ आणि वाळू काढून खोलीकरण करणे हे पूर्णता अशास्त्रीय आहे. यातून केवळ ठेकेदारांचे भले होणार आहे. त्यामुळे या निर्णयाचा पुनर्विचार व्हावा अशी अपेक्षा आहे, असे मेधा पाटकर यांनी म्हटले आहे. रायगड, चिपळून, कोल्हापूर आणि सांगली आलेल्या महापुराने भविष्यातील धोक्याचा इशारा दिला आहे. केवळ सरकारने नाही, तर आता यामधील अभ्यासकांनी अधिक लक्ष घालून पर्यावरणाची संरचना लक्षात घेऊन नियंत्रणासाठीचे शाश्वत उपाय अंगीकरण्यासाठी पुढाकार घेणे गरजेचे आहे, असे मेधा पाटकर यांनी सांगितले. 

टॅग्स :Medha Patkarमेधा पाटकरDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसkolhapurकोल्हापूरfloodपूर