शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत द्वेष्टा...! डोनाल्ड ट्रम्प यांचा भारतावर पहिला वार; ६ भारतीय ऑईल कंपन्यांवर निर्बंध लादले...
2
दोस्तीत कुस्ती! भारताला २५% टॅरिफचा धक्का देत डोनाल्ड ट्रम्प यांची पाकिस्तानशी हातमिळवणी; केली मोठी डील 
3
सलवार सूट घातला, त्यावर बुरखा चढवला अन् महिला डॉक्टरच्या घरात घुसून ७ वेळा चाकूने वार केला; नेमकं प्रकरण काय?
4
अरे ही कसली आई! १५ महिन्यांच्या लेकाला बस स्टँडवर सोडलं अन् इन्स्टा बॉयफ्रेंडसोबत पळाली
5
जुनी मैत्रिण ४ वर्षांनी पुन्हा भेटली, एकांतात भेटायला बोलावलं; बंद खोलीत तिला कायमचं संपवलं, मग... 
6
Video - क्रूरतेचा कळस! 'ती' जीव वाचवण्यासाठी हाता-पाया पडली पण 'तो' अमानुषपणे मारत राहिला
7
Video - पावसाचे थैमान! पुरामध्ये ३० तास अडकली शाळेची बस, १०० जणांना वाचवण्यात यश
8
ट्रम्प यांचा भारतावर २५ टक्के टॅरिफ बॉम्ब; १ ऑगस्टपासून लागू होणार आयात शुल्क, दंडही आकारणार
9
धक्कादायक! ४००० देऊन भीक मागणाऱ्यांचे स्पर्म गोळा केले, टेस्ट ट्यूब बेबीसाठी लाखो रुपये आकारून लोकांना फसवले! 
10
आजचे राशीभविष्य ३१ जुलै २०२५ : या राशीला धनलाभाचा दिवस, या राशीला काहीसा प्रतिकूल
11
भारत-पाक युद्ध तिसऱ्या देशाने थांबवले नाहीच; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी खोडला दावा
12
‘लाडकी बहीण’च्या लाभार्थी महिला कर्मचाऱ्यांवर कारवाई; राज्य सरकारने जारी केले आदेश
13
मालेगाव खटल्याचा निकाल आज; १७ वर्षांनी विशेष NIA कोर्ट निर्णय देणार, संपूर्ण देशाचे लक्ष
14
सर्वांत महाग-शक्तिशाली निसार उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण; पृथ्वीची प्रत्येक इंच जमीन मॅप करणार
15
“मोदी यांच्या आचारसंहिता भंगप्रकरणी कोर्टात जाणार, निवडणूक आयोगाची कारवाईस टाळाटाळ”: चव्हाण
16
कृषी खात्यातील कथित भ्रष्टाचाराची चौकशी करा!; सुरेश धस यांचे मुख्यमंत्र्यांना पुन्हा पत्र
17
डिझेल दर सवलतीमुळे एसटीचे ११.८ कोटी वाचणार; स्पर्धात्मक निविदेमुळे महामंडळाला फायदा
18
देशातील विमानांमध्ये सुरक्षेच्या २६३ त्रुटी! सर्वाधिक एअर इंडिया, तिसऱ्या क्रमांकावर इंडिगो
19
मुंडेंचे नाव आले अन् माझा छळवाद सुरू झाला: अण्णा डांगे; भाजपात फेरप्रवेश, मन केले मोकळे
20
अनिलकुमार पवार हे दादा भुसे यांचे नातेवाईक, शिफारशीने नियुक्ती; संजय राऊत यांचा आरोप

मंत्र्यांचेच टोलनाके : टोलविरोधी कृती समिती

By admin | Updated: July 9, 2014 01:05 IST

लोकप्रतिनिधींना इशारा : विधानसभेचे मैदान लांब नाही

कोल्हापूर : राज्यातील २०० कोटींपेक्षा कमी खर्चाच्या शासनाच्या खर्चातून झालेल्या रस्ते प्रकल्पातून जनतेला दिलासा देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. शासनाच्या निधीतून प्रकल्पच झाले नसल्याने ‘टोल रद्द’चा प्रश्नच येत नाही. राज्य शासनाला खऱ्याने जनतेबाबत कळवळा असेल तर सरसकट लहान-मोठे प्रकल्प टोलमुक्त करण्याचे धोरण आखावे. राज्यातील टोलवसुलीखाली मंत्री व वजनदार नेत्यांचे हात अडकले आहेत. अनेक टोलनाके नेत्यांच्या मालकीचे आहेत, असा आरोप करत सर्वपक्षीय टोलविरोधी कृती समितीचे निमंत्रक निवास साळोखे यांनी जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनी शासनाकडे ‘टोल रद्द’चा पाठपुरावा करावा, टोलबाबतचा ताकतुंबा न थांबविल्यास विधानसभेचे घोडे मैदान लांब नाही, असा सज्जड इशारा आज, मंगळवारी पत्रकाद्वारे दिला आहे. राज्य मंत्रिमंडळाने महाराष्ट्रातील टोलचे सुधारित धोरण आखत २०० कोटी किमतीच्या आतील रस्त्यांवरील ‘टोल बंद’ करण्याचे संकेत दिले आहेत. जे प्रकल्प शासनाच्या खर्चातून झालेले आहेत, अशा रस्त्यांवरील टोल रद्द केला जाणार आहे म्हणूनच टोलचा प्रश्न भिजत ठेवला जात आहे. खोटा देखावा करून राज्य शासन जनतेची फसवणूक करत आहे. ११ जानेवारी २०१४ रोजी दोन्ही मंत्र्यांनी टोल पंचगंगेत बुडविण्याची घोषणा केली होती. शासनाकडून मात्र कोल्हापूरच्या जनतेच्या साडेतीन वर्षांच्या लढ्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. पावसाने पंचगंगा कोरडी पडली आहे, अशावेळी कोरड्या नदीत टोल कसा बुडविणार? असा सवाल निवास साळोखे यांनी उपस्थित केला. (प्रतिनिधी)