शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
2
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
3
जम्मू-काश्मिरात अडकलेल्या पर्यटकांचे पहिले विमान आज मुंबईत येणार; ८३ जणांमध्ये कोणा-कोणाचा समावेश?
4
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
5
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
6
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
7
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
8
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
9
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा
10
‘जशास तसे’ व ‘लक्षात राहील’ असे उत्तर देणे; पाकिस्तानला धडा शिकवावा लागेलच, पण...
11
‘आपल्या’ इतकाच राग, तितकेच दु:ख ‘त्यांना’ही आहे; १९ वेळा दहशतवाद्यांनी मला उचलून नेले
12
स्वीडनमधील हे जोडपं देश सोडून पळालं, मात्र जाताना १५८ पिंप मानवी विष्ठा मागे ठेवले
13
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
14
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
15
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
16
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
17
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
18
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

निवडणूक काळात जप्त केलेला मुद्देमाल २४ तासांत परत, तक्रार निवारण समितीमुळे व्यावसायिकांना दिलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 22, 2024 16:49 IST

कोल्हापूर : निवडणूक काळात सोने, चांदी, रोख पैसे एका ठिकाणाहून दुसरीकडे घेऊन जाणे म्हणजे ते हमखास जप्त होणार हे ...

कोल्हापूर : निवडणूक काळात सोने, चांदी, रोख पैसे एका ठिकाणाहून दुसरीकडे घेऊन जाणे म्हणजे ते हमखास जप्त होणार हे आतापर्यंत ठरलेले असायचे. हा जप्त मुद्देमाल प्रशासनाच्या ताब्यातून सोडवण्यासाठी संबंधिताच्या अक्षरश: चपला झिजतात. मात्र, हाच मुद्देमाल आता २४ तासाच्या आत संबंधितांना मिळू लागला आहे. जिल्हा स्तरावर स्थापन करण्यात आलेल्या तक्रार निवारण समितीमुळे यात पारदर्शकता आली असून या काळात मौल्यवान वस्तूंचा व्यवसाय करणाऱ्यांनाही मोठा दिलासा मिळाला आहे.निवडणूक काळात मतदारांना मोठ्या प्रमाणात पैशाचे आमिष दाखवले जाते. त्यासाठी निवडणूक आयोग आचारसंहिता लागू झाल्यावर जागोजागी तपासणी नाके उभे करून वाहनांची तपासणी करते. यात सोने, चांदी, रोख पैसे व मौल्यवान धातू आढळल्यास थेट ते जप्त केले जातात. हे पैसे किंवा दागिने निवडणुकीसाठी नाही तर व्यावसायिक वापरासाठी नेले जात असल्याचा पुरावा दिल्याशिवाय परत मिळत नाहीत. यासाठी संबंधित व्यावसायिकाला ते परत मिळवण्यासाठी हजारदा हेलपाटे मारावे लागत.निवडणूक आयोगाने अशा प्रकारे पकडलेले दागिने, पैसे व्यापाऱ्याचे आहेत की राजकीय वापरासाठी वापरले जाणार आहेत. याची शहानिशा करण्यासाठी जिल्हानिहाय तक्रार निवारण समिती नेमली आहे. या समितीसमोर जप्त केलेला माल निवडणुकीसाठी वापरणार नसल्याचे सिद्ध केल्यास २४ तासाच्या आत तो परत मिळतो.

हुपरीतील व्यावसायिकांचा पुढाकारहुपरीतील चांदी व्यवसाय देशभर प्रसिद्ध आहे. येथील चांदीचे विविध प्रकारचे दागिने देशातील अनेक शहरांमध्ये पाठवले जातात. मात्र, निवडणूक काळात हे दागिने चेकपोस्टवर वारंवार पकडले जात असल्याने या काळात येथील व्यावसाायिकांना मोठा फटका बसत होता. याविरोधात आवाज उठवल्यानंतर प्रशासनाने तक्रार निवारण समिती सक्र य केली.

निवडणूक काळात जर मौल्यवान वस्तू किंवा रोख पैसे जप्त केले तर तक्रार निवारण समितीकडे जाऊन या वस्तूंचा निवडणुकीशी काहीही संबंध नाही याचे पुरावे द्यावे लागतात. त्याची पडताळणी करून यात तथ्य आढळले तर आपला माल आपणास २४ तासांत परत मिळतो. -मोहन खोत, अध्यक्ष, हुपरी चांदी हस्तकला उद्योग विकास फाउंडेशन.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरvidhan sabhaविधानसभाElectionनिवडणूक 2024