शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी दिला पदाचा राजीनामा
2
धनखड यांचा राजीनामा, आता पद कोण सांभाळणार, नव्या उपराष्ट्रपतींची निवड कशी होणार? अशी आहे संपूर्ण प्रक्रिया
3
शेतकऱ्याचा मुलगा ते उपराष्ट्रपती, अशी राहिली आहे जगदीप धनखड यांची वादळी कारकीर्द
4
संविधानाचे कलम ६७(अ) काय सांगते? ज्याअंतर्गत जगदीप धनखड यांनी दिला उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा
5
गोव्याहून इंदूरला येणाऱ्या इंडिगो विमानाचे आपत्कालीन लँडिंग, १४० जण करत होते प्रवास
6
सुनील तटकरे यांच्या सांगण्यावरूनच विजयकुमार घाडगे यांना मारहाण, मनोज जरांगे-पाटील यांचा आरोप
7
दातांवर उपचार करताना महिलेचे कानही झाले बरे, २० वर्षांपासून येत नव्हतं ऐकू, असा घडला चमत्कार
8
ऑनलाइन बेटिंग अ‍ॅपसंदर्भात ईडीची कारवाई, राणा दग्गुबाती अन् प्रकाश राजसह ४ कलाकारांना समन्स
9
'आखडू' पाकिस्तानची मस्ती भारत जिरवणार! BCCIच्या एका निर्णयाने पाकचे ११६ कोटी बुडणार...
10
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासह 'या' दोन विभूतींना भारतरत्न देण्यात यावा, राज्यसभेत मागणी
11
"स्पष्टीकरण दिलं तरी जे घडलं ते भूषणावह नाही"; कोकाटेंच्या व्हिडीओवर CM फडणवीस स्पष्टच बोलले
12
धक्कादायक! प्रफुल्ल लोढाविरोधात बलात्कार प्रकरणी बावधन पोलिस ठाण्यातही गुन्हा दाखल
13
मनोज जरांगेंनी घेतली महादेव मुंडे यांच्या कुटुंबाची भेट; बीडसह राज्यभर आंदोलनाचा दिला इशारा...
14
"...तर आम्ही तुम्हाला बरबाद करू’’, अमेरिकन सिनेटरची भारतासह या देशांना धमकी, कारण काय?  
15
अखेर वेळ ठरली; अधिवेशनात ऑपरेशन सिंदूरवर 25, तर आयकर विधेयकावर 12 तास चर्चा होणार
16
४१ वर्षांनंतर नवीन अवतारात येतेय Kinetic DX; याच महिन्यात होणार लॉन्च, किंमत...
17
१८९ लोकांचा बळी घेणाऱ्या मुंबई स्फोटातील आरोपींना सोडण्याचे आदेश; CM फडणवीस म्हणाले, "निकाल खूपच धक्कादायक"
18
केरळच्या महिलेनं शारजाहमध्ये स्वतःला संपवलं, हिंसक व्हिडिओ पाहून कंपनीने पतीला नोकरीवरून काढलं!
19
"महाराष्ट्र देशाच्या आणि जगाच्या क्रिएटर्स इकॉनॉमीचे केंद्र बनेल’’, देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला विश्वास
20
मुंबई ट्रेन बॉम्बस्फोट प्रकरण; सर्व आरोपींची निर्दोष सुटका, कुणावर काय आरोप? जाणून घ्या...

विळखा अमली पदार्थांचा: गल्ली बोळांत गांजाचा धूर; हरवला आयुष्याचा सूर

By उद्धव गोडसे | Updated: July 21, 2025 18:16 IST

दीड वर्षात ३४८ किलो गांजा जप्त, विद्यार्थ्यांसह कष्टकरी वर्गाला विळखा

उद्धव गोडसेकोल्हापूर : एमडी ड्रग्ज, चरस, कोकेनच्या तुलनेत परवडणारा, सहज उपलब्ध होणारा आणि दीर्घकाळ नशेत ठेवणारा अमली पदार्थ म्हणजे गांजा. जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यात पोहोचलेल्या गांजाने महाविद्यालयीन विद्यार्थी, गुन्हेगारी टोळ्या आणि कष्टाचे काम करणाऱ्या मजुरांना अक्षरश: विळखा घातला आहे. यातून अनेकांचे आयुष्य गांजाच्या धुराप्रमाणेच विरून गेल्याची वस्तुस्थिती आहे. मोठ्या प्रमाणात मागणी असल्याने याची रोजची उलाढाल लाखो रुपयांची आहे. गेल्या दीड वर्षात पोलिसांनी तब्बल ६ कोटी रुपयांचा ३४८ किलो गांजा जप्त केला. यावरून वापर झालेल्या गांजाचा अंदाज येऊ शकतो.गांजाची तस्करी आणि विक्री करणारे अनेक रॅकेट जिल्ह्यात सक्रिय आहेत. यात काही स्थानिक, तर काही परप्रांतीय टोळ्यांचा सहभाग आहे. प्रत्येक विक्रेत्याने स्वत:चे नेटवर्क तयार केले असून, त्यांची विक्रीची पद्धत गोपनीय असते. काही जणांकडून पान टपऱ्या, चिकन सिक्स्टी फाईव्हच्या गाड्यांवरून गांजाची विक्री केली जाते. काही विक्रेते ठरावीक वेळेत ठरावीक ठिकाणी येऊन थांबतात. त्याच वेळेत पोहोचलेले ग्राहक गांजाच्या पुड्या घेऊन काही क्षणात निघून जातात. अगदी गर्दीच्या ठिकाणीही त्यांचे व्यवहार शांतपणे सुरू असतात. ठिकाण बदलून विक्रीचे काम नियमित सुरू असते. शहरात छत्रपती शिवाजी पूल, शेंडा पार्क, सदर बाजार, तावडे हॉटेल, कावळा नाका, राजेंद्रनगर या परिसरात गांजाची विक्री होते.आसाम, ओडिसा, आंध्रप्रदेश, शिमोगा, बेळगाव, सोलापूर येथून गांजाचा पुरवठा होतो. गांजा पुरवणारे नेटवर्क वेगळे आणि त्याची होलसेल, किरकोळ विक्री करणारे नेटवर्क वेगळे असल्याचे पोलिसांच्या तपासात अनेकदा स्पष्ट झाले आहे. मात्र, दरवेळी यात नवीन टोळ्या सक्रिय होत असल्याने पोलिसांसमोर आव्हान निर्माण झाले आहे.

खरेदी १५ हजारांत, विक्री २० हजारांतअलमेडा आणि शिलावती या दोन प्रकारचा गांजा कोल्हापुरात मिळतो. याचा खरेदी दर प्रतिकिलो १३ ते १५ हजार रुपये आहे, तर विक्री दर २० ते २२ हजार रुपये आहे. मोठ्या प्रमाणात मागणी असल्याने विक्रेते मोठी कमाई करतात. सर्व व्यवहार रोखीनेच होतात. तस्करांच्या भाषेत दोन किलो २०० ग्रॅमच्या पॅकेटला पेटी म्हणतात. गांजासाठी ‘माल’, ‘चॉप्स’, ‘विड’, ‘मटेरियल’ असे शब्द वापरले जातात.

जिल्ह्यातही गांजाची शेतीजिल्ह्यातही काही ठिकाणी छुप्या पद्धतीने गांजाची शेती केली जाते. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने गेल्या चार महिन्यांत दोन ठिकाणी शेतात छापे टाकून कारवाई केली. शेळकेवाडी (ता. करवीर) येथून १५ किलो गांजा जप्त केला, तर माद्याळ (ता. कागल) येथील शेतातून १२ किलो गांजा जप्त केला. यावरून जिल्ह्यातील गांजाच्या शेतीची वस्तुस्थिती समोर येते.

गुन्हेगारी वाढण्यास कारणबहुतांश गुन्हेगार गांजाच्या नशेत असतात. गांजाच्या नशेतच ते गंभीर गुन्हे करतात. गेल्या वर्षी रंकाळा चौपाटीवर झालेल्या तरुणाच्या खुनातील सर्व आरोपी गांजाच्या नशेत होते, असे पोलिसांच्या चौकशीतून स्पष्ट झाले होते. हुतात्मा पार्क येथे गांजा ओढणाऱ्या तरुणांना हटकल्याने एका व्यक्तीचा खून झाला होता.

  • जप्त गांजा - ३४८ किलो
  • किंमत - ६ कोटी ९ लाख रुपये
  • विक्रेते अटक - १७०
  • ओढणारे अटक - ३१०

इतर अमली पदार्थांच्या तुलनेत गांजाची विक्री मोठ्या प्रमाणात आहे. जिल्ह्याबाहेरून येणारा गांजा रोखण्याचे प्रयत्न सुरू आहेत. काही रॅकेट उद्ध्वस्त करण्यात पोलिसांना यश आले आहे. - रवींद्र कळमकर, पोलिस निरीक्षक, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा