शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

मराठ्यांना सरसकट आरक्षण नको, भारत पाटणकरांचे परखड मत

By इंदुमती सूर्यवंशी | Updated: December 21, 2023 17:45 IST

कुणबी नोंदी असलेल्यांचाच अधिकार

कोल्हापूर : आपल्या देशात जातीनिहाय आरक्षण दिले जाते, मराठा समाज क्षुद्र नाही, त्यामुळे सरसकट सगळ्या मराठ्यांना कुणबी ठरवून आरक्षण देण्याची गरज नाही, कुणबी नोंदी सापडतील ते ओबीसी आहेत. त्यांना आरक्षण मिळाले पाहीजे असे परखड श्रमिक मुक्तीदलाचे ज्येष्ठ नेते डॉ. भारत पाटणकर यांनी गुरुवारी मांडले.कोल्हापुरात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. ते म्हणाले, सरसकट आणि टिकणारे आरक्षण ही बोगस चर्चा आहे. मराठ्यांना ओढून ताणून मागासलेले दाखवून आरक्षण देऊ नका. श्रमिक मुक्ती दलाच्या अधिवेशनात राज्यातील सात महत्वाच्या मुद्द्यांवर चर्चा व ठराव केले जाणार आहेत. त्यापैकी मराठा आरक्षण हा एक महत्वाचा विषय आहे.कुणबी, माळी आणि धनगर हे तीन भाऊ आहेत. पण मराठे क्षुद्र नव्हते, कुणबी क्षुद्र आहेत, १८८१ साली जिल्ह्यात २ लाख ९९ हजार ८७१ कुणबी व ६२ हजार २८७ मराठे होते. कुणबी नोंदी असलेल्यांना आरक्षणाचा लाभ मिळाला पाहीजे पण सरसकट सगळ्या मराठ्यांना कुणबी ठरवून त्यांच्यासाठी वेगळा कायदा करण्याची, आरक्षणाची गरज नाही.

इतिहास बदलण्याचा प्रयत्नते म्हणाले, राज्यकर्त्यांकडून इतिहास बदलण्याचे काम सुरू आहे. त्यांना बुद्धांना हद्दपार करायचा आहे, शिवाजी महाराजांचा नवा इतिहास लिहायचा आहे, मनुस्मृती पून्हा आणायची आहे. पौराणिक कथा म्हणजे इतिहास हे बिंबवले जात आहे. शिलालेख, कागदपत्रे, तत्कालीन दस्ताऐवज त्यांच्यासाठी महत्वाचे नाही. हे असेच करत शिकलेल्या तरुणाईच्या कानात शिसे ओतले जात आहे. शाहु, फुले आ्बेडकरांचे विचार मातीमोल करून जातीव्यवस्थेची उतरंड परत आणणे म्हणून समाजाने पुन्हा गुलामीत जाण्यासारखे आहे.

भिक्षा नको पाणी द्याते म्हणाले, शासनाचा आनंदाचा शिधा, मोफत धान्य म्हणजे भिक्षाच आहे. शेतकऱ्यांना ही भिक्षा नको पाणी द्या, वीज द्या, रोजगाराच्या संधी द्या. पण सरकार भांडवलदारांना सवलती आणि आम्हाला भिक्षा देत आहे. म्हणजे भांडवलदारांची हमाली करा किंवा कंपन्या म्हणतील तसे गुलाम व्हा असा पर्याय ठेवला आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरMaratha Reservationमराठा आरक्षण