शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यात भारताचा १ जवान शहीद, एकाची प्रकृती गंभीर, तर तिघं..
2
नरेंद्र मोदी हे आठवडामंत्री झाले आहेत, कारण...; शरद पवारांचा घणाघात
3
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने सहज जिंकला सामना, गुजरात टायटन्सला नमवून Mumbai Indians ला दिला धक्का 
4
२५ धावांत ६ विकेट्स ! RCB ने पायावर धोंडा मारला, जॉश लिटल GT चा नायक ठरला 
5
विराट कोहलीचा भीमपराक्रम! उत्तुंग षटकार पाहताच भारी होती अनुष्का शर्माची रिॲक्शन, Video
6
मोठी बातमी: लैंगिक शोषण आणि अपहरण प्रकरणात एचडी रेवन्ना यांना SITकडून अटक
7
विझण्यापूर्वी RCB ची फडफड! गुजरात टायटन्सविरुद्ध दाखवली 'पॉवर'; यंदाच्या पर्वात रचला इतिहास
8
अरे तुला फरक पडत नाही, मग कशाला उत्तर देतोस? सुनील गावस्कर संतापले, विराट कोहलीला सुनावले
9
PHOTOS : क्रिकेट म्हणजे जीवन आणि क्रिकेट हेच जीवन; IPL मध्ये जान्हवी कपूरचा जलवा!
10
'घेऊद्या तारीख, ईडीच्या प्रकरणात कुठे जामीन मिळतो'; न्यायाधिशांचे कोर्टरुमबाहेर धक्कादायक वक्तव्य
11
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
12
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
13
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
14
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
15
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
16
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
17
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
18
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

मराठा आरक्षणप्रश्नी क्रांतिदिनी कोल्हापूर बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2018 12:38 AM

कोल्हापूर : मराठा क्रांती संघटनेच्यावतीने ९ आॅगस्ट क्रांतिदिनी कोल्हापूर जिल्हा बंदची हाक देण्यात आली आहे. या दिवशी कोणतेही गुन्हे नोंदवा, ठोक मोर्चा काढणारच; तसेच यावेळी मंत्र्यांच्या गाड्या अडवून त्या फोडणार असल्याचा इशारा मराठा क्रांती संघटनेचे जिल्हाप्रमुख परेश भोसले यांनी पत्रकार परिषदेत दिला. दरम्यान, मोर्चाच्या जनजागृतीसाठी दि. ३१ जुलै रोजी सकाळी ...

कोल्हापूर : मराठा क्रांती संघटनेच्यावतीने ९ आॅगस्ट क्रांतिदिनी कोल्हापूर जिल्हा बंदची हाक देण्यात आली आहे. या दिवशी कोणतेही गुन्हे नोंदवा, ठोक मोर्चा काढणारच; तसेच यावेळी मंत्र्यांच्या गाड्या अडवून त्या फोडणार असल्याचा इशारा मराठा क्रांती संघटनेचे जिल्हाप्रमुख परेश भोसले यांनी पत्रकार परिषदेत दिला. दरम्यान, मोर्चाच्या जनजागृतीसाठी दि. ३१ जुलै रोजी सकाळी ११ वाजता ताराराणी चौकातून दुचाकी रॅली काढून अंबाबाई मंदिरात देवीचा गोंधळ घालून दंडवत घालण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.भोसले म्हणाले, मराठा समाजाचे लाखोंच्या संख्येने राज्यभर ५८ मूकमोर्चे निघाले; पण शासनाने ठोस निर्णय घेतले नाहीत; मराठा क्रांती संघटनेमध्ये राज्यातील विविध भागांत काम करणाऱ्या २८ मराठा संघटना एकत्र आल्या असून, त्यांच्यावतीने राज्यात ठोक मोर्चे काढण्यात येत आहेत. संयमाने काही मिळणार नसल्याची मानसिकता मराठा समाजाची झाली आहे. त्याकरिता ९ आॅगस्ट रोजी ‘कोल्हापूर जिल्हा बंंद’ची हाक देण्यात आली आहे. या दिवशी सकाळी ११ वाजता दसरा चौकातून जिल्हाधिकारी कार्यालयावर ठोक मोर्चा काढण्यात येणार आहे.आजपर्यंत नेत्यांनी मराठा समाजाचा फक्तमतासाठी उपयोग केला आहे; पण आता मराठा संघटना एकत्र आल्या असून मते कोणाला द्यायची याचाही संघटनाच निर्णय घेणार आहेत. दि. ९ आॅगस्ट रोजीच्या मोर्चाच्या तयारीसाठी उद्या, मंगळवारी (दि. २४) शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा करणार आहेत, त्यानंतर प्रत्येक महाविद्यालयात जाऊन युवकांना मोर्चात सहभागी होण्याचे आवाहन केले जाणार आहे. याशिवाय या मोर्चात रिक्षा व्यावसायिक, चारचाकी वाहने, लॉरी, शिक्षण संस्था बंद ठेवून मोर्चात सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात येणार आहे.या पत्रकार परिषदेस, जिल्हा युवा प्रमुख मोहनराव मालवणकर, इचलकरंजी विधानसभा प्रमुख नितीन लायकर, सुनीता पाटील, निरंजन पाटील, संजय कुडळे, सुभाष पाटील, अमोल कल्याणकर, गोरख शिंदे, राजू सावंत,मेजर सतीश पाटील, राजमाता जिजाऊ ब्रिगेडच्या कार्यकर्त्या, आदी उपस्थित होते.सहभागी न होणाºया नेत्यांना श्रद्धांजलीक्रांतिदिनी होणाºया मोर्चामध्ये सत्तेतील लोकप्रतिनिधींनी सहभागी व्हावे, असे आवाहन केले आहे. जे लोकप्रतिनिधी मोर्चात अगर बंदमध्ये सहभागी होणार नाहीत, त्यांना भर चौकात श्रद्धांजली वाहण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.फक्त११ जणांना कर्जेआण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ हे मराठा समाजातील व्यक्तींना कर्ज मिळण्यासाठी निर्माण केल्याचे भासवले जात आहे; पण राज्यातून सुमारे दहा हजार कर्ज मागणीचे अर्ज आले असताना त्यांपैकी ११५ जणांना कर्जे देण्यात आली असून त्यामध्ये मराठा समाजातील ११ जणांचाच समावेश आहे.