शहरं
Join us  
Trending Stories
1
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
2
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
3
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकानांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
4
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
5
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
6
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
7
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
8
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
9
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
10
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
11
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
12
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
13
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
14
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
15
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
16
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
17
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
18
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
19
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
20
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
Daily Top 2Weekly Top 5

Maratha Reservation ...अन्यथा मराठाच निवडणुकीत तुमचा अंत करेल; हर्षवर्धन पाटील यांचा सरकारला इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 4, 2018 17:50 IST

काँग्रेसने सत्तेत असतानाच मराठा आरक्षणाबाबत वटहुकूम काढून घेतलेल्या निर्णयाचाच अध्यादेश भाजप सरकारने काढावा, असेही आवाहन माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी केले.

ठळक मुद्देकोल्हापुरातील मराठा आरक्षण ठिय्या आंदोलनास पाठिंबाआरक्षणाचा वटहुकूम आम्हीच काढला; आता तुम्ही अध्यादेश काढा

कोल्हापूर : मराठा समाज हा आरक्षणाच्या मागणीसाठी रस्त्यावर उतरला आहे. सरकारने त्याचा अंत पाहू नये; अन्यथा हाच समाज निवडणुकीत तुमचा अंत करील, असा इशारा माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी भाजप सरकारला दिला. काँग्रेसने सत्तेत असतानाच मराठा आरक्षणाबाबत वटहुकूम काढून घेतलेल्या निर्णयाचाच अध्यादेश भाजप सरकारने काढावा, असेही आवाहन त्यांनी यावेळी केले.मराठा आरक्षण मिळालेच पाहिजे, या मागणीसाठी कोल्हापुरात दसरा चौकात गेले अकरा दिवस ठिय्या आंदोलन सुरू आहे. शनिवारी माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी या ठिय्या आंदोलनात सहभाग नोंदवून पाठिंबा व्यक्त केला, त्याप्रसंगी ते बोलत होते.माजी मंत्री पाटील म्हणाले, मी कोल्हापूरचा पालकमंत्री असताना दहा वर्षांत कधीही कोणाचे आंदोलन दडपण्याचा प्रयत्न केला नाही. आम्ही सत्तेत असताना मराठा आरक्षणाबाबतचा वटहुकूम काढला; पण त्यासाठी इतर समाजाच्या आरक्षणाला धक्का लागू दिला नाही. महाराष्ट्रात  गरीब शेतकरी वर्ग आहे, आम्ही श्रीमंत वर्गासाठी आरक्षण मागत नाही. गरिबांच्या मुलांना शिक्षण आणि नोकरीत आरक्षण द्या.सर्व मराठा समाज आज रस्त्यावर उतरत आहे. सरकारने तातडीने निर्णय घ्यावा; अन्यथा जनताच येत्या निवडणुकीत तुमचा अंत करील, असाही इशारा यावेळी माजी मंत्री पाटील यांनी दिला. यावेळी देवस्थान समितीचे माजी अध्यक्ष गुलाबराव घोरपडे, मराठा महासंघाचे अध्यक्ष वसंतराव मुळीक, दिलीप देसाई, हर्षल सुर्वे, सचिन तोडकर, आदी उपस्थित होते.शाहू महाराजांचे अभिनंदनशाहू महाराज हे मुख्यमंत्री फडणवीस यांनी बोलाविलेल्या बैठकीसाठी गेले नसल्याबद्दल माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी त्यांचे अभिनंदन केले. आता कोणतेही शिष्टमंडळ आरक्षणाच्या मुद्द्यावर चर्चेला येणार नसल्याचे सांगून प्रथम मराठा समाजाला १६ टक्के आरक्षणाचा अध्यादेश काढा; मगच आम्ही आंदोलन मागे घेऊ, असेही ते म्हणाले.मग विरोध कोणाचा?सध्या मराठा समाज भडकला असताना पालकमंत्री चंद्रकांत पाटील हे आरक्षण देण्याबाबत कटिबद्ध असल्याचे सांगतात; तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे वचनबद्ध असल्याचे बोलतात. मग आरक्षणाला विरोध कोणाचा? असाही प्रश्न करून सरकारने मराठा समाजाला तातडीने आरक्षण मंजूर करून प्रश्न निकाली काढावा, असे सुनावले.

 

टॅग्स :Maratha Reservationमराठा आरक्षणkolhapurकोल्हापूर