शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प प्रशासनाचा नवा नियम! नवीन व्हिसा ऑर्डरनुसार, लठ्ठपणा किंवा मधुमेहामुळे अमेरिकेत प्रवेश मिळणार नाही; इतर आजारांचाही उल्लेख
2
धक्कादायक! ऑनलाइन क्रीम खरेदी केली, महिलेच्या शरीरावर सापासारखे व्रण; १० वर्षांत १२ लाख रुपये खर्च
3
हिवाळी अधिवेशन ८ डिसेंबरपासूनच, दोन आठवड्यांचे कामकाज; २८ नोव्हेंबरपासून सचिवालय नागपुरात, पत्र आले
4
अधिकाऱ्यांना वाचवण्याच्या नादात दोघांचा मृत्यू; सॅण्डहर्स्ट रेल्वे अपघातामध्ये मुलीचा मृत्यू; आई जखमी
5
सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही, अहवालात जो दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई, जमीन घोटाळ्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती
6
Women's World Cup : भारताच्या लेकींसह प्रेक्षकांनीही रचला इतिहास; ते पाहून ICC चा ऐतिहासिक निर्णय!
7
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
8
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
9
पाकिस्तानला बेकायदेशीर अणु कारवायांचा इतिहास, आम्ही ट्रम्प यांच्या विधानाची दखल घेतली: भारत सरकार
10
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
11
माझ्या नवऱ्याला महिन्यापासून दारु पाजून जरांगेविरुद्ध षडयंत्र रचलं; अमोल खुणेंच्या कुटुंबीयांनी सगळंच सांगितलं
12
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
13
IPL 2026 : डेफिनेटली! MS धोनी पुन्हा मैदानात उतरण्यास तयार; CSK च्या ताफ्यातील आतली गोष्ट आली समोर
14
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
15
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
16
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
17
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
18
Maharashtra Crime: तुकाराम स्वत:च लपून बसला आणि अपहरणाचा बनाव केला; पण असं का केलं?
19
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली
20
AI Industry: 'एआय'चा फुगा फुटू लागला? अमेरिकेमध्ये १.५ लाख लोकांनी नोकऱ्या गमावल्या; गुंतवणूकदारही झाले अलर्ट

Maratha Reservation : आत्महत्यांची वाट पाहू नका, उद्रेक होईल, नीतेश राणे यांचा सरकारला इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 7, 2018 17:54 IST

राज्यात मराठा आरक्षणासाठी होणाऱ्या आत्महत्या थांबवायच्या असतील तर तातडीने मराठ्यांना आरक्षण द्या. आणखी आत्महत्या होण्याची वाट पाहाल तर उद्रेक होईल आणि त्याची जबाबदारी सरकारवर राहील, अशा शब्दांत कॉँग्रेसचे आमदार नीतेश राणे यांनी मंगळवारी येथे पत्रकार परिषदेत राज्य सरकारला इशारा दिला. मागासवर्गीय आयोग बाजूला ठेवून सरकार आरक्षणाचा निर्णय घेऊ शकते; मात्र शिवसेना सत्तेत असल्यामुळे तसा निर्णय घेत नसल्याचा टोलाही त्यांनी लगावला.

ठळक मुद्देआत्महत्यांची वाट पाहू नका, उद्रेक होईलनीतेश राणे यांचा सरकारला इशारा

कोल्हापूर : राज्यात मराठा आरक्षणासाठी होणाऱ्या आत्महत्या थांबवायच्या असतील तर तातडीने मराठ्यांना आरक्षण द्या. आणखी आत्महत्या होण्याची वाट पाहाल तर उद्रेक होईल आणि त्याची जबाबदारी सरकारवर राहील, अशा शब्दांत कॉँग्रेसचे आमदार नीतेश राणे यांनी मंगळवारी येथे पत्रकार परिषदेत राज्य सरकारला इशारा दिला. मागासवर्गीय आयोग बाजूला ठेवून सरकार आरक्षणाचा निर्णय घेऊ शकते; मात्र शिवसेना सत्तेत असल्यामुळे तसा निर्णय घेत नसल्याचा टोलाही त्यांनी लगावला.आरक्षणाच्या बाबतीत राणे समितीने पर्याय दिले आहेत. त्यानुसार निर्णय न घेता राज्य सरकारने मागासवर्गीय आयोग नेमून वेळकाढूपणाचे धोरण स्वीकारले आहे. त्यावरून राज्यकर्त्यांची इच्छाशक्ती नसल्याचे स्पष्ट होते. जर मराठा समाजाला आरक्षण द्यायचेच असेल तर मग नोव्हेंबरपर्यंत तरी का वाट पाहता? आत्ताच का जाहीर करीत नाही? असा सवाल करीत राणे म्हणाले की, आर्थिक निकषांवर आधारित आरक्षण द्यावे, अशी भूमिका शिवसेनेने घेतली होती. आता शिवसेना सत्तेत आहे. मराठा समाजाला आरक्षण न देण्याचे तेही एक कारण असेल.राज्यभरात सुरू असलेल्या आंदोलनातून झालेल्या दगडफेक व तोडफोडप्रकरणी ज्यांचा काही संबंध नाही, अशा लोकांवर ३०७ सारखे गंभीर गुन्हे दाखल केले जात आहेत. पोलीस प्रशासन जर अशा प्रकारे आंदोलन हाताळणार असेल आणि राज्य सरकार आणखी आत्महत्यांची वाट पाहणार असेल तर राज्यात अधिक उद्रेक होईल, असा इशारा त्यांनी दिला.आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्यात परिस्थिती चिघळली असताना केतन तिरोडकर यांचे कशाला लाड करता? असा सवालही आमदार राणे यांनी केला. जर त्यांनी न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेमुळे समाजाला त्रास होत असेल तर त्याला बोलावून घेऊन याचिका मागे घ्यायला सांगा. त्यांच्याशी सेटलमेंट करा. यापूर्वी असा अनेक प्रकरणांत न्यायालयाबाहेर तडजोडी केल्या आहेत याकडेही त्यांनी लक्ष वेधले.मागासवर्गीय आयोगाला बाजूला ठेवून राज्य सरकारने आपल्या अधिकारात आरक्षणाचा निर्णय घ्यावा. आयोगाने उद्या उलटा अहवाल दिला तर काय करणार, हाही प्रश्न आहे. राणे समितीने घटनादुरुस्तीची गरज नाही, हे स्पष्ट केले आहे. मंत्रिमंडळ, विधिमंडळातसुद्धा निर्णय घेतला जाऊ शकतो, असेही आमदार राणे म्हणाले. 

 

टॅग्स :Maratha Reservationमराठा आरक्षणkolhapurकोल्हापूरNitesh Raneनीतेश राणे