शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

Maratha Reservation : आत्महत्यांची वाट पाहू नका, उद्रेक होईल, नीतेश राणे यांचा सरकारला इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 7, 2018 17:54 IST

राज्यात मराठा आरक्षणासाठी होणाऱ्या आत्महत्या थांबवायच्या असतील तर तातडीने मराठ्यांना आरक्षण द्या. आणखी आत्महत्या होण्याची वाट पाहाल तर उद्रेक होईल आणि त्याची जबाबदारी सरकारवर राहील, अशा शब्दांत कॉँग्रेसचे आमदार नीतेश राणे यांनी मंगळवारी येथे पत्रकार परिषदेत राज्य सरकारला इशारा दिला. मागासवर्गीय आयोग बाजूला ठेवून सरकार आरक्षणाचा निर्णय घेऊ शकते; मात्र शिवसेना सत्तेत असल्यामुळे तसा निर्णय घेत नसल्याचा टोलाही त्यांनी लगावला.

ठळक मुद्देआत्महत्यांची वाट पाहू नका, उद्रेक होईलनीतेश राणे यांचा सरकारला इशारा

कोल्हापूर : राज्यात मराठा आरक्षणासाठी होणाऱ्या आत्महत्या थांबवायच्या असतील तर तातडीने मराठ्यांना आरक्षण द्या. आणखी आत्महत्या होण्याची वाट पाहाल तर उद्रेक होईल आणि त्याची जबाबदारी सरकारवर राहील, अशा शब्दांत कॉँग्रेसचे आमदार नीतेश राणे यांनी मंगळवारी येथे पत्रकार परिषदेत राज्य सरकारला इशारा दिला. मागासवर्गीय आयोग बाजूला ठेवून सरकार आरक्षणाचा निर्णय घेऊ शकते; मात्र शिवसेना सत्तेत असल्यामुळे तसा निर्णय घेत नसल्याचा टोलाही त्यांनी लगावला.आरक्षणाच्या बाबतीत राणे समितीने पर्याय दिले आहेत. त्यानुसार निर्णय न घेता राज्य सरकारने मागासवर्गीय आयोग नेमून वेळकाढूपणाचे धोरण स्वीकारले आहे. त्यावरून राज्यकर्त्यांची इच्छाशक्ती नसल्याचे स्पष्ट होते. जर मराठा समाजाला आरक्षण द्यायचेच असेल तर मग नोव्हेंबरपर्यंत तरी का वाट पाहता? आत्ताच का जाहीर करीत नाही? असा सवाल करीत राणे म्हणाले की, आर्थिक निकषांवर आधारित आरक्षण द्यावे, अशी भूमिका शिवसेनेने घेतली होती. आता शिवसेना सत्तेत आहे. मराठा समाजाला आरक्षण न देण्याचे तेही एक कारण असेल.राज्यभरात सुरू असलेल्या आंदोलनातून झालेल्या दगडफेक व तोडफोडप्रकरणी ज्यांचा काही संबंध नाही, अशा लोकांवर ३०७ सारखे गंभीर गुन्हे दाखल केले जात आहेत. पोलीस प्रशासन जर अशा प्रकारे आंदोलन हाताळणार असेल आणि राज्य सरकार आणखी आत्महत्यांची वाट पाहणार असेल तर राज्यात अधिक उद्रेक होईल, असा इशारा त्यांनी दिला.आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्यात परिस्थिती चिघळली असताना केतन तिरोडकर यांचे कशाला लाड करता? असा सवालही आमदार राणे यांनी केला. जर त्यांनी न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेमुळे समाजाला त्रास होत असेल तर त्याला बोलावून घेऊन याचिका मागे घ्यायला सांगा. त्यांच्याशी सेटलमेंट करा. यापूर्वी असा अनेक प्रकरणांत न्यायालयाबाहेर तडजोडी केल्या आहेत याकडेही त्यांनी लक्ष वेधले.मागासवर्गीय आयोगाला बाजूला ठेवून राज्य सरकारने आपल्या अधिकारात आरक्षणाचा निर्णय घ्यावा. आयोगाने उद्या उलटा अहवाल दिला तर काय करणार, हाही प्रश्न आहे. राणे समितीने घटनादुरुस्तीची गरज नाही, हे स्पष्ट केले आहे. मंत्रिमंडळ, विधिमंडळातसुद्धा निर्णय घेतला जाऊ शकतो, असेही आमदार राणे म्हणाले. 

 

टॅग्स :Maratha Reservationमराठा आरक्षणkolhapurकोल्हापूरNitesh Raneनीतेश राणे