शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
2
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
3
आकाशदीपची फिफ्टी पाहून गिल-जड्डूला सेंच्युरीचं फिल! बॅटसह हेल्मेट उंचावण्याची केली डिमांड (VIDEO)
4
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
5
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
6
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
7
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
8
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
9
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
10
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
11
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
12
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
13
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
14
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
15
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
16
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
17
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
18
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
19
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
20
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!

फडणवीसांना मिळाली पवारांची 'पॉवर'; मुख्यमंत्रीपद झालं अधिकच भक्कम!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 28, 2018 11:33 IST

Maratha Kranti Morcha: राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि राज्यातील वजनदार नेते शरद पवार यांनी आज फडणवीसांना मोठाच आधार दिला.  

कोल्हापूरः मराठा आरक्षणासाठी आंदोलन पेटलं असताना मुख्यमंत्र्यांचा राजीनामा मागितला जात आहे. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांच्या राजकीय भवितव्याविषयी उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे. परंतु, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि राज्यातील वजनदार नेते शरद पवार यांनी आज फडणवीसांना मोठाच आधार दिला.   

'येत्या काळात निवडणुका आहेत, भाजपाने मुख्यमंत्री बदलला तर त्याचा आम्हाला फायदाच होईल', अशा शब्दांत शरद पवारांनीदेवेंद्र फडणवीस यांना अप्रत्यक्षपणे प्रमाणपत्रच दिलंय. फडणवीस चांगलं काम करताहेत, जनमानसांत त्यांची प्रतिमाही चांगली आहे, त्यामुळे त्यांना बदलणं भाजपासाठी धोक्याचं ठरू शकतं, असं पवारांनी सूचित केलं आहे. या 'बिटवीन द लाइन्स'मुळे फडणवीसांची 'लाइन क्लिअर' झाल्याचं राजकीय वर्तुळात बोललं जातंय. 

निवडणूक आली की पवारांना जात आठवते, असं म्हणणाऱ्या चंद्रकांत पाटील यांनी आधी जनतेतून निवडून येऊन दाखवावं, असा टोलाही त्यांनी हाणला. तोही देवेंद्र फडणवीस यांच्या पथ्यावर पडणाराच आहे. कारण, महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांचं भाजपातील वजन वाढलंय आणि ते मुख्यमंत्रीपदाचे दावेदार ठरू शकत असल्याची चर्चा काही दिवसांपासून रंगली आहे. 

काकासाहेब शिंदे या तरुणाच्या जलसमाधीनंतर सकल मराठा समाजाचे आंदोलन चिघळलं. आधी 'महाराष्ट्र बंद' आणि नंतर 'मुंबई बंद'ला हिंसक वळण लागलं. त्यानंतर, मुख्यमंत्र्यांवर दबाव आणण्याचे प्रयत्न मराठा क्रांती मोर्चा आणि विरोधकांकडून होत आहेत. झेपत नसेल तर पायउतार व्हा, असं म्हणत राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यासह अनेक नेत्यांकडून फडणवीसांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात येतेय. स्वाभाविकच, मुख्यमंत्री समर्थकांमध्ये सुरुवातीला अस्वस्थता निर्माण झाली होती. परंतु, रवी राणा यांच्यासह सहा अपक्ष आमदार फडणवीसांच्या पाठीशी उभे राहिले होते. मुख्यमंत्री बदलले तर पाठिंबा काढू, असा इशारा त्यांनी दिला होता. त्यानंतर आता शरद पवार यांनी तर मुख्यमंत्र्यांना 'सेफ झोन'मध्येच नेऊन ठेवलंय.   

मुख्यमंत्री बदलायचा की नाही, हे ठरवण्याचा अधिकार भाजपाला आहे. आम्हाला नाही. पण, त्यांनी मुख्यमंत्री बदलल्यास आम्हाला फायदाच होईल, अशी सूचक प्रतिक्रिया पवारांनी दिली. विनाकारण जातीय वाद निर्माण केला जात असल्याची टीका करतानाच, महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री बाळासाहेब खेर हे ब्राह्मण होते, अशी आठवणही त्यांनी करून दिली. 

राजीनामे देऊ नका!

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सरकारशी भांडा, राजीनामे देऊ नका, असा सल्ला शरद पवार यांनी मराठा आमदारांना दिला. १५ वर्षं सत्तेत होतात तेव्हा काय केलंत, असं अनेक जण विचारत आहेत. पण आम्ही मराठा समाजाला आरक्षण दिलं होतं, असंही त्यांनी नमूद केलं. उदयनराजे आणि संभाजीराजे यांनी मराठा आंदोलनाचं नेतृत्व करण्याची विनंती आंदोलक करत आहेत. पण, सरकार सर्वच पक्षांशी बोलत असल्यानं त्याची आवश्यकता नसल्याचंही पवार म्हणाले. 

टॅग्स :Maratha Reservationमराठा आरक्षणSharad Pawarशरद पवारDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसMaratha Kranti Morchaमराठा क्रांती मोर्चा