शहरं
Join us  
Trending Stories
1
इकडे विरोधक टीका करतायत; तिकडे आफ्रिकेचा निवडणूक आयोग पारदर्शक प्रणाली पाहण्यासाठी खासदारांना पाठविणार
2
बिहारमध्ये राडा! उपमुख्यमंत्र्यांच्या ताफ्यावर हल्ला; दुसरीकडे सीपीएम आमदाराला मारहाण, गाडी फोडली
3
Ravi Shastri On Shubman Gill : शुभमन गिल आधीच होतोय ट्रोल, त्यात शास्त्रींच्या कमेंटची भर, म्हणाले...
4
सैनिकी शाळेत १२ वर्षीय मुलाचा गूढ मृत्यू,'त्या' बंद दारामागे काय घडले?; बहिणीचा गंभीर आरोप
5
सोशल मीडियाच्या ट्रॉलिंगचा बळी; माफी मागितली तरी छळ थांबेना, तरुणाने अखेर जीवन संपवले
6
"14 तारखेला 11 वाजेपर्यंत लालू अँड कंपनीचा..."; अमित शाह स्पष्टच बोलले, घुसखोरांसंदर्भात काय म्हणाले?
7
Anil Ambani ED: अनिल अंबानींची पुन्हा चौकशी होणार, ED नं १४ नोव्हेंबरला बोलावलं; प्रकरण काय?
8
विजय देवराकोंडा-रश्मिका मंदाना 'या' महिन्यात लग्न करणार? काही दिवसांपूर्वीच झालेला साखरपुडा
9
बायकोला ब्रेन ट्युमर, नवऱ्याने मृत्यूच्या दारातून परत आणलं; मराठी रीलस्टार कपलच्या रिअल लाइफ स्टोरीवर येतोय साऊथ मुव्ही
10
भाजप कार्यकर्त्याने आधी दिल्लीत नंतर बिहारमध्ये मतदान केले; राहुल गांधींनंतर आप नेत्याने आरोप केला
11
Canada Visa Rules : कॅनडाने व्हिसा नियमांमध्ये केला मोठा बदल, भारतावर काय परिणाम होईल?
12
SBI नं रचला इतिहास, मार्केट कॅप १०० अब्ज डॉलर्सच्या पार; देशातील दिग्गजांच्या यादीत सामील
13
"माझ्या पप्पांना अडकवण्यात आलंय"; वडील जेलमध्ये, लेकीने अभ्यास सोडून केला प्रचार
14
Jara Hatke: चांदीचा वर्ख कसा तयार होतो माहितीय? वर्ख लावलेली मिठाई खावी की नाही? तुम्हीच ठरवा!
15
सोन्याकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलायला हवा? SBI ची मोठी मागणी, म्हणाले घरांमध्ये पडून असलेलं सोनं..
16
मोठी बातमी! पार्थ पवार जमीन व्यवहार प्रकरणी तहसीलदार सूर्यकांत येवले निलंबित
17
बिहार निवडणूक 2025: व्होटर स्लीपशिवाय मतदान नाही! सकाळी ६.३० वाजल्यापासून रांगेत असलेल्या महिलांना रोखले
18
चारित्र्यावर संशय! रस्त्यात दुसऱ्या तरुणासोबत बोलली म्हणून संतापलेल्या पतीने ब्लेडने कापले पत्नीचे नाक
19
याला म्हणतात ऑफर...! Tata च्या इलेक्ट्रिक कारवर ₹1.30 लाखांपर्यंतची सूट, Curvv EV अन् Punch EV वर मोठा डिस्काउंट
20
तो प्रवास ठरला अखेरचा..; प्रसिद्ध ट्रॅव्हल इन्फ्लुएंसर अनुनय सूदचे 32व्या वर्षी निधन

फडणवीसांना मिळाली पवारांची 'पॉवर'; मुख्यमंत्रीपद झालं अधिकच भक्कम!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 28, 2018 11:33 IST

Maratha Kranti Morcha: राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि राज्यातील वजनदार नेते शरद पवार यांनी आज फडणवीसांना मोठाच आधार दिला.  

कोल्हापूरः मराठा आरक्षणासाठी आंदोलन पेटलं असताना मुख्यमंत्र्यांचा राजीनामा मागितला जात आहे. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांच्या राजकीय भवितव्याविषयी उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे. परंतु, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि राज्यातील वजनदार नेते शरद पवार यांनी आज फडणवीसांना मोठाच आधार दिला.   

'येत्या काळात निवडणुका आहेत, भाजपाने मुख्यमंत्री बदलला तर त्याचा आम्हाला फायदाच होईल', अशा शब्दांत शरद पवारांनीदेवेंद्र फडणवीस यांना अप्रत्यक्षपणे प्रमाणपत्रच दिलंय. फडणवीस चांगलं काम करताहेत, जनमानसांत त्यांची प्रतिमाही चांगली आहे, त्यामुळे त्यांना बदलणं भाजपासाठी धोक्याचं ठरू शकतं, असं पवारांनी सूचित केलं आहे. या 'बिटवीन द लाइन्स'मुळे फडणवीसांची 'लाइन क्लिअर' झाल्याचं राजकीय वर्तुळात बोललं जातंय. 

निवडणूक आली की पवारांना जात आठवते, असं म्हणणाऱ्या चंद्रकांत पाटील यांनी आधी जनतेतून निवडून येऊन दाखवावं, असा टोलाही त्यांनी हाणला. तोही देवेंद्र फडणवीस यांच्या पथ्यावर पडणाराच आहे. कारण, महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांचं भाजपातील वजन वाढलंय आणि ते मुख्यमंत्रीपदाचे दावेदार ठरू शकत असल्याची चर्चा काही दिवसांपासून रंगली आहे. 

काकासाहेब शिंदे या तरुणाच्या जलसमाधीनंतर सकल मराठा समाजाचे आंदोलन चिघळलं. आधी 'महाराष्ट्र बंद' आणि नंतर 'मुंबई बंद'ला हिंसक वळण लागलं. त्यानंतर, मुख्यमंत्र्यांवर दबाव आणण्याचे प्रयत्न मराठा क्रांती मोर्चा आणि विरोधकांकडून होत आहेत. झेपत नसेल तर पायउतार व्हा, असं म्हणत राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यासह अनेक नेत्यांकडून फडणवीसांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात येतेय. स्वाभाविकच, मुख्यमंत्री समर्थकांमध्ये सुरुवातीला अस्वस्थता निर्माण झाली होती. परंतु, रवी राणा यांच्यासह सहा अपक्ष आमदार फडणवीसांच्या पाठीशी उभे राहिले होते. मुख्यमंत्री बदलले तर पाठिंबा काढू, असा इशारा त्यांनी दिला होता. त्यानंतर आता शरद पवार यांनी तर मुख्यमंत्र्यांना 'सेफ झोन'मध्येच नेऊन ठेवलंय.   

मुख्यमंत्री बदलायचा की नाही, हे ठरवण्याचा अधिकार भाजपाला आहे. आम्हाला नाही. पण, त्यांनी मुख्यमंत्री बदलल्यास आम्हाला फायदाच होईल, अशी सूचक प्रतिक्रिया पवारांनी दिली. विनाकारण जातीय वाद निर्माण केला जात असल्याची टीका करतानाच, महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री बाळासाहेब खेर हे ब्राह्मण होते, अशी आठवणही त्यांनी करून दिली. 

राजीनामे देऊ नका!

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सरकारशी भांडा, राजीनामे देऊ नका, असा सल्ला शरद पवार यांनी मराठा आमदारांना दिला. १५ वर्षं सत्तेत होतात तेव्हा काय केलंत, असं अनेक जण विचारत आहेत. पण आम्ही मराठा समाजाला आरक्षण दिलं होतं, असंही त्यांनी नमूद केलं. उदयनराजे आणि संभाजीराजे यांनी मराठा आंदोलनाचं नेतृत्व करण्याची विनंती आंदोलक करत आहेत. पण, सरकार सर्वच पक्षांशी बोलत असल्यानं त्याची आवश्यकता नसल्याचंही पवार म्हणाले. 

टॅग्स :Maratha Reservationमराठा आरक्षणSharad Pawarशरद पवारDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसMaratha Kranti Morchaमराठा क्रांती मोर्चा