शहरं
Join us  
Trending Stories
1
Sanjay Raut: "लोकशाहीच्या नावानं झुंडशाही सुरू" बिनविरोध निवडीवरून राऊत संतापले, दिला महत्त्वाचा इशारा!
2
Eknath Shinde: महायुतीचे उमेदवार कशामुळं बिनविरोध निवडून आले? एकनाथ शिंदेंनी सांगितलं त्यामागचं खरं कारण!
3
मतदानापूर्वीच महायुतीचं अर्धशतक! कोणत्या महापालिकेत किती उमेदवार बिनविरोध विजयी झाले? वाचा यादी
4
T20 World Cup 2026: क्विंटन डी कॉक, डेव्हिड मिलर, बेबी एबी; दक्षिण आफ्रिकेने उतरवला तगडा संघ
5
महापालिका निवडणुकीचे चित्र स्पष्ट! ७८ जागांवर ३८१ उमेदवार, अनेक प्रभागात चौरंगी-बहुरंगी लढत
6
"मुंबईचे लुटारू तुम्ही, रखवालदार आम्ही"; एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर नाव न घेता जहरी टीका
7
पनवेल महानगरपालिकेत मतदानाआधीच विजयाचा गुलाल, महायुतीचे तब्बल सात नगरसेवक बिनविरोध
8
Solapur BJP: सोलापुरात भाजपच्या दोन गटांत मोठा राडा, माजी नगरसेवकाचं कार्यालय फोडलं, नेमका वाद काय?
9
महाराष्ट्रात फक्त मराठीच सक्तीची, साहित्य संमेलनातून मुख्यमंत्र्यांचा स्पष्ट संदेश 
10
"...तर निकाल वेगळा लागला असता"; ठाकरे बंधू युतीवर देवेंद्र फडणवीसांनी मतांचं 'गणित' उलगडलं
11
Shreyas Iyerचे न्यूझीलंडविरूद्ध Team India मध्ये पुनरागमन शक्य, पण BCCIने ठेवली 'ही' एक अट
12
'राहुल गांधी अन् भारत विरोधी लॉबी...', उमर खालिदसाठी आलेल्या 'त्या' पत्रांवरुन भाजपची टीका
13
साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावरून मुख्यमंत्र्यांची फोनाफोनी; कुणाशी आणि काय बोलले स्वतःच सांगितलं!
14
मुंबईचा महापौर हिंदू होईल आणि तो मराठीच असेल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केलं स्पष्ट
15
आदित्य-अमित ठाकरेंकडून जाहीरनामा प्रसिद्ध; ७०० फुटांपर्यंत घरपट्टी माफ, महिलांना १५०० रुपये स्वाभिमान निधी
16
R Ashwin: "यंदाचा टी-२० विश्वचषक कोणीही पाहणार नाही"; रविचंद्रन अश्विन असं का म्हणाला?
17
स्विगी, झोमॅटो सारख्या कंपन्यांच्या डिलिव्हरी बॉईजना सुरक्षा मिळणार! 'या' अटी पूर्ण कराव्या लागतील; नवीन नियम जारी
18
राहुल नार्वेकरांचा Video व्हायरल, "माझ्याशी पंगा घेताय.."; हरिभाऊ राठोड यांनीही केले गंभीर आरोप
19
ठाण्यात एकाच घरात दोन पक्ष! मुलगा शिंदेसेनेतून, आई राष्ट्रवादी (शरद पवार) कडून आमने-सामने
20
Shrejal Guleria : अभिमानास्पद! वडील सैन्यात सुभेदार, लेक बनली फ्लाइंग ऑफिसर; तिसरी पिढी देशसेवेसाठी सज्ज
Daily Top 2Weekly Top 5

Maratha Kranti Morcha भावांनो... हिंसक मार्गाने आंदोलन नको, मराठा समाजातील नेत्यांचे आवाहन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2018 18:36 IST

हिंसक आंदोलनाच्या माध्यमातूनही ध्येयापर्यंत पोहोचता येणार नाही. आरक्षणाची मागणी व्यवहार्य असली तरी त्यासाठी कुणी हिंसक लढ्यासाठी भरीस घालत असेल तर सावध राहायला हवे. सरकारवर दबाव वाढवतानाच न्यायालयीन पातळीवर अधिक नियोजनबद्ध रीतीने लढण्याची गरज आहे, असे भावनिक आवाहन मराठा समाजातील जाणत्या नेत्यांनी केले आहे.

ठळक मुद्देभावांनो... हिंसक मार्गाने आंदोलन नको, नियोजनबद्ध रीतीने सारे लढूया मराठा समाजातील जाणत्या नेत्यांनी केले आवाहन

कोल्हापूर : हिंसक आंदोलनाच्या माध्यमातूनही ध्येयापर्यंत पोहोचता येणार नाही. आरक्षणाची मागणी व्यवहार्य असली तरी त्यासाठी कुणी हिंसक लढ्यासाठी भरीस घालत असेल तर सावध राहायला हवे. सरकारवर दबाव वाढवतानाच न्यायालयीन पातळीवर अधिक नियोजनबद्ध रीतीने लढण्याची गरज आहे, असे भावनिक आवाहन मराठा समाजातील जाणत्या नेत्यांनी केले आहे.औरंगाबाद जिल्ह्यात आरक्षणाच्या मागणीसाठी काकासाहेब शिंदे या तरुणाने जलसमाधी घेतली. बुधवारीही दिवसभर या आंदोलनाचे हिंसक पडसाद राज्याच्या अनेक भागांत उमटले. ते पाहून हा आंदोलनाचा मार्ग नाही, माझ्या प्रिय मराठा भावांनो आणि बहिणींनो, या हिंसक मार्गाने जाऊ नका, असे भावनिक आवाहन या नेत्यांनी केले आहे.

त्यासंबंधीची भावना ज्येष्ठ नेते प्रा. एन. डी. पाटील, उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश बी. एन. देशमुख, ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार, ज्येष्ठ विचारवंत डॉ. आ. ह. साळुंखे, कष्टकरी चळवळीचे नेते डॉ. भारत पाटणकर, बीव्हीजी ग्रुपचे अध्यक्ष हनुमंत गायकवाड, ज्येष्ठ कवी डॉ. विठ्ठल वाघ, ज्येष्ठ साहित्यिक रंगनाथ पठारे, ज्येष्ठ पत्रकार प्रताप आसबे, ज्ञानेश महाराव, माजी कुलगुरू डॉ. सुधीर गव्हाणे, अभ्यासक व वक्ते श्रीमंत कोकाटे, कथाकार आणि नाटककार जयंत पवार, अभिनेते सयाजी शिंदे, पत्रकार व साहित्यिक विजय चोरमारे, प्रकल्पग्रस्तांचे नेते संपत देसाई, नाटककार, दिग्दर्शक संतोष पवार आणि सामाजिक कार्यकर्त्या मेघा पानसरे यांनी निवेदनाद्वारे हे आवाहन केले आहे.त्यात म्हटले आहे,‘मराठा समाजाने सनदशीर मार्गाने केलेल्या शक्तिप्रदर्शनाची सरकारने योग्य दखल घेतली नाही. मराठा समाजाच्या भावना समजून घेण्यात सरकार कमी पडले; त्यामुळेच आंदोलनाला आजचे आक्रमक स्वरूप प्राप्त झाले आहे. हिंसक आंदोलनांमुळे वातावरण तापले तरी त्यातून शेवटी हाती काहीच लागत नाही. भावनिक मुद्द्यावरील आंदोलन मोठ्या उंचीवर पोहोचल्यासारखे वाटले तरी ते दीर्घकाळ टिकत नाही.

मराठा समाजाने आपल्या मागण्यांसाठी सरकारशी संघर्ष करायलाच हवा; परंतु त्यासाठी सनदशीर मार्गाने लढा द्यायला हवा. अ‍ॅट्रॉसिटीचा मुद्दा काढून मराठा-दलितांमध्ये, तसेच आरक्षणाच्या निमित्ताने मराठा-ओबीसींमध्ये तेढ वाढविण्याचे प्रयत्न केले जात आहेत. त्यापासून सावध राहिले पाहिजे; नाही तर महाराष्ट्राचे सामाजिक स्वास्थ्य बिघडविल्याचे पातक मराठा समाजाच्या माथी येईल.‘मराठा समाज हा महाराष्ट्रातील एक प्रमुख कर्ता आणि वडीलधारा समाज आहे; त्यामुळे समाजातील इतर घटकांप्रती त्याची जबाबदारीही मोठी आहे. विविध कारणांसह सरकारी धोरणांमुळे शेती उद्ध्वस्त झाली. त्याचा फटका प्रामुख्याने मराठा समाजाला बसला. अनेक शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या, शेकडो कुटुंबे उघड्यावर आली.

आर्थिक विपन्नावस्थेत ढकलल्या गेलेल्या मराठा समाजाला बाहेर काढण्यासाठी सरकारने मदतीचा हात दिलाच पाहिजे. त्यासाठी आरक्षणाची लढाई लढली पाहिजे असे कुणाला वाटत असेल तर त्यात चुकीचे नाही. मराठा समाजाच्या तरुणांमध्ये प्रचंड ऊर्जा आहे आणि त्या ऊर्जेचा वापर रचनात्मक कामासाठी व्हायला हवा. आपण कर्ते आहोत, तर आपली ऊर्जा व्यवस्था बदलण्यासाठी वापरायला हवी. आरक्षण गरजेचे वाटत असले तरी आपल्या दुखण्यांवर तेवढाच एक इलाज आहे, असे मानण्याचे कारण नाही.’

... तर ध्येयापर्यंत कसे पोहोचणार?जलसमाधी, आत्मदहन यांसारखे मार्ग अवलंबून आपल्याला ही लढाई अखेरपर्यंत नेता येणार नाही आणि हिंसक आंदोलनाच्या माध्यमातूनही ध्येयापर्यंत पोहोचता येणार नाही. नेतृत्वहीन आणि दिशाहीन आंदोलन चालवून काहीच पदरात पडणार नाही. आंदोलनाला हिंसक वळण लागले तर तो कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न बनतो आणि मग सरकारचे काम सोपे होते, हे लक्षात घ्यायला हवे.

टॅग्स :Maratha Kranti Morchaमराठा क्रांती मोर्चाkolhapurकोल्हापूर