शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

घाईमुळे अनेक ध्वज नियमबाह्य, अधिकारी तणावात

By समीर देशपांडे | Updated: August 11, 2022 12:03 IST

समीर देशपांडे कोल्हापूर ‘हर घर तिरंगा’ मोहिमेचे नियोजन अंतिम टप्प्यात आले असताना प्रशासकीय अधिकारी वेगळ्याच तणावात आहेत. एकीकडे घराघरावर ...

समीर देशपांडेकोल्हापूर ‘हर घर तिरंगा’ मोहिमेचे नियोजन अंतिम टप्प्यात आले असताना प्रशासकीय अधिकारी वेगळ्याच तणावात आहेत. एकीकडे घराघरावर ध्वज फडकवायचा आहे. परंतु तो शासकीय नियमानुसार असला पाहिजे. त्यामुळे घाई गडबडीत तयार केलेले नियमबाह्य ध्वज पुरवले जाऊ नयेत यासाठी प्रशासनाला डोळ्यात तेल घालून ध्वजांची तपासणी करावी लागत आहे.केंद्र शासनाने ‘हर घर तिरंगा’ची घोषणा गेल्या महिन्यात केल्यानंतर त्या दृष्टीने नियोजनासाठी बैठकांवर बैठकांचा सपाटा लावण्यात आला आहे. जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद, महापालिका, जिल्हा पोलीस प्रमुख या चार महत्त्वाच्या प्रशासकीय यंत्रणांचे स्वतंत्र नियोजन सुरू आहे. जिल्हा परिषदेच्या सर्व विभागप्रमुखांना याबाबत जबाबदारी देण्यात आली आहे. परंतु एवढ्या मोठ्या संख्येने ध्वज मिळवताना प्रशासनाची दमछाक होत आहे.जिल्हा प्रशासनाने पाच लाख ध्वजांची मागणीजिल्हा प्रशासनाने एकूण पाच लाख ध्वजांची मागणी विभागीय आयुक्त कार्यालयाकडे केली होती. त्यापैकी सोमवार अखेर ४ लाख ५ हजार ध्वज जिल्हा परिषदेकडे प्राप्त झाले असून ते ११ तालुक्यांकडे रवाना करण्यात आले आहेत. मंगळवारी आणखी एक लाख ध्वज उपलब्ध होणार आहेत. पाच साखर कारखान्यांनी ध्वज मागणी केली असून त्या त्या तालुक्यात ते पोहाच करण्यात आले आहेत.मागणी वाढल्यामुळे टंचाईसर्वच देशभरातून एकाचवेळी ध्वजांची मागणी वाढल्यामुळे मोठी टंचाई निर्माण झाली आहे. इचलकरंजीमध्येही अशा पध्दतीने ध्वज निर्मितीवर मर्यादा आल्या आहेत. तर कोल्हापूरसाठी सांगलीमध्ये ध्वज तयार करण्याचे काम वेगावले आहे. परंतु हे करत असताना खराब ध्वज येण्याचे प्रमाणही अधिक आहे.

नीट न कापलेले, काही ठिकाणी फाटलेलेपहिल्या टप्प्यात ग्रामपंचायत विभागाकडे ६० हजार ध्वज मिळाले होते. परंतु यातील अनेक ध्वज हे संहितेनुसार नव्हते. काही ध्वज खालच्या बाजूला फाटलेले होते. काही ध्वजांचा रंग एकमेकांमध्ये मिसळला होता. टीप उसवली होती. तीनही बाजूंनी शिलाई आवश्यक असताना ते मारली गेली नव्हती. काही ध्वज चुकीच्या पध्दतीने कापण्यात आले आहेत.

तालुका पातळीवर तपासणीचे काम

जिल्हा पातळीवर लाखो ध्वज तपासणीचे काम शक्य नसल्याने त्या त्या तालुक्यांमध्ये सर्व ध्वज तपासून वितरित करावे अशी सूचना सोमवारी मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण यांनी बारा तालुक्यांच्या गटविकास अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. कोणत्याही परिस्थितीमध्ये संहितेनुसारच असलेल्या ध्वजांचे वितरण करा, असे त्यांनी स्पष्टपणे सांगितले आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरIndependence Dayस्वातंत्र्य दिन