शहरं
Join us  
Trending Stories
1
Air India Plane Crash : अहमदाबाद विमान अपघातावर मोठी अपडेट; सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारला नोटीस पाठवली, AAIB अहवालाबाबत सांगितली ही बाब
2
डीमार्टने जीएसटी दर कमी केले नाहीत? पहिल्याच दिवशी ८,८५७ रुपयांचे बिल, किती लावला GST?
3
भारतीय IT कंपन्यांवर नवं संकट! ट्रम्प यांच्या एका निर्णयामुळे दरवर्षी होणार कोट्यवधींचा खर्च, नोकऱ्यांवर गदा?
4
Lamborghini Accident: भरधाव लॅम्बोर्गिनी दुभाजकावर धडकली; कोस्टल रोडवरील अपघातात, कोण चालवत होतं कार?
5
हुंड्यासाठी जावयाची क्रूरता! जमिनीसाठी पत्नीची केली हत्या, सासऱ्यालाही दिला विजेचा झटका
6
चिमुकली आई... आई... करत राहिली, लिव्ह इन पार्टनरने गर्लफ्रेंडच्या मुलीची हत्या केली  
7
Navratri 2025: नवरात्र हा शक्ती उपासनेचा काळ, दुर्गा सप्तशती ग्रंथ वाचनाने कोणते लाभ होतात?
8
नवरात्री २०२५: ९ गोष्टी अजिबात करू नका, नवदुर्गांची वक्रदृष्टी-अवकृपा संभव; चूक घडलीच तर...
9
ऐकावं ते नवलच! शोधून शोधून थकली पण सापडलाच नाही नवरा; मग स्वत:शीच केलं लग्न अन्...
10
Asia Cup 2025: भारत-पाकिस्तानचे संघ पुन्हा एकदा भिडणार? समजून घ्या IND vs PAKचे गणित
11
मनसे-शिवसेना युतीत जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरला; कोण किती जागा लढवणार? समोर आली माहिती
12
VIRAL VIDEO: चीनमधली खूप रील्स पाहिली असतील, पण भारतातील एअरपोर्टवर फूड डिलिव्हरी करणारा रोबो पाहिलात का?
13
Mumbai: सचिन तेंडुलकरच्या हस्ते दादरच्या शिवाजी पार्क जिमखान्याचे लोकार्पण!
14
Navratri 2025: नवरात्रीच्या पहिल्या दिवशी करूया स्मरण आणि मानसपूजन देवी शैलपुत्रीचे!
15
दुर्दैवी अंत! ज्याच्या इशाऱ्यावर 'वाघ' उठबस करायचा, त्याच मालकाला वाघाने टेन्शनमध्ये शिकार बनवलं
16
पाकिस्तानी सैन्याने त्यांच्याच देशात हवाई हल्ला केला, महिला मुलांसह ३० नागरिकांचा मृत्यू
17
ओबीसी आंदोलक नवनाथ वाघमारे यांची गाडी अज्ञात व्यक्तीने पेटवली; जालन्यातील घटना
18
"हो आम्ही पालक झालो आहोत", अखेर भूषणने उलगडलं केतकीसोबतच्या 'त्या' फोटोचं गुपित
19
पराभव दिसू लागताच पाकिस्तानी प्रेक्षक पळू लागले, भारतीय तरुणीने भर स्टेडियममध्ये डिवचले, म्हणाली...  

घाईमुळे अनेक ध्वज नियमबाह्य, अधिकारी तणावात

By समीर देशपांडे | Updated: August 11, 2022 12:03 IST

समीर देशपांडे कोल्हापूर ‘हर घर तिरंगा’ मोहिमेचे नियोजन अंतिम टप्प्यात आले असताना प्रशासकीय अधिकारी वेगळ्याच तणावात आहेत. एकीकडे घराघरावर ...

समीर देशपांडेकोल्हापूर ‘हर घर तिरंगा’ मोहिमेचे नियोजन अंतिम टप्प्यात आले असताना प्रशासकीय अधिकारी वेगळ्याच तणावात आहेत. एकीकडे घराघरावर ध्वज फडकवायचा आहे. परंतु तो शासकीय नियमानुसार असला पाहिजे. त्यामुळे घाई गडबडीत तयार केलेले नियमबाह्य ध्वज पुरवले जाऊ नयेत यासाठी प्रशासनाला डोळ्यात तेल घालून ध्वजांची तपासणी करावी लागत आहे.केंद्र शासनाने ‘हर घर तिरंगा’ची घोषणा गेल्या महिन्यात केल्यानंतर त्या दृष्टीने नियोजनासाठी बैठकांवर बैठकांचा सपाटा लावण्यात आला आहे. जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद, महापालिका, जिल्हा पोलीस प्रमुख या चार महत्त्वाच्या प्रशासकीय यंत्रणांचे स्वतंत्र नियोजन सुरू आहे. जिल्हा परिषदेच्या सर्व विभागप्रमुखांना याबाबत जबाबदारी देण्यात आली आहे. परंतु एवढ्या मोठ्या संख्येने ध्वज मिळवताना प्रशासनाची दमछाक होत आहे.जिल्हा प्रशासनाने पाच लाख ध्वजांची मागणीजिल्हा प्रशासनाने एकूण पाच लाख ध्वजांची मागणी विभागीय आयुक्त कार्यालयाकडे केली होती. त्यापैकी सोमवार अखेर ४ लाख ५ हजार ध्वज जिल्हा परिषदेकडे प्राप्त झाले असून ते ११ तालुक्यांकडे रवाना करण्यात आले आहेत. मंगळवारी आणखी एक लाख ध्वज उपलब्ध होणार आहेत. पाच साखर कारखान्यांनी ध्वज मागणी केली असून त्या त्या तालुक्यात ते पोहाच करण्यात आले आहेत.मागणी वाढल्यामुळे टंचाईसर्वच देशभरातून एकाचवेळी ध्वजांची मागणी वाढल्यामुळे मोठी टंचाई निर्माण झाली आहे. इचलकरंजीमध्येही अशा पध्दतीने ध्वज निर्मितीवर मर्यादा आल्या आहेत. तर कोल्हापूरसाठी सांगलीमध्ये ध्वज तयार करण्याचे काम वेगावले आहे. परंतु हे करत असताना खराब ध्वज येण्याचे प्रमाणही अधिक आहे.

नीट न कापलेले, काही ठिकाणी फाटलेलेपहिल्या टप्प्यात ग्रामपंचायत विभागाकडे ६० हजार ध्वज मिळाले होते. परंतु यातील अनेक ध्वज हे संहितेनुसार नव्हते. काही ध्वज खालच्या बाजूला फाटलेले होते. काही ध्वजांचा रंग एकमेकांमध्ये मिसळला होता. टीप उसवली होती. तीनही बाजूंनी शिलाई आवश्यक असताना ते मारली गेली नव्हती. काही ध्वज चुकीच्या पध्दतीने कापण्यात आले आहेत.

तालुका पातळीवर तपासणीचे काम

जिल्हा पातळीवर लाखो ध्वज तपासणीचे काम शक्य नसल्याने त्या त्या तालुक्यांमध्ये सर्व ध्वज तपासून वितरित करावे अशी सूचना सोमवारी मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण यांनी बारा तालुक्यांच्या गटविकास अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. कोणत्याही परिस्थितीमध्ये संहितेनुसारच असलेल्या ध्वजांचे वितरण करा, असे त्यांनी स्पष्टपणे सांगितले आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरIndependence Dayस्वातंत्र्य दिन