शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

माणगाव परिषदेचा शासनाला विसर, शताब्दी कार्यक्रमाकडे दुर्लक्ष; मंत्र्यांचे आश्वासन हवेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 22, 2022 15:52 IST

माणगाव येथे २१ व २२ मार्च १९२० रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर व छत्रपती शाहू महाराज यांच्या उपस्थितीत झालेल्या माणगाव परिषदेस १०२ वर्षे पूर्ण

अभय व्हनवाडे

रूकडी/माणगाव : माणगाव येथे २१ व २२ मार्च १९२० रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर व छत्रपती शाहू महाराज यांच्या उपस्थितीत झालेल्या माणगाव परिषदेस १०२ वर्षे पूर्ण झाली. मात्र याचा शताब्दी महोत्सव साजरा करण्याचा विसर राज्य शासनाला पडला आहे.

१९२० मध्ये छ. शाहू महाराजांच्या अध्यक्षतेखाली व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रमुख उपस्थितीत माणगाव परिषद झाली. त्याचा शतकमहोत्सव दिव्य-भव्य साजरा करायचे होते, यादृष्टीने पालकमंत्री सतेज पाटील, ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ व तत्कालीन जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी मार्च २०२० मध्ये बैठक घेतली होती. कार्यक्रमासाठी माणगाव फाटा येथे जागेची निश्चिती करून स्मारकसाठी १५९ कोटींचा निधी देण्याचा आराखडा तयार केला होता. पण कोरोनामुळे समारंभ लांबला आणि निधीलाही कात्री लागली.

परिषद झालेल्या परिसराचे सुशोभीकरणासाठी २ कोटी ३८ लाखांचा निधी मिळाला असून, यातील निधी डॉ. बाबासाहेब आंबेडकर लंडन येथे राहत असलेल्या घराची प्रतिकृती व माणगाव परिषदेचा होलिग्राफ, परिषद  परिसराचा सुशोभीकरण यासाठी खर्ची झाला. उर्वरित निधीचा थांगपत्ता नसून शतकमहोत्सवी समारंभ ही संपन्न झाला नाही.

माणगाव येथे पालकमंत्री सतेज पाटील, ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ व दौलत देसाई यांच्या बैठकीमध्ये शतकमहोत्सवी समारंभ दिमाखात साजरा करण्याचे ठरले होते. कोरोनामुळे हा समारंभ रखडला आता कोरोना संपल्यामुळे कार्यक्रम घेऊन निधी द्यावा. दलित समाजाने चार एकर जागा दिली आहे तोही प्रश्न सोडवावा. -अरुण शिंगे, अध्यक्ष, बौद्ध समाज माणगाव

टॅग्स :kolhapurकोल्हापूर