शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

भ्रष्ट मार्गाने दिलेली बढती 'मनपा'ने रद्द करावी

By admin | Updated: February 9, 2015 23:56 IST

लोकमत हेल्पलाईन : के.एम.टी.च्या संजय भोसले यांच्या विरोधात रामाणे यांची तक्रार

कोल्हापूर : के.एम.टी.मधील एका पदाधिकाऱ्याने मलिदा मिळविण्यासाठी अकरा कर्मचाऱ्यांना सरळसेवा भरतीद्वारे बढती दिली, परंतु औद्योगिक न्यायालयाने निवड प्रक्रिया रद्द केल्यानंतरही संजय शिवाजीराव भोसले या एकाच कर्मचाऱ्यास बढती दिली आहे. याबाबत संजय भोसले आणि तत्कालीन वरिष्ठ अधिकाऱ्यांनी के.एम.टी.सह महासभेची दिशाभूल केली आहे. भ्रष्ट आणि गैरमार्गाने त्यांना दिलेली बढती रद्द करावी, अशी मागणी मनपाचे सेवानिवृत्त कर्मचारी चंद्रकांत दत्तात्रय रामाणे यांनी ‘लोकमत’ हेल्पलाईनकडे केली आहे. संजय भोसले यांना दिलेली बढती कशी चुकीची आहे, याबाबत आपण दिलेले पुरावे आणि कागदपत्रे खोटी निघाली, तर मी महापालिकेच्या सेवानिवृत्तीच्या वेतनावर पाणी सोडायला तयार आहे, आणि जर ती खरी असेल तर भोसले यांना तत्काळ सध्याच्या ‘रचना व कार्यपद्धती’ या पदावरून खाली खेचून लिपिकपदावर बसवावे, असे आव्हान रामाणे यांनी दिले आहे.‘लोकमत हेल्पलाईन’शी बोलताना रामाणे म्हणाले, भोसले हे के.एम.टी.कडे लिपिक म्हणून नोकरीस लागले. पदवीधर नसलेल्या भोसले यांना नंतर अन्य अकरा कर्मचाऱ्यांसह अकौटंट म्हणून बढती दिली. त्यासाठी सरळ सेवा भरतीचा फार्स झाला. कालांतराने औद्योगिक न्यायालयाने ही निवड प्रक्रिया रद्द केली. उच्च न्यायालयानेही हाच आदेश कायम केला. दरम्यान, एका तत्कालीन उपायुक्तांच्या सहमतीने भोसले यांना औद्योगिक न्यायालयाच्या अंतिम आदेशास अधीन राहून मनपा ‘समकक्ष पदा’वर कायमस्वरूपी सामावून घेण्यात यावे, असा ठराव महासभेत झाला. वास्तविक भोसले यांनी मनपा सेवेत बढती मिळत असताना न्यायालयाचा आदेश तसेच त्यांच्यावर झालेल्या ‘एम’ गुन्ह्याची माहिती लपवून ठेवली. अकरापैकी दहा कर्मचारी आजही मूळ पदावर के.एम.टी.मध्ये काम करत आहेत. मग एकट्या भोसले यांनाच का बढती दिली, असा रामाणे यांचा प्रशासनाला प्रश्न आहे. भोसले यांना उपायुक्तपदापर्यंत बढती दिली तरी आपली हरकत नाही, पण न्यायालयाचा निर्णय डावलून बढती देण्याला आपला विरोध आहे, असे रामाणे म्हणतात. (प्रतिनिधी)न्याय मिळेपर्यंत मनपा प्रशासनाविरुध्द लढणारसंबंधित उपायुक्त व संजय भोसले यांनी मनपाची फसवणूक केली आहे, असा रामाणे यांचा आरोप आहे. भोसले यांच्यावर ‘एम’ गुन्हा दाखल झाला, त्याचवेळी त्यांना निलंबित करणे आवश्यक होते. मात्र, सगळ्या कृष्णकृत्यांवर पांघरूण घालून जर आयुक्त, प्रशासन धृतराष्ट्र, गांधारीची भूमिका घेणार असतील तर त्यांच्या विरोधात आपला लढा सुरुच राहील, असे चंद्रकांत रामाणी यांनी स्पष्ट केले.