शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
3
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
4
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
5
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
6
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
7
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
8
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
9
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
10
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
11
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
12
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
13
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
14
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
15
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
16
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
17
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
18
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
19
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
20
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...

कोल्हापूर : रिव्हॉल्व्हरचा धाक दाखवून पुरुषाला लुटले, तिघा चोरट्यांचे कृत्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2018 11:10 IST

कार्यालयात जेवण करून शतपावलीसाठी बाहेर फिरायला गेलेल्या पुरुषाच्या गळ्यातील एक तोळ्याची सोन्याची चेन तिघा चोरट्यांनी रिव्हॉल्व्हरचा धाक दाखवून हिसडा मारून लंपास केली. शुक्रवारी भर दुपारी साडेतीनच्या सुमारास गजबजलेल्या राजारामपुरीतील आठव्या गल्लीमध्ये हा प्रकार घडला. या लुटमारीचा संपूर्ण प्रकार येथील एका दूकानातील सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे.

ठळक मुद्देरिव्हॉल्व्हरचा धाक दाखवून पुरुषाला लुटले, तिघा चोरट्यांचे कृत्यराजारामपुरी आठव्या गल्लीतील प्रकार, सीसीटीव्हीमध्ये प्रकार कैद

कोल्हापूर : कार्यालयात जेवण करून शतपावलीसाठी बाहेर फिरायला गेलेल्या पुरुषाच्या गळ्यातील एक तोळ्याची सोन्याची चेन तिघा चोरट्यांनी रिव्हॉल्व्हरचा धाक दाखवून हिसडा मारून लंपास केली. शुक्रवारी भर दुपारी साडेतीनच्या सुमारास गजबजलेल्या राजारामपुरीतील आठव्या गल्लीमध्ये हा प्रकार घडला. या लुटमारीचा संपूर्ण प्रकार येथील एका दूकानातील सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे.अधिक माहिती अशी, संजय प्रल्हाद गुरव (वय ५८, रा. कुपेकर गल्ली, मंगळवार पेठ) हे राजारामपुरीतील सहाव्या गल्लीतील एका खासगी कंपनीत नोकरी करतात. शुक्रवारी दुपारी जेवण करून ते शतपावलीसाठी कार्यालयातून बाहेर पडले. चालत राजारामपुरी आठवी गल्ली येथे गेले असता पाठीमागून दुचाकीवरून आलेल्या तिघा तरुणांनी त्यांना अडविले.

दोघेजण खाली उतरले. त्यांतील एकाने खिशातून रिव्हॉल्व्हर बाहेर काढून त्यांचेवर रोखली. तर दूसऱ्याने त्यांना लाथाने मारुन त्यांच्या गळ्यातील सोन्याची चेन हिसडा मारून काढून घेत पुन्हा तिघेही दुचाकीवरून पळून गेले. अचानक घडलेल्या प्रकाराने गुरव भांबावून गेले; त्यामुळे त्यांना दुचाकीचा नंबर पाहता आला नाही. त्यांनी कार्यालयात येऊन सहकाऱ्यांना या घटनेची माहिती दिली. त्यानंतर राजारामपुरी पोलिसांत फिर्याद दिली.

राजारामपुरी परिसर नेहमी गजबजलेला असतो. अशा रस्त्यावर चोरटे बिनधास्तपणे रिव्हॉल्वरचा धाक दाखवून महिलांपाठोपाठ आता पुरुषांनाही लक्ष्य करू लागल्याने घबराट पसरली आहे. पोलीस या मार्गावरील सीसीटीव्ही फुटेजवरून चोरट्यांचा माग काढत आहेत. चोरटे २० ते २५ वयोगटातील आहेत. ते सराईत असण्याची शक्यता पोलीस निरीक्षक औदुंबर पाटील यांनी व्यक्त केली आहे.कोणीही उठतो रिव्हॉल्व्हर बाहेर काढतोकोणीही उठतो आणि रिव्हॉल्व्हर बाहेर काढतो. कारवाई करणार कोण? त्यामुळे भीती कोणाच्या बापाची...,अशा अविर्भावात सराईत गुन्हेगार बेकायदेशीर पिस्तुल, रिव्हॉल्व्हर दिवसाढवळ्या जवळ बाळगून वावरत आहेत. या गुन्हेगारांकडे रिव्हॉल्व्हर आले कुठून? बेकायदेशीर हत्यारांची तस्करी आजही कोल्हापुरात होत असल्याचे यावरून स्पष्ट होते.

आंधळेपणाचे ढोंग करणाऱ्यां पोलिसांनी आता आपल्या वर्दीची लाज राखली पाहिजे. अशा गुन्हेगारांचा बिमोड केला पाहिजे. अन्यथा कोल्हापूरचा बिहार होण्यास वेळ लागणार नाही. पोलीस अधीक्षक संजय मोहिते यांनी या घटनेची गांभीर्याने दखल घेतल्यास भविष्यातील मोठे अनर्थ टळतील. 

 

टॅग्स :Crimeगुन्हाkolhapurकोल्हापूर