शहरं
Join us  
Trending Stories
1
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
2
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
3
'सिंदूर'मध्ये खुलला देशभक्तीचा रंग; औषधी वनस्पती, नर्सरीमध्ये रोपांची मागणी वाढली
4
लॉस एंजेलिसमध्ये परिस्थिती चिघळली; ट्रम्प प्रशासनाने कॅलिफोर्नियाच्या रस्त्यांवर उतरवले ७०० मरीन कमांडो
5
तैवानच्या कंपन्या महाराष्ट्राबाहेर, फॉक्सकॉन इतर राज्यात, सेमिकंडक्टर कंपन्याही इतरत्र
6
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
7
राजा रघुवंशीच्या अंत्यसंस्काराचा धक्कादायक व्हिडीओ; राज कुशवाह सोनमच्या वडिलांना देत होता आधार
8
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
9
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
10
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
11
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
12
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
13
हा सदोष मनुष्यवधच!
14
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
15
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
16
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
17
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
18
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
19
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?

कर्ज प्रक्रियेत सुलभता आणा, कागदपत्रांबाबत जनजागृती करा  : राजेश क्षीरसागर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 6, 2021 11:33 IST

: अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळांतर्गत असलेल्या कर्ज योजनेची नेमकी प्रक्रिया समजली नसल्याने आणि कागदपत्रांअभावी बहुतांश लाभार्थ्यांना लाभ मिळालेला नाही. त्यामुळे सर्व अर्जदारांना कर्ज योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी कर्ज प्रक्रियेत सुलभता आणावी. कागदपत्रांबाबत जनजागृती करावी, अशा सूचना राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी सोमवारी जिल्ह्यातील विविध बँकांच्या अधिकारी, प्रतिनिधींनी दिल्या.

ठळक मुद्देकर्ज प्रक्रियेत सुलभता आणा, कागदपत्रांबाबत जनजागृती करा  : राजेश क्षीरसागर अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळांतर्गत विविध बँकांच्या अधिकारी, प्रतिनिधींची बैठक

कोल्हापूर : अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळांतर्गत असलेल्या कर्ज योजनेची नेमकी प्रक्रिया समजली नसल्याने आणि कागदपत्रांअभावी बहुतांश लाभार्थ्यांना लाभ मिळालेला नाही. त्यामुळे सर्व अर्जदारांना कर्ज योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी कर्ज प्रक्रियेत सुलभता आणावी. कागदपत्रांबाबत जनजागृती करावी, अशा सूचना राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी सोमवारी जिल्ह्यातील विविध बँकांच्या अधिकारी, प्रतिनिधींनी दिल्या.येथील शासकीय विश्रामगृहात अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळातर्फे आयोजित जिल्हा उद्योग केंद्र, जिल्हा अग्रणी बँका, सहकारी आणि खासगी बँकांच्या अधिकारी, प्रतिनिधींच्या बैठकीत ते बोलत होते. महामंडळांतर्गत येणाऱ्या कोणत्याही बँकेने कर्जपुरवठा थांबवलेला नाही. कर्ज घेतलेल्या युवकांकडून त्याचा परतावा सुरळीत होत आहे.

राजे विक्रमसिंह घाटगे बँकेने या योजनेसाठी स्वतंत्र कक्ष निर्माण केला असून, याच पद्धतीने इतर बँकांनी कक्ष स्थापन करावा. बोगस कर्जदारांना पाठीशी घातले जाणार नाही, पात्र लाभार्थ्याला न्यायापासून वंचित ठेवले जाणार नाही.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त दि. २७ जुलै रोजी कोल्हापूर जिल्ह्याकरिता योजनांची माहिती देणारे ऑनलाईन शिबिर घेतले जाणार असल्याचे क्षीरसागर यांनी सांगितले. यावेळी जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक सतीश शेळके, कौशल्य विकास रोजगारचे सहाय्यक आयुक्त संजय माळी, जिल्हा अग्रणी बँकेचे प्रबंधक राहुल माने, महामंडळाचे जिल्हा समन्वयक सतीश माने, आदी उपस्थित होते.२५७७ लाभार्थ्यांना २१६ कोटींचा कर्ज पुरवठावैयक्तिक कर्ज योजनेत ६ हजार अर्ज प्राप्त झाले. त्यातील २,५७७ लाभार्थ्यांना सुमारे २१६ कोटी रुपयांचा कर्ज पुरवठा केला. त्यातील २,२५३ लाभार्थ्यांना १३ कोटी रुपयांचा व्याज परतावा करण्यात आला असल्याची माहिती सतीश माने यांनी दिली.कागदपत्रांअभावी प्रकरणे प्रलंबितबँकांकडून लाभार्थ्यांना कर्ज पुरवठा सुरु आहे. कागदपत्रांअभावी उर्वरित प्रकरणे प्रलंबित असल्याचे सतीश माने यांनी सांगितले. कर्ज पुरवठ्यासाठी बँका मिळत नसल्याचा गैरसमज नागरिकांनी मनातून काढावा. कर्ज प्रकरणासाठी कोणत्याही एजंटची मध्यस्थी लाभार्थ्यांनी घेऊ नये. अधिक माहितीसाठी समक्ष बँकेशी संपर्क साधावा, असे आवाहन बँकांच्या प्रतिनिधींनी केले. 

टॅग्स :Annasaheb Patil Mahamandalअण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळRajesh Vinayakrao Kshirsagarराजेश विनायकराव क्षीरसागरkolhapurकोल्हापूर