शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
3
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
4
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
5
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
6
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
7
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
8
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
9
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
10
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
11
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
12
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
13
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
14
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
15
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
16
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
17
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
18
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
19
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
20
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती

Gram Panchayat Election Result: कोल्हापूर जिल्ह्यात महायुतीची सरशी 

By समीर देशपांडे | Updated: November 6, 2023 19:27 IST

कोल्हापूर : जिल्ह्यातील ७४ ग्रामपंचायतींच्या पंचवार्षिक निवडणुकीत राज्यात सत्तेवर असलेल्या महायुतीने बाजी मारली असून, ४२ ग्रामपंचायतींवर सत्ता प्रस्थापित केली ...

कोल्हापूर : जिल्ह्यातील ७४ ग्रामपंचायतींच्या पंचवार्षिक निवडणुकीत राज्यात सत्तेवर असलेल्या महायुतीने बाजी मारली असून, ४२ ग्रामपंचायतींवर सत्ता प्रस्थापित केली आहे. त्याखालोखाल १८ ग्रामपंचायतींमध्ये स्थानिक आघाड्यांना पसंती मिळाली असून, १४ ठिकाणी महाविकास आघाडी सत्तेवर आली आहे.जिल्ह्यातील ८९ ग्रामपंचायतींची निवडणूक झाली. यातील १५ ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या. उर्वरित ७४ ग्रामपंचायतींसाठी रविवारी ईर्षेने ८५ टक्के मतदान झाले. सकाळी ९ पासून प्रत्येक तालुक्याला सोमवारी मतमोजणी झाली. दुपारी १२ वाजेपर्यंत ही सर्व प्रक्रिया पार पडली. शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये पडलेल्या फुटीमुळे अनेक ठिकाणी चित्रविचित्र आघाड्या गावपातळीवर झाल्या होत्या. त्यामुळे अंदाज वर्तवणेही कठीण बनले.विशेष म्हणजे करवीर तालुक्यातील चिंचवाड येथे महाडिक गट आणि आमदार सतेज पाटील गटाने युती करून उभ्या केलेल्या आघाडीचा ग्रामस्थांनी धुव्वा उडवला असून, अपक्षांनी बाजी मारली आहे. मतदारांना गृहीत धरू नका असाच संदेश यातून दिला आहे. गारगोटीसारख्या तालुकास्तरीय ग्रामपंचायतीमध्ये अजित पवार गटाचे माजी आमदार के. पी. पाटील आणि भाजपचे जिल्हाध्यक्ष राहुल देसाई यांच्या गटाचे सरपंच निवडून आले असून, बहुमत मात्र आमदार प्रकाश आबिटकर गटाचे राहिले आहे.

पन्हाळा तालुक्यातील १४ पैकी ६ ठिकाणी जनसुराज्य आणि एक ठिकाणी नरके गटाने विजय मिळवला असून, स्थानिक आघाड्यांनी पाच, तर आमदार पी. एन. पाटील गटाने दोन ठिकाणी विजय मिळवला आहे. शाहूवाडी तालुक्यात सात ठिकाणी महायुती सत्तेवर आली असून, ३ ठिकाणी महाविकास आघाडीने बाजी मारली आहे. महायुतीच्या सातपैकी ३ ठिकाणी जनसुराज्यची सत्ता आली आहे. महत्त्वाच्या बाजारभोगाव ग्रामपंचायतीत हिर्डेकर भावकीला प्रथमच सत्ता मिळाली आहे.आजरा तालुक्यात चार ठिकाणी महायुती, तर तीन ठिकाणी महाविकास आघाडी व दोन ठिकाणी स्थानिक आघाडी सत्तेवर आली. राधानगरी तालुक्यात महायुतीला तीन, महाविकास आघाडीला दोन, तर स्थानिक आघाड्यांना चार ठिकाणी यश मिळाले. भुदरगड तालुक्यातील निवडणूक लागलेल्या चारही ग्रामपंचायतींवर महायुतीची सत्ता आली आहे.करवीर तालुक्यातील आठपैकी सात ठिकाणी स्थानिक आघाड्या सत्तेवर आल्या असून, सांगवडेवाडी येथील ग्रामपंचायत सतेज पाटील गटाकडे आली आहे. गडहिंग्लज तालुक्यातील एकमेव अर्जुनवाडीची सत्ता अजित पवार गटाचे आमदार राजेश पाटील यांच्या गटाकडे राहिली. चंदगड तालुक्यातील १९ पैकी १६ ठिकाणी महायुतीची सत्ता आली असून, तीन ठिकाणी महाविकास आघाडीला यश मिळाले.

निवडणुका झालेल्या तालुकावार ग्रामपंचायती आणि विजयी आघाड्या

तालुका -ग्रामपंचायती -महाविकास आघाडी- महायुती -स्थानिक आघाड्याचंदगड १९/३/१६/००पन्हाळा १४/२/७/५शाहूवाडी १/३/७/००आजरा ९/३/४/२राधानगरी ९/२/३/४करवीर ८/१/००/७भुदरगड ०४/००/४/००गडहिंग्लज ०१/००/१/००

नेत्यांच्या गावात हे घडलंगारगोटी : राहुल देसाई, के. पी. पाटील गटाचे सरपंच विजयी, तर आबिटकरांकडे बहुमतवेळवट्टी : केडीसीसीचे संचालक सुधीर देसाई यांच्या गावात अजित पवार गटाची सत्ताशिरोली दुमाला : गोकुळचे माजी अध्यक्ष विश्वास पाटील यांचे चिरंजीव सचिन पाटील लोकनियुक्त सरपंच.सरवडे : विजयसिंह मोरेंचे चिरंजीव रणधीर बनले लोकनियुक्त सरपंचसुपात्रे : मानसिंग गायकवाड यांची आघाडी सत्तेतपालकरवाडी : माजी आमदार नामदेवराव भोईटे यांचे चिरंजीव महेश लोकनियुक्त सरपंचकसबा वाळवे : उमेश भोईटे यांच्या गटाचा पराभव, भरत पाटील, अशोक फराकटे यांची सरशीबाजारभोगाव : स्थापनेपासून हिर्डेकर भावकीला प्रथमच सरपंचपद, काँग्रेसच्या सीमा नितीन हिर्डेकर यांना संधी

टॅग्स :kolhapurकोल्हापूरgram panchayatग्राम पंचायतResult Dayपरिणाम दिवस