शहरं
Join us  
Trending Stories
1
Monorail Accident: ट्रॅक सोडला, मधोमध अडकली! मोनोरेलचा वडाळ्याजवळ अपघात, ट्रायल रनवेळी घडली घटना
2
"लाडली, लक्ष्मी, बहीण..."; निवडणूक वर्षात महिलांसाठी रोख रकमेचा महापूर; सरकारं घाट्यात! आरबीआयनं दिलाय मोठा इशारा 
3
मिर्झापूरजवळ भीषण अपघात; रेल्वे रुळ ओलांडताना 'कालका मेल'खाली चिरडून ६ भाविकांचा मृत्यू
4
Sonam Raghuvanshi : ना कागद, ना कापड... राजा रघुवंशीच्या हत्येनंतर धूर्त सोनमने कसे पुसले हत्यारावरचे रक्ताचे डाग?
5
SBI ची नोकरी सोडून सुरू केली शेती, आज ७ कोटींच्या हेलिकॉप्टरचा मालक! ५ एकरापासून सुरुवात
6
गुवाहाटीची खरी कथा मला विचारूनच लिहावी लागेल- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
7
"तुम्हाला अपेक्षित असलेलं उत्तर मिळू शकत नाही"; मतदार याद्यांच्या वादावरून CM फडणवीसांचे राज ठाकरेंना प्रत्युत्तर
8
काँग्रेससाठी टीव्ही डिबेट करणारी भाव्या निघाली लष्करी अधिकारी; 'डबल रोल' करणारी कोण आहे ही...
9
मानव-बिबट्या संघर्षावर सरकारचे निर्णायक पाऊल; मनुष्यहानी रोखायला प्राधान्य, ११ कोटी मंजूर
10
'संबंध ठेवण्यापूर्वी कुंडली जुळवायची होती!'; पोलिस अधिकाऱ्यांच्या हायप्रोफाईल प्रकरणावर सुप्रीम कोर्टाची उपरोधिक टिप्पणी
11
"होनराव म्हणजे तू मराठी ना? तुझी बायको भैयिणी...", कमेंट वाचून मराठी अभिनेत्याचा संताप, म्हणाला...
12
जगातील टेक उद्योगात उलथापालथ: ॲमेझॉन, गूगल नंतर आता 'या' कंपनीच्या हजारो कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
13
"माझ्यापेक्षा मोठा गुंड नाही"; भाजपाच्या आजी-माजी खासदारांमध्येच जुंपली, एकमेकांना भिडले अन्...
14
Zohrab Mamdani: न्यूयॉर्कचे पहिले मुस्लीम मेअर बनले जोहरान ममदानी, ट्रम्प यांच्या धमक्यांनंतरही मोठा विजय!
15
२०२६ला डबल धमाका, ७ राशींवर असीम शनि कृपा; उत्पन्नात लक्षणीय वाढ, घर खरेदीचे स्वप्न पूर्ण!
16
“स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महायुतीमध्ये समन्वय साधून अंतिम निर्णय”: सुनील तटकरे
17
Vijay Mallya : 'जप्त केलेल्या मालमत्ता आणि थकीत कर्जाची माहिती द्या,' विजय माल्ल्यानं न्यायालयात काय म्हटलं?
18
Astrology: नशिबात नसलेल्या गोष्टीही स्वामीकृपेने मिळवता येतात का? ज्योतिष शास्त्र काय सांगते? पाहू
19
अमिताभ बच्चन यांनी विकले २ लक्झरी फ्लॅट्स; ‘बिग बीं’ची प्रॅापर्टीमधून बंपर कमाई, कितीमध्ये झाली ही ‘सुपर डील’?

चार तास फोर्स लोडशेडिंग, शेतकऱ्यांना होतोय ताप; महावितरणचे अधिकारी म्हणतात.. 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 19, 2023 12:30 IST

मागील तीन-चार महिन्यांपासून रात्री आणि दिवसाही जेमतेम चार-पाच तासांची वीज मिळत आहे

सतीश पाटीलशिरोली : महावितरण कंपनीने शेतीला अन्यायकारक ४ तासांचे फोर्स लोडशेडिंग लादल्याने, शेतकऱ्यांच्या पिकांना झटका बसून शेतकऱ्यांच्या गळ्याला फास लागायची वेळ आली आहे. फोर्स लोडशेडिंग हे अधिकृत नसून ते शेतकऱ्यांवर लादलेले आहे, असे जाणकारांचे म्हणणे आहे.रात्रीचा शेतकरी पाणी पाजवण्यासाठी शेतात जातो आणि पाणी सुरू असताना अचानक वीज गायब होते. ती कधी येईल, हे कंपनीचे कर्मचारीच काय अधिकारीही सांगू शकत नाहीत. मुंबईमध्ये महावितरणचे संपूर्ण राज्याचे सेंटर आहे तिथून हे फोर्स लोडशेडिंग केलं जातं. तेच ठरवतात लोडशेडिंगबाबत, याला कोणतेही अध्यादेश नाहीत. पण, विजेचा अधिक भार वाढला की, हे लोडशेडिंग केलं जातं, असे महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.गेल्या तीन महिन्यांपासून महावितरण कंपनीने शेतीला फोर्स लोडशेडिंग सुरू केले आहे. त्यामुळे पिके वाळली आहेत. पूर्वी लोडशेडिंगमध्ये वीज कधी जाणार, कधी येणार याचे वेळापत्रक किंवा मेसेज यायचे. मात्र, ‘फोर्स लोडशेडिंग’मध्ये कधीही वीज जाते आणि कधीही येत असल्याने त्याचा फटका बसत आहे. जास्तकरून रात्रीच्या वेळी हे लोडशेडिंग केले जाते. अचानकच वीज खंडित होते. आठ तासांपैकी चार - पाच तासच वीज मिळते.कृषी पंपाला आठवड्यातील तीन दिवस रात्रीची आणि चार दिवस दिवसा आठ तास वीज दिली जाते. परंतु, मागील तीन - चार महिन्यांपासून रात्री आणि दिवसाही जेमतेम चार - पाच तासांची वीज मिळत आहे. शेतकरी रात्री पाणी पाजण्यासाठी शेतात जातो आणि पाणी सुरू असताना अचानक वीज गायब होते. ती कधी येईल, हे कंपनीचे कर्मचारीच काय अधिकारीही सांगू शकत नाहीत.

सध्या पिकांना पाण्याची आवश्यकता जास्त आहे. त्यामुळे फोर्स लोडशेडिंग शेतीला नुकसानकारक आहे. विजेमुळे पाण्याची टंचाई झाल्याने पिके करपून गेली आहेत. शेतकरी कर्जबाजारी होईल. - बाबासाहेब देवकर, सडोली, शेतकरी) 

फोर्स लोडशेडिंग हे संपूर्ण महाराष्ट्रात लागू केले जाते. वीज घालवण्यासाठी मुंबई कार्यालयावरून अचानक सूचना येतात आणि वीज खंडित करावी लागते. त्याची वेळ व काळ आम्हाला माहीत नसते. आमच्या हातात काहीच नाही. -पी. एल. माशाळ, कार्यकारी अभियंता, महावितरण)

फोर्स लोडशेडिंग हे अधिकृत नसून ते शेतकऱ्यांवर लादलेले आहे. याला कोणताही अर्थ नाही. महावितरण कंपनीकडे वीज तुटवडा नाही. मुबलक वीज असताना शेतकऱ्यांची पिळवणूक करण्याचे काम करत आहेत. -प्रताप होगाडे, अध्यक्ष, महाराष्ट्र वीज ग्राहक संघटना)

टॅग्स :kolhapurकोल्हापूरFarmerशेतकरीelectricityवीजmahavitaranमहावितरण