शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
2
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
3
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
4
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
5
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
6
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
7
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
8
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
9
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
10
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
11
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
12
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
13
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
14
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
15
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
16
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
17
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
18
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
19
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
20
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...

चार तास फोर्स लोडशेडिंग, शेतकऱ्यांना होतोय ताप; महावितरणचे अधिकारी म्हणतात.. 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 19, 2023 12:30 IST

मागील तीन-चार महिन्यांपासून रात्री आणि दिवसाही जेमतेम चार-पाच तासांची वीज मिळत आहे

सतीश पाटीलशिरोली : महावितरण कंपनीने शेतीला अन्यायकारक ४ तासांचे फोर्स लोडशेडिंग लादल्याने, शेतकऱ्यांच्या पिकांना झटका बसून शेतकऱ्यांच्या गळ्याला फास लागायची वेळ आली आहे. फोर्स लोडशेडिंग हे अधिकृत नसून ते शेतकऱ्यांवर लादलेले आहे, असे जाणकारांचे म्हणणे आहे.रात्रीचा शेतकरी पाणी पाजवण्यासाठी शेतात जातो आणि पाणी सुरू असताना अचानक वीज गायब होते. ती कधी येईल, हे कंपनीचे कर्मचारीच काय अधिकारीही सांगू शकत नाहीत. मुंबईमध्ये महावितरणचे संपूर्ण राज्याचे सेंटर आहे तिथून हे फोर्स लोडशेडिंग केलं जातं. तेच ठरवतात लोडशेडिंगबाबत, याला कोणतेही अध्यादेश नाहीत. पण, विजेचा अधिक भार वाढला की, हे लोडशेडिंग केलं जातं, असे महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.गेल्या तीन महिन्यांपासून महावितरण कंपनीने शेतीला फोर्स लोडशेडिंग सुरू केले आहे. त्यामुळे पिके वाळली आहेत. पूर्वी लोडशेडिंगमध्ये वीज कधी जाणार, कधी येणार याचे वेळापत्रक किंवा मेसेज यायचे. मात्र, ‘फोर्स लोडशेडिंग’मध्ये कधीही वीज जाते आणि कधीही येत असल्याने त्याचा फटका बसत आहे. जास्तकरून रात्रीच्या वेळी हे लोडशेडिंग केले जाते. अचानकच वीज खंडित होते. आठ तासांपैकी चार - पाच तासच वीज मिळते.कृषी पंपाला आठवड्यातील तीन दिवस रात्रीची आणि चार दिवस दिवसा आठ तास वीज दिली जाते. परंतु, मागील तीन - चार महिन्यांपासून रात्री आणि दिवसाही जेमतेम चार - पाच तासांची वीज मिळत आहे. शेतकरी रात्री पाणी पाजण्यासाठी शेतात जातो आणि पाणी सुरू असताना अचानक वीज गायब होते. ती कधी येईल, हे कंपनीचे कर्मचारीच काय अधिकारीही सांगू शकत नाहीत.

सध्या पिकांना पाण्याची आवश्यकता जास्त आहे. त्यामुळे फोर्स लोडशेडिंग शेतीला नुकसानकारक आहे. विजेमुळे पाण्याची टंचाई झाल्याने पिके करपून गेली आहेत. शेतकरी कर्जबाजारी होईल. - बाबासाहेब देवकर, सडोली, शेतकरी) 

फोर्स लोडशेडिंग हे संपूर्ण महाराष्ट्रात लागू केले जाते. वीज घालवण्यासाठी मुंबई कार्यालयावरून अचानक सूचना येतात आणि वीज खंडित करावी लागते. त्याची वेळ व काळ आम्हाला माहीत नसते. आमच्या हातात काहीच नाही. -पी. एल. माशाळ, कार्यकारी अभियंता, महावितरण)

फोर्स लोडशेडिंग हे अधिकृत नसून ते शेतकऱ्यांवर लादलेले आहे. याला कोणताही अर्थ नाही. महावितरण कंपनीकडे वीज तुटवडा नाही. मुबलक वीज असताना शेतकऱ्यांची पिळवणूक करण्याचे काम करत आहेत. -प्रताप होगाडे, अध्यक्ष, महाराष्ट्र वीज ग्राहक संघटना)

टॅग्स :kolhapurकोल्हापूरFarmerशेतकरीelectricityवीजmahavitaranमहावितरण