शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

Kolhapur: वेदगंगा नदीला पूर, जीव धोक्यात घालून महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी वीज पुरवठा केला सुरळीत

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 24, 2023 16:39 IST

एक किलोमीटर महापुरात जाऊन सुमारे अर्धा तास पाण्यामध्ये राहत बिघाड शोधून वीज पुरवठा सुरळीत केला

अनिल पाटील मुरगूड : वेदगंगा नदीला आलेल्या महापुरामुळे अनेक ठिकाणी बिघाड निर्माण झाल्याने मुरगूड शहरासह परिसरातील काही गावांचा वीज पुरवठा खंडित झाला होता. मुरगूड महावितरण कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी आपला जीव धोक्यात घालून महापुरात उड्या मारून अगदी नदीच्या काठावर जात बिघाड शोधून वीज पुरवठा सुरळीत केला. या कर्मचाऱ्यांच्या धाडसाचे कौतुक होत आहे.मुरगूड चिमकाई ११ केव्ही फीडर मध्ये बिघाड झाल्याने वीज पुरवठा खंडित झाला होता. यावेळी सेवेवर असणारे शहाजी खतकर, भिकाजी चौगले, सतीश रणवरे, वैभव लोंढे, सागर गुजर यांनी तात्काळ हा बिघाड शोधला पण परत लाइन सिंगल फेज झाल्याने नदी काठावर जाऊन जम्प मारणे गरजेचे होते. अन्यथा मुरगूड शहरासह परिसरातील काही गावे अंधारात राहणार होती. त्यामुळे या पाच ही जणांनी महापुरात जाण्याचा निर्णय घेतला.मुरगूड नगरपालिकेकडून लाइफ जॅकेट घेऊन रस्सीच्या सहाय्याने सुमारे एक किलोमीटर महापुरात जाऊन सुमारे अर्धा तास पाण्यामध्ये रहात हा बिघाड शोधून या कर्मचाऱ्यांनी वीज पुरवठा सुरळीत केला. नदीचा वेगाने वाहणारा प्रवाह आणि कोसळणारा पाऊस यामध्ये जात आपले कर्तव्य पार करणाऱ्या या बहाद्दर कर्मचाऱ्यांचे उपस्थितांनी कौतुक केले. सद्या शहरातील वीज पुरवठा सुरळीत आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरelectricityवीजmahavitaranमहावितरण