शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

Arun Gandhi Passes Away : महात्मा गांधींचे नातू अरुण गांधी यांचे कोल्हापुरात निधन

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 2, 2023 10:34 IST

Mahatma Gandhi's grandson Arun Gandhi passed away अवनि संस्थेसोबत जवळपास वीस वर्षांचा सहवास. 

कोल्हापूर - राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे नातू  Arun Gandhi Passes Away अरुण गांधी  यांचे निधन झाले. ते ८९ वर्षांचे होते. कोल्हापुरातील अवनि (अन्न वस्त्र निवारा ) संस्थेच्या बालगृहात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. 

अरुण गांधी यांचा जन्म दक्षिण आफ्रिकेत झाला. अमेरीकेमध्ये महात्मा गांधीच्या विचाराचा प्रसार करण्याबरोबर महात्मा गांधींच्या विचारानुसार काम करणाऱ्या जगभरातील कामाला सर्वतोपरी सहकार्य करण्याचे कार्य त्यांनी तहहयात केले. 

अवनि संस्थेसोबत जवळपास वीस वर्षांचा सहवास 

अवनि संस्थेचे संस्थापक अध्यक्ष अरूण चव्हाण हे त्यांचे परम मित्र. दोन्ही मित्र समाजातील वंचित वर्गासाठी तळमळीने व निस्वार्थपणे झटणार, तरीही प्रसिद्धीपासून दूर राहणारे. संस्थेचे कार्य जवळून अनुभवल्यानंतर संस्थेला नेहमीच त्यांनी सर्वतोपरी मदत केली. संस्थेच्या सुरुवातीच्या काळात वेगवेगळ्या सामाजिक प्रकल्पांना त्यांच्या मदतीमुळे मोठे बळ मिळाले. बालगृह ईमारतीसाठी जागा घेण्यापासून ते ईमारत ऊभी करेपर्यंत व आजअखेर त्यांचे पाठबळ, त्यांचे मार्गदर्शन व आशिर्वाद कायम राहीले. 

दरवर्षी डिसेंबरमध्ये अमेरीकेहून महात्मा गांधींच्या विचाराने भारतात चालणाऱ्या कामाचा प्रसार करण्याच्या दृष्टीने ते अभ्यास दौरा आयोजित करत. कोल्हापूरमध्ये अवनि संस्थेच्या कार्याला प्रत्यक्ष फील्ड व्हीजिट होत. अध्यक्षा अनुराधा भोसले यांचे प्रचंड काम बघून त्यांना प्रचंड अभिमान वाटे. आपली मदत योग्य पद्धतीने व योग्य ठीकाणी पोचते व त्यातून वंचित वर्गाची होणारी प्रगती बघून परत जाताना एक आत्मिक समाधान घेऊन ते जात. या वर्षी प्रकृती अस्वास्थ्यामुळे डिसेंबरमध्ये डेलिगेशनसोबत त्यांना येणे शक्य झाले नाही. पण, नातवाच्या एंगेजमेंट निमित्ताने मुंबईला आल्यानंतर अवनिमध्ये एक आठवड्यासाठी आवर्जून आले. परत निघण्याच्या आदले दिवशी प्रकृती बिघडल्याने हॅास्पिटलमध्ये रहावं लागले. त्यातून बरे झाल्यानंतर प्रवास शक्य नसल्याने कोल्हापूरमध्ये राहण भाग होत. 

संस्थेतील अनुराधा मॅडम सोबत फक्त व्यावहारीक औपचारीकपणा नव्हता तर एक वडील- मुलीच आपुलकीचं नात होत. बालगृहातील मुलींचा ऊत्साह, प्रेम व आपुलकीनं काळजी घेण आप्पाजींना एक वेगळाच ऊर्जा देऊन जात होत. स्कॅाट सर्वच बाबतीत अगदिच काटेकोर असल्यांने कोणतीच काळजी नव्हती. अवनिचे कार्यकर्ते सर्व परीवार त्याची काळजी घेत होता व त्यांचे मोलाचे मार्गदर्शही. त्यामुळे त्यांनी ईथला प्रत्येक क्षण आनंदात घालवला. त्यातही तुषारभाईंनी त्यांच्या ईच्छे प्रमाणे सर्व काही व्हावे याची काळजी घेतली. 

आम्हा कुटुंबियांना घरी एक दिवसासाठी  का होईना पण त्यांचा पाहूणचार करण्याची संधी मिळाली. त्यांच्या सोबत छान गप्पा मारता आल्या त्यांचे अनुभवाचे बोल ऐकायला मिळणं हे भाग्यच, त्यांनी दिलेल्या मार्गाने काम करण्याचा प्रयत्न करण हीच त्यांच्यासाठी श्रद्धांजली असेल, अशा शब्दात त्यांचे अनुयायी गांधी विचारक संजय पाटील यांनी भावना व्यक्त केल्या आहेत. 

 

टॅग्स :Mahatma Gandhiमहात्मा गांधीkolhapurकोल्हापूरDeathमृत्यू