शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

केजरीवालांसारखा कारभार महाराष्ट्रात व्हायला हवा, आरोग्य राज्यमंत्र्यांकडून सरकारला घरचा आहेर

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2022 13:26 IST

कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी म्हणजे महाविकास आघाडी नव्हे. शिवसेना हा देखील यामध्ये एक महत्वाचा घटक आहे. त्यामुळे निधी देताना आमचाही विचार व्हावा अशी अपेक्षा यड्रावकर यांनी व्यक्त केली.

कोल्हापूर : दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आपचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीत जो कारभार केला त्याच्या बळावर त्यांनी पंजाब हे दुसरे राज्य जिंकले. असा कारभार महाराष्ट्रात व्हायला हवा अशी अपेक्षा शिवसेनेचे नेते आणि आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी येथे व्यक्त केली.जिल्हा परिषदेच्या शिक्षण आणि आरोग्य विभागाच्या विविध पुरस्कारांचे वितरण मंत्री यड्रावकर यांच्या हस्ते आज, शनिवारी दुपारी शिवाजी विद्यापीठाच्या राजमाता जिजाऊ सभागृहात करण्यात आले. यावेळी बोलताना मंत्री यड्रावकरांनी आघाडी सरकारला घरचा आहेर दिला. ज्यांच्या नेतृत्वाखाली ही जिल्हा परिषद कार्यरत आहे असे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ आणि पालकमंत्री सतेज पाटील यांची अनुपस्थिती यावेळी चर्चेची ठरली.या पुरस्कार वितरण सोहळ्यास जिल्हा परिषदेचे अध्यक्ष राहूल पाटील, आमदार जयंत आसगावकर, उपाध्यक्ष जयवंतराव शिंपी, मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती होती.यावेळी बोलताना मंत्री यड्रावकर  म्हणाले, राज्यात महाविकास आघाडी सरकार आल्यानंतर जिल्हा परिषदेतही परिवर्तन झाले. आरोग्य विभागाने कोरोनाच्या काळात उत्तम काम केले. सर्वसामान्यांच्या आरोग्याला महाविकास आघाडी सरकारने प्राधान्य झाले. मोफत रेमडेसिविर वाटणारी कोल्हापूर जिल्हा परिषद ही राज्यातील एकमेव जिल्हा परिषद असल्याचेही त्यांनी सांगितले.शिक्षण विषयात केजरीवाल सरकारने दिल्लीत चांगले काम केले आहे. आता तसेच काम महाराष्ट्रात होण्याची गरज आहे. जिल्हा परिषद शाळांनी इंग्रजी माध्यमाच्या शाळाही सुरू कराव्यात. तसेच अनेक शिक्षक चांगले काम करतात. परंतू अजूनही अनेकांचे शिक्षणाव्यतिरिक्त इतरत्रच जास्त लक्ष असते. ते त्यांनी अध्यापनाकडे दिल्यास सर्वसामान्यांच्या मुलांना आणखी चांगले शिक्षण मिळू शकेल.शिवसेनेलाही निधी द्यापुन्हा महाविकास आघाडीची सत्ता जिल्हा परिषदेत यावी. कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी म्हणजे महाविकास आघाडी नव्हे. शिवसेना हा देखील यामध्ये एक महत्वाचा घटक आहे. त्यामुळे निधी देताना आमचाही विचार व्हावा अशी अपेक्षा यड्रावकर यांनी व्यक्त केली.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरMaharashtraमहाराष्ट्रArvind Kejriwalअरविंद केजरीवाल