शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
4
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
5
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
6
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
7
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
8
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
9
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
10
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
11
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
12
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
13
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
14
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
15
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
16
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
17
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
18
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
19
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
20
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’

केजरीवालांसारखा कारभार महाराष्ट्रात व्हायला हवा, आरोग्य राज्यमंत्र्यांकडून सरकारला घरचा आहेर

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2022 13:26 IST

कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी म्हणजे महाविकास आघाडी नव्हे. शिवसेना हा देखील यामध्ये एक महत्वाचा घटक आहे. त्यामुळे निधी देताना आमचाही विचार व्हावा अशी अपेक्षा यड्रावकर यांनी व्यक्त केली.

कोल्हापूर : दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आपचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीत जो कारभार केला त्याच्या बळावर त्यांनी पंजाब हे दुसरे राज्य जिंकले. असा कारभार महाराष्ट्रात व्हायला हवा अशी अपेक्षा शिवसेनेचे नेते आणि आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी येथे व्यक्त केली.जिल्हा परिषदेच्या शिक्षण आणि आरोग्य विभागाच्या विविध पुरस्कारांचे वितरण मंत्री यड्रावकर यांच्या हस्ते आज, शनिवारी दुपारी शिवाजी विद्यापीठाच्या राजमाता जिजाऊ सभागृहात करण्यात आले. यावेळी बोलताना मंत्री यड्रावकरांनी आघाडी सरकारला घरचा आहेर दिला. ज्यांच्या नेतृत्वाखाली ही जिल्हा परिषद कार्यरत आहे असे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ आणि पालकमंत्री सतेज पाटील यांची अनुपस्थिती यावेळी चर्चेची ठरली.या पुरस्कार वितरण सोहळ्यास जिल्हा परिषदेचे अध्यक्ष राहूल पाटील, आमदार जयंत आसगावकर, उपाध्यक्ष जयवंतराव शिंपी, मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती होती.यावेळी बोलताना मंत्री यड्रावकर  म्हणाले, राज्यात महाविकास आघाडी सरकार आल्यानंतर जिल्हा परिषदेतही परिवर्तन झाले. आरोग्य विभागाने कोरोनाच्या काळात उत्तम काम केले. सर्वसामान्यांच्या आरोग्याला महाविकास आघाडी सरकारने प्राधान्य झाले. मोफत रेमडेसिविर वाटणारी कोल्हापूर जिल्हा परिषद ही राज्यातील एकमेव जिल्हा परिषद असल्याचेही त्यांनी सांगितले.शिक्षण विषयात केजरीवाल सरकारने दिल्लीत चांगले काम केले आहे. आता तसेच काम महाराष्ट्रात होण्याची गरज आहे. जिल्हा परिषद शाळांनी इंग्रजी माध्यमाच्या शाळाही सुरू कराव्यात. तसेच अनेक शिक्षक चांगले काम करतात. परंतू अजूनही अनेकांचे शिक्षणाव्यतिरिक्त इतरत्रच जास्त लक्ष असते. ते त्यांनी अध्यापनाकडे दिल्यास सर्वसामान्यांच्या मुलांना आणखी चांगले शिक्षण मिळू शकेल.शिवसेनेलाही निधी द्यापुन्हा महाविकास आघाडीची सत्ता जिल्हा परिषदेत यावी. कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी म्हणजे महाविकास आघाडी नव्हे. शिवसेना हा देखील यामध्ये एक महत्वाचा घटक आहे. त्यामुळे निधी देताना आमचाही विचार व्हावा अशी अपेक्षा यड्रावकर यांनी व्यक्त केली.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरMaharashtraमहाराष्ट्रArvind Kejriwalअरविंद केजरीवाल