शहरं
Join us  
Trending Stories
1
"जर 6 महिन्यांत मर्सिडीज अथवा बीएमडब्ल्यू हवी असेल तर..." सरन्यायाधीश गवई यांचा नव्या वकीलांना सल्ला
2
मुंबई-पुणे महामार्गावर भीषण अपघात! कंटेनरचे ब्रेक फेल, अनेक वाहने एकमेकांवर धडकली...
3
Shubman Gill Record : गिलनं साधला मोठा डाव! इंग्लंडच्या मैदानात पाक दिग्गजाला 'धोबीपछाड'
4
"आम्ही खूप दुःखी..."; दिराने वहिनीला कुंकू लावलं अन् धबधब्यात घेतली उडी, प्रेमाचा भयंकर शेवट
5
IND vs ENG : जसप्रीत बुमराहचं 'शतक'; मँचेस्टर कसोटीतील न पटण्याजोगी गोष्ट
6
Asia Cup 2025 चे वेळापत्रक जाहीर! भारत पाकिस्तान पुन्हा एकाच गटात, 'या' दिवशी सामना
7
१४,२९८ पुरुषांना 'लाडकी बहीण'चा लाभ; अजित पवार म्हणाले, 'वसूल करणार, नाही दिले तर...'
8
"सरकार ही निरुपयोगी यंत्रणा, चालत्या गाडीला पंक्चर करण्याचं काम..."; नितीन गडकरींनी सुनावलं
9
बिहार निवडणुकीसाठी काँग्रेसची मोर्चेबांधणी, महाराष्ट्रातील या महिला खासदाराकडे सोपवली मोठी जबाबदारी
10
"बंदुकीच्या धाकाने बांगलादेशात ढकलले जातेय...!" बांगली भाषिक मुस्लिमांवरील कारवाईवरून ओवेसी भडकले
11
IND vs ENG : यशस्वीच्या पदरी लाजिरवाणा 'भोपळा'! साई आला अन् तोही फक्त 'दर्शन' देऊन गेला
12
"राहुल गांधींच्या नशिबात कायम माफी मागणे लिहीले आहे"; केंद्रीय कृषीमंत्र्यांनी काँग्रेसला घेरलं, "१० वर्षांनी पुन्हा..."
13
VIDEO: अरे देवा... माकडाने ट्रेकरला मध्येच गाठलं, आधी बॅग उचकली, मग पाठीवर चढलं अन् मग...
14
धक्कादायक! या डेटिंग ॲपवरून महिलांचे हजारो फोटो लीक, प्रायव्हसी आली धोक्यात
15
'संपत्तीचे पुरावे देतो चौकशी करा'; एकनाथ खडसे म्हणाले, 'महिलांबाबत गिरीश महाजनांचे नाव पुढे का येतं?'
16
फणस खाणं महागात पडलं, ड्रिंक अँड ड्राइव्हमध्ये पकडलं; चालकांसोबत नेमकं काय घडलं?
17
१ ऑगस्टपासून लागू होणार नवे नियम, क्रेडिट कार्ड, यूपीआय, एलपीजीसह होणार हे ६ बदल, खबरदारी न घेतल्यास खिसा होणार रिकामा
18
वाल्मिक कराडचा जेलमधून माझ्यासमोर एकाला फोन आला; अंबादास दानवेंचा खळबळजनक दावा
19
सॉवरेन गोल्ड बाँडची कमाल...! ८ वर्षांत दिला २५०% परतावा, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
20
Raja Raghuvanshi : "राजाचा आत्मा अजूनही भटकतोय", भावाचा मोठा दावा; हत्येच्या ठिकाणी कुटुंबाने केलं असं काही...

Maharashtra Politics : शेतकऱ्यांना फसवून त्यांची मतं का घेतली?, माणिकराव कोकाटेंच्या वक्तव्यावर राजू शेट्टी यांचा संतप्त सवाल

By संतोष कनमुसे | Updated: April 5, 2025 17:20 IST

Maharashtra Politics : कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांनी काल शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवरुन शेतकऱ्यांना सुनावले.

Maharashtra Politics ( Marathi News ) : कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांनी काल शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवरुन शेतकऱ्यांना सुनावले. यावरुन आता राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. माजी खासदार राजू शेट्टी यांनीही कृषीमंत्री कोकाटे यांच्यावर टीका केली आहे. तसेच  ' निवडणूक काळात शेतकऱ्यांना खोटं सांगून मतं का मिळवली?, असा सवालही माजी खासदार राजू शेट्टी यांनी केला.

राजू शेट्टी यांनी महायुती सरकारवर जोरदार हल्ला चढवला आहे. माजी खासदार शेट्टी म्हणाले, कृषीमंत्री नाशिकला दिवसभर बैठका घेत राहिले. अंधार पडल्यानंतर अवकाळी पावसाने नुकसान झालेले पाहायला गेले. तिथे गेल्यानंतर शेतकऱ्याचं नुकसान झालेलं बघायला पाहिजे होतं. पण, त्यांनी तिथं शेतकऱ्यांसोबत वाद घातला. त्यांनी आपली अक्कल पाजळली. खरंतरं  महाराष्ट्राला बेअक्कल कृषीमंत्री मिळाला आहे, असा टोलाही शेट्टी यांनी लगावला. 

"शेतकऱ्यांना आर्थिक मदत करता म्हणजे उपकार करता का?"; काँग्रेसचा सरकारला तिखट सवाल

कृषी विद्यापीठांची शेती का तोट्यात आहे?

"या मंत्र्यांनी शेतकऱ्यांची तुलना भिकाऱ्यासोबत केली आणि आता म्हणत आहेत की कर्जमाफी झाली की तुम्ही सारखपुडा आणि लग्नाला खर्च करता. या मंत्र्यांना एवढी अक्कल पाहिजे की शेतकऱ्याचं कर्ज सरकार बँकेत पैसे देऊन माफ करणार आहे. ते पैसे शेतकऱ्यांच्या हातात देणार नाही. मुळामध्ये कृषीमंत्र्यांनी एकदा कृषी मंत्रालया अंतर्गत येणाऱ्या कृषी विद्यापीठांची शेती तोट्यात का आहे याचा अभ्यास करावा, असंही शेट्टी म्हणाले.  

राजू शेट्टी म्हणाले, शेती महामंडळाची शेती तोट्यात का आहे? याचा अभ्यास करावा आणि मग शेतकऱ्यांचे अर्थशास्त्र शिकावं. हमीभावापेक्षा कमी किंमतीत सोयाबीन विकायची वेळ आली आहे. कांद्याचे निर्यात शुल्क का कमी करत नाही हे केंद्राला विचारण्याची यांच्यात हिंमत नाही. तुमच्यात हिंमत नव्हती तर मग शेतकऱ्यांना आमचं सरकार आल्यानंतर कर्जमाफी देऊ, तुमचा सातराबा कोरा करतो, शेतकऱ्याला फसवून, गंडवून मतं का घेतली हे सांगा, असा सवालही माजी खासदार राजू शेट्टी यांनी केला. 

टॅग्स :Raju Shettyराजू शेट्टीFarmerशेतकरीManikrao Kokateमाणिकराव कोकाटे