शहरं
Join us  
Trending Stories
1
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
2
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
3
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
4
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
5
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
6
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
7
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
8
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
9
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
10
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
11
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
12
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
13
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...
14
अमरावतीची 'हवा'च न्यारी! देशात डंका, राष्ट्रीय स्तरावर पटकावला पहिला क्रमांक
15
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
16
भरणी श्राद्ध २०२५: गुरुवारी भरणी श्राद्ध, एकदा करावे की दरवर्षी? अधिकार कोणाला आणि नियम काय?
17
भारतीय अर्थव्यवस्था सुसाट! टॅरिफचा धाक दाखवणाऱ्या अमेरिकेला 'फिच' रिपोर्टने धक्का! इतका वाढणार जीडीपी
18
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड
19
जिच्यासाठी माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांनी आयुष्य संपवलं, ती पूजा गायकवाड कोण?
20
Asia Cup 2025 : पाकविरुद्ध हाच डाव खेळणार का? T20 तील टीम इंडियाच्या नंबर वन गोलंदाजाला बसवलं बाकावर

Maharashtra Politics : शेतकऱ्यांना फसवून त्यांची मतं का घेतली?, माणिकराव कोकाटेंच्या वक्तव्यावर राजू शेट्टी यांचा संतप्त सवाल

By संतोष कनमुसे | Updated: April 5, 2025 17:20 IST

Maharashtra Politics : कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांनी काल शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवरुन शेतकऱ्यांना सुनावले.

Maharashtra Politics ( Marathi News ) : कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांनी काल शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवरुन शेतकऱ्यांना सुनावले. यावरुन आता राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. माजी खासदार राजू शेट्टी यांनीही कृषीमंत्री कोकाटे यांच्यावर टीका केली आहे. तसेच  ' निवडणूक काळात शेतकऱ्यांना खोटं सांगून मतं का मिळवली?, असा सवालही माजी खासदार राजू शेट्टी यांनी केला.

राजू शेट्टी यांनी महायुती सरकारवर जोरदार हल्ला चढवला आहे. माजी खासदार शेट्टी म्हणाले, कृषीमंत्री नाशिकला दिवसभर बैठका घेत राहिले. अंधार पडल्यानंतर अवकाळी पावसाने नुकसान झालेले पाहायला गेले. तिथे गेल्यानंतर शेतकऱ्याचं नुकसान झालेलं बघायला पाहिजे होतं. पण, त्यांनी तिथं शेतकऱ्यांसोबत वाद घातला. त्यांनी आपली अक्कल पाजळली. खरंतरं  महाराष्ट्राला बेअक्कल कृषीमंत्री मिळाला आहे, असा टोलाही शेट्टी यांनी लगावला. 

"शेतकऱ्यांना आर्थिक मदत करता म्हणजे उपकार करता का?"; काँग्रेसचा सरकारला तिखट सवाल

कृषी विद्यापीठांची शेती का तोट्यात आहे?

"या मंत्र्यांनी शेतकऱ्यांची तुलना भिकाऱ्यासोबत केली आणि आता म्हणत आहेत की कर्जमाफी झाली की तुम्ही सारखपुडा आणि लग्नाला खर्च करता. या मंत्र्यांना एवढी अक्कल पाहिजे की शेतकऱ्याचं कर्ज सरकार बँकेत पैसे देऊन माफ करणार आहे. ते पैसे शेतकऱ्यांच्या हातात देणार नाही. मुळामध्ये कृषीमंत्र्यांनी एकदा कृषी मंत्रालया अंतर्गत येणाऱ्या कृषी विद्यापीठांची शेती तोट्यात का आहे याचा अभ्यास करावा, असंही शेट्टी म्हणाले.  

राजू शेट्टी म्हणाले, शेती महामंडळाची शेती तोट्यात का आहे? याचा अभ्यास करावा आणि मग शेतकऱ्यांचे अर्थशास्त्र शिकावं. हमीभावापेक्षा कमी किंमतीत सोयाबीन विकायची वेळ आली आहे. कांद्याचे निर्यात शुल्क का कमी करत नाही हे केंद्राला विचारण्याची यांच्यात हिंमत नाही. तुमच्यात हिंमत नव्हती तर मग शेतकऱ्यांना आमचं सरकार आल्यानंतर कर्जमाफी देऊ, तुमचा सातराबा कोरा करतो, शेतकऱ्याला फसवून, गंडवून मतं का घेतली हे सांगा, असा सवालही माजी खासदार राजू शेट्टी यांनी केला. 

टॅग्स :Raju Shettyराजू शेट्टीFarmerशेतकरीManikrao Kokateमाणिकराव कोकाटे