शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

एक इंचही जमीन देणार नाही, महाराष्ट्रातील ठरावावर कर्नाटकच्या नेत्यांच्या तीव्र प्रतिक्रिया

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 27, 2022 16:28 IST

महाराष्ट्रातील दिग्गजांची वक्तव्यं बालिशपणाची - मंत्री सी. एन. अश्वथनारायण 

प्रकाश बेळगोजी

बेळगाव: नागपूरमध्ये सुरू असलेल्या महाराष्ट्र विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात संमत करण्यात आलेल्या 'कर्नाटकातील मराठी भाषिक ८६५ गावांची इंचनइंच जमीन महाराष्ट्राचीच आहे', या ठरावाचा आणि महाराष्ट्र सरकारचा कर्नाटकच्या नेतेमंडळींनी तीव्र निषेध केला. तर, एक इंचही जमीन महाराष्ट्राला मिळणार नाही, असे स्पष्ट केले आहे.याबाबत बोलताना केपीसीसी अध्यक्ष आमदार डी. के. शिवकुमार यांनी कर्नाटकातील प्रत्येकाने हातात हात मिळवून संघटितपणे कर्नाटकला वाचविले पाहिजे असे मत व्यक्त केले. महाराष्ट्र विधानसभेत कर्नाटकातील काही गाव महाराष्ट्रात सामील करून घेण्याचा जो ठराव करण्यात आला आहे त्याचा संपूर्ण कर्नाटक आणि काँग्रेस पक्ष तीव्र निषेध करते. आम्ही आमच्या राज्यातील एकही गाव महाराष्ट्रात जाऊ देणार नाही. त्यांची गावं देखील आम्हाला नकोत. द्वेष आणि आसूयेतून निवडणुका जवळ येत असल्यामुळे भाजप हे कुतंत्र अवलंबत आहे. कर्नाटक सरकारने सीमावादासंदर्भात जो निर्णय घेतला आहे. त्याला आमचा आणि अपक्षांचा केंव्हाही पाठिंबा असणार आहे. राज्यसभेतही आम्ही हा प्रस्ताव मांडला आहे. केंद्राचे कर्नाटकबद्दल चांगले मत असल्यामुळे महाराष्ट्र द्वेष आणि आसूयेतून हे सर्व करत आहे असे सांगून कन्नड संघटना आणि राज्यातील जनतेने घाबरण्याची गरज नाही, असेही डि. के. शिवकुमार यांनी स्पष्ट केले.महाराष्ट्रातील दिग्गजांची वक्तव्यं बालिशपणाची - मंत्री सी. एन. अश्वथनारायण कर्नाटक-महाराष्ट्र सीमा वाद मिटला असला तरी, महाराष्ट्राने तो वारंवार मांडणे राजकीय हेतूने प्रेरित आहे असे मत कर्नाटकचे उच्च शिक्षण मंत्री सी. एन. अश्वथनारायण यांनी व्यक्त केले आहे. निपाणी कारवारसह काही जिल्हे केंद्रशासित करा अशी महाराष्ट्रातील दिग्गजांची वक्तव्यं बालिशपणाची आहेत. मुंबईत किती मराठी लोक आहेत? असे विचारले तर गोंधळ होईल, असे सांगून स्वार्थासाठी राजकारण करणारे लोक समाजावर ओझे आहेत हे त्यांनी समजून घेतले पाहिजे, असे मंत्री अश्वथनारायण म्हणाले.एक इंच ही जमीन जाऊ शकत नाही - ईश्वर खंडरे सुवर्ण विधानसौध समोर पत्रकारांशी बोलताना काँग्रेस नेते आमदार ईश्वर खंडरे यांनी कर्नाटक महाराष्ट्राला एक इंचही जागा देणार नाही असे सांगितले. महाराष्ट्र राज्य विनाकारण राजकीय व्देषातून हे सर्व करत आहे. याचा मी तीव्र निषेध करतो महाराष्ट्रात एक इंच ही जमीन जाऊ शकत नाही, असे खंडरे म्हणाले.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरMaharashtraमहाराष्ट्रKarnatakकर्नाटक