शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेता विजयला पाहण्याचा नादात तमिळनाडूत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा गेला जीव, मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता
2
'मी थरथर कापतोय कारण...'; चेंगराचेंगरीत ३६ जणांच्या मृत्यूनंतर अभिनेता विजयने सोडलं शहर
3
९ वर्षांच्या बेपत्ता मुलीला शोधायला लागले अन्... चेंगराचेंगरीचे कारण समोर, पाण्याच्या बाटल्या फेकत होता विजय
4
तामिळनाडूत सुपरस्टार विजयच्या रॅलीत चेंगराचेंगरी, महिला आणि मुलांसह 31 जणांचा मृत्यू, अनेक जखमी 
5
Mumbai Rain: मुंबईत उद्या अतिवृष्टीचा इशारा; कामाशिवाय घराबाहेर पडू नका, BMC च्या सूचना
6
'दारुल इस्लाम'वर विश्वास ठेवणाऱ्यांना आधी 'जहन्नुम'मध्ये जावे लागेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा इशारा
7
"ठाकरेंना हात जोडून विनंती की...!" उद्धव ठाकरे यांच्या शेतकऱ्यांसंदर्भातील 'त्या' विधानावर गुलाबराव पाटलांची एका वाक्यात प्रतिक्रिया
8
शेतकऱ्यांना मदत कधीपर्यंत मिळणार? DCM एकनाथ शिंदेंनी दिली आनंदाची बातमी; बळीराजाची दिवाळी गोड होणार!
9
पनवेलकडे जात असताना बाईक बेलापूर खाडीत कोसळली; एकाचा शोध लागला, दुसरा तरुण बेपत्ता
10
Asia Cup Final 2025: भारत की पाकिस्तान, कोण जिंकणार? ग्रहांची साथ कुणाला? मोठी भविष्यवाणी...
11
प्रेरणादायी! सामान्य भाजी विक्रेत्याचे असामान्य दान; पूरग्रस्तांसाठी दिले १ लाख, माणुसकी जपली
12
विदर्भात 'या' जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा फटका, पिकांचे अतोनात नुकसान ! अजून किती दिवस जोर राहणार कायम?
13
यावेळी बिहारमध्ये चार-चार दिवाळी उत्सव, किती जागा जिंकणार NDA? अमित शाह यांनी सेट केलं टार्गेट; राहुल-तेजस्वी यांच्यावरही बरसले
14
“आई कृपा कर, सरकारला बुद्धी दे!”; बाळासाहेब थोरातांचे मोहटादेवी चरणी साकडे, नुकसानीची पाहणी
15
“सोनू सूद पंजाबच्या मदतीला धावला, मराठी कलावंतांनी मराठवाड्याला मदत करावी”: अमोल मिटकरी
16
“भाजपाला प्रशासन चालवता येत नाही, CM सहायता फंडाबाबत फडणवीसांनी बोलू नये”; ठाकरेंचा पलटवार
17
महाराष्ट्रावर प्रचंड मोठे संकट असताना पंतप्रधान का फिरकले नाहीत? काँग्रेसचा सवाल
18
कंटाळा आला म्हणून मुलींनी मागवले ऑनलाइन जेवण; मद्यधुंद आईला राग अनावर, लेकींना बेदम मारहाण
19
३० सेकंदात रुग्णवाहिका तिथून निघून गेली; आरोपी गगनप्रीत कौरला जामीन मंजूर, कोर्टाने काय म्हटले?
20
१ ऑक्टोबरपासून लागू होणार ट्रेन तिकीट बुकींगचा नवा नियम, झटपट आटोपून घ्या हे काम, अन्यथा...

एक इंचही जमीन देणार नाही, महाराष्ट्रातील ठरावावर कर्नाटकच्या नेत्यांच्या तीव्र प्रतिक्रिया

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 27, 2022 16:28 IST

महाराष्ट्रातील दिग्गजांची वक्तव्यं बालिशपणाची - मंत्री सी. एन. अश्वथनारायण 

प्रकाश बेळगोजी

बेळगाव: नागपूरमध्ये सुरू असलेल्या महाराष्ट्र विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात संमत करण्यात आलेल्या 'कर्नाटकातील मराठी भाषिक ८६५ गावांची इंचनइंच जमीन महाराष्ट्राचीच आहे', या ठरावाचा आणि महाराष्ट्र सरकारचा कर्नाटकच्या नेतेमंडळींनी तीव्र निषेध केला. तर, एक इंचही जमीन महाराष्ट्राला मिळणार नाही, असे स्पष्ट केले आहे.याबाबत बोलताना केपीसीसी अध्यक्ष आमदार डी. के. शिवकुमार यांनी कर्नाटकातील प्रत्येकाने हातात हात मिळवून संघटितपणे कर्नाटकला वाचविले पाहिजे असे मत व्यक्त केले. महाराष्ट्र विधानसभेत कर्नाटकातील काही गाव महाराष्ट्रात सामील करून घेण्याचा जो ठराव करण्यात आला आहे त्याचा संपूर्ण कर्नाटक आणि काँग्रेस पक्ष तीव्र निषेध करते. आम्ही आमच्या राज्यातील एकही गाव महाराष्ट्रात जाऊ देणार नाही. त्यांची गावं देखील आम्हाला नकोत. द्वेष आणि आसूयेतून निवडणुका जवळ येत असल्यामुळे भाजप हे कुतंत्र अवलंबत आहे. कर्नाटक सरकारने सीमावादासंदर्भात जो निर्णय घेतला आहे. त्याला आमचा आणि अपक्षांचा केंव्हाही पाठिंबा असणार आहे. राज्यसभेतही आम्ही हा प्रस्ताव मांडला आहे. केंद्राचे कर्नाटकबद्दल चांगले मत असल्यामुळे महाराष्ट्र द्वेष आणि आसूयेतून हे सर्व करत आहे असे सांगून कन्नड संघटना आणि राज्यातील जनतेने घाबरण्याची गरज नाही, असेही डि. के. शिवकुमार यांनी स्पष्ट केले.महाराष्ट्रातील दिग्गजांची वक्तव्यं बालिशपणाची - मंत्री सी. एन. अश्वथनारायण कर्नाटक-महाराष्ट्र सीमा वाद मिटला असला तरी, महाराष्ट्राने तो वारंवार मांडणे राजकीय हेतूने प्रेरित आहे असे मत कर्नाटकचे उच्च शिक्षण मंत्री सी. एन. अश्वथनारायण यांनी व्यक्त केले आहे. निपाणी कारवारसह काही जिल्हे केंद्रशासित करा अशी महाराष्ट्रातील दिग्गजांची वक्तव्यं बालिशपणाची आहेत. मुंबईत किती मराठी लोक आहेत? असे विचारले तर गोंधळ होईल, असे सांगून स्वार्थासाठी राजकारण करणारे लोक समाजावर ओझे आहेत हे त्यांनी समजून घेतले पाहिजे, असे मंत्री अश्वथनारायण म्हणाले.एक इंच ही जमीन जाऊ शकत नाही - ईश्वर खंडरे सुवर्ण विधानसौध समोर पत्रकारांशी बोलताना काँग्रेस नेते आमदार ईश्वर खंडरे यांनी कर्नाटक महाराष्ट्राला एक इंचही जागा देणार नाही असे सांगितले. महाराष्ट्र राज्य विनाकारण राजकीय व्देषातून हे सर्व करत आहे. याचा मी तीव्र निषेध करतो महाराष्ट्रात एक इंच ही जमीन जाऊ शकत नाही, असे खंडरे म्हणाले.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरMaharashtraमहाराष्ट्रKarnatakकर्नाटक