शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या महायुद्धानंतर प्रथमच युरोपावर युद्धाचे ढग; पोलंडने सीमेवर तैनात केले ४० हजार सैनिक
2
नेपाळची संसद भंग, निवडणुकीच्या तारखांची घोषणा; शुक्रवारी रात्री शेजारील देशात काय काय घडलं?
3
देशभरातील घरे होणार स्वस्त; ग्राहकांना थेट लाभ देण्याची क्रेडाईची मोठी घोषणा
4
UN परिषदेत १४२ देशांसह भारतानं उचललं मोठं पाऊल; अमेरिका अन् इस्रायलला बसला झटका, काय घडलं?
5
फवाद-वाणी कपूरचा 'अबीर गुलाल' भारतातही रिलीज होणार, पहलगाम हल्ल्यानंतर झाला होता बॅन
6
पोस्टाची जबरदस्त स्कीम; महिन्याला करा 'इतकी' गुंतवणूक देईल ₹४० लाखांचा रिटर्न, जाणून घ्या संपूर्ण गणित
7
आजचे राशीभविष्य- १३ सप्टेंबर २०२५: आर्थिक लाभाचा दिवस, पण वाणीवर संयम ठेवा
8
मराठा समाजाला अगोदर मिळालेले आरक्षण नकोय का? रद्द करायचे का?; ओबीसी नेते छगन भुजबळांचा सवाल
9
महाराष्ट्राविना देशाचा गाडा न चाले! देशात सर्वाधिक रोजगार, कंपन्या अन् पेन्शनधारक राज्यात
10
स्पाईसजेट विमानाचे चाक टेकऑफ घेताना निखळले; एकाच चाकावर मुंबईत लँडिंग, मोठी दुर्घटना टळली 
11
'महादेवी'चा निर्णय उच्चस्तरीय समितीने घ्यावा, सर्वोच्च न्यायालय; हत्तीण मठाकडे पाठविण्यास ‘पेटा’चा विरोध
12
विशेष लेख: ‘जेन झी’च्या डोक्यात ही खदखद कुणी भरली आहे? 
13
पतीचे भाकीत ठरले खरे ; डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्यावरून ठेवले नाव
14
जेन झीने महिलेच्या हाती सोपविली नेपाळची धुरा, एकमताने सुशीला कार्की नव्या पंतप्रधान
15
अग्रलेख: मान्सून तिबेटात, धस्स भारतात! मानवी उपद्व्यापच कारणीभूत
16
कुर्डूतील मुरुम उत्खनन बेकायदेशीरच आहे; पालकमंत्री जयकुमार गोरेंचा खुलासा
17
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मणिपुरला भेट देणार; पाच राज्यांचा दौरा 
18
चॅटजीपीटीनं त्याला पाठवलं मृत्यूच्या दारात; घशातील त्रास, AI ने काय दिला सल्ला?
19
‘भारत मोठा झाल्याची भीती वाटते म्हणून टॅरिफ लावला’; सरसंघचालक मोहन भागवतांचे मोठे विधान
20
केवळ शब्दांनी नव्हे, तर आपल्या मुलांना महात्मा गांधीजींप्रमाणे वर्तनातून शिकवा -मोरारीबापू

महाराष्ट्र निवडणूक निकाल 2019 : आमच्या यशामागे अनेक अदृश्य हातांची मदत- सतेज पाटील 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 25, 2019 12:21 IST

कोल्हापूर दक्षिण मतदारसंघातून काँग्रेसचे नेते ऋतुराज पाटील यांचा विजय झाला.

कोल्हापूरः कोल्हापूर दक्षिण मतदारसंघातून काँग्रेसचे नेते ऋतुराज पाटील यांचा विजय झाला. त्यांनी भाजपाच्या अमल महाडिक यांचा 42,709 मतांनी पराभव केला आहे. ऋतुराज पाटील यांना 140103 मतं पडली असून, प्रतिस्पर्धी अमल महाडिक यांना 97394 मतं जनतेनं दिली आहेत. पुतण्याच्या विजयानंतर सतेज पाटील यांनीही एका वृत्तवाहिनीला प्रतिक्रिया देताना आनंद व्यक्त केला आहे.सतेज पाटील म्हणाले, जिल्ह्यात काँग्रेस-राष्ट्रवादीच्या सहा जागा निवडून आल्या, याचा मनस्वी आनंद आहे. परिवर्तनाची लाट कोल्हापुरात आली. काँग्रेस मुक्त करू, असं म्हणणाऱ्यांना भाजपमुक्त जिल्हा करून योग्य उत्तर दिलं आहे, याचा आनंद आहे. युतीकडून सर्वसामान्य लोकांच्या इच्छा-आकांक्षा पूर्ण झाल्या नाहीत. त्यामुळेच काँग्रेस-राष्ट्रवादी 10 पैकी 6 जागा निवडून देण्याचा जनाधार मिळालेला आहे. अनेक अदृश्य शक्ती त्या ठिकाणी कार्यरत होत्या. सकृतदर्शनी ज्यांनी पाठिंबा दिला त्यांचंही अभिनंदन करतो. अदृश्यपणे अनेक हात या ठिकाणी होते, त्यांचंही अभिनंदन करतो. 1 लाखांच्या वर मतं ऋतुराज यांना मिळाली आहेत. त्याठिकाणी 40 ते 42 हजार मताधिक्यानं त्यांचा विजय झाला आहे.सर्वच लोकांनी मदतीची भूमिका याठिकाणी घेतलेली आहे. कोल्हापुरातील राजकारण स्वच्छ व्हावं, या भावनेतून जिल्ह्यातील नेत्यांनी हा निर्णय घेतलेला आहे. मला अजूनही 10 ते 20 वर्षं राजकारण करायचं आहे. महापुरात युतीचं सरकार सपशेल अपयशी झालेलं होतं. महापुरात सरकार गायब होतं, बेरोजगारी प्रचंड वाढलेली आहे. वीज दरवाढ हा इथे महत्त्वाचा मुद्दा होता, त्याकडे लक्ष न दिल्यानं जनतेत नाराजी होती. तसेच येत्या काळात भाजपाबरोबर शिवसेनेनं सत्तेत सहभागी व्हायचंय की नाही हे ठरवावं, शिवसेनेची बार्गेनिंग पॉवर आता प्रचंड वाढलेली आहे. शिवसेनेवर दबाव आणण्यासाठी भाजपाचा माइंड गेम सुरू आहे. शिवसेनेला 50 टक्के वाटा भाजपा देणार काय, अशा प्रश्नांची निश्चितच आता उत्तरं मिळतील. 

टॅग्स :Satej Gyanadeo Patilसतेज ज्ञानदेव पाटीलkolhapur-south-acकोल्हापूर दक्षिणMaharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019