शहरं
Join us  
Trending Stories
1
अंकारा हादरलं! लिबियाच्या मिलिट्री चीफना घेऊन जाणारं विमान कोसळलं, एअरपोर्ट तडकाफडकी बंद
2
मोठा गेम प्लॅन! भाजपने शिंदेसेनेचे ठाण्यामध्येच दाबले नाक; मुंबईत अधिक जागा मागू नये म्हणून...
3
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २४ डिसेंबर २०२५: धनलाभ होईल, नवे काम हाती घ्याल!
4
कोर्टात कराड प्रथमच बोलला; पण न्यायाधीशांनी थांबवले; संतोष देशमुख हत्या प्रकरणी दोषारोप निश्चित
5
संपादकीय: त्रिशंकूंची त्रेधातिरपीट! एचवन-बी व्हिसाधारक आज अक्षरशः लटकले आहेत...
6
महापालिका निवडणूक : मुंबईत भाऊबंध प्रयोगाचा आज आरंभ; पुण्यात पवार काका पुतण्यांचे मनाेमिलन होणार
7
बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी उद्धव ठाकरेंना काेर्टाचा दिलासा; मुलीनंतर पित्याची याचिका फेटाळली
8
बांधकाम मजुरांना किमान मास्क तरी द्या! तुम्हाला गरिबांची काळजी नाही; हायकोर्टाचे फटकारे   
9
पाच लाखांची लाच घेताना जीएसटी अधीक्षकाला अटक; अधिकाऱ्याकडे सापडले घबाड, सीबीआयची कारवाई
10
सरकारला मजुरांच्या घामाची किंमत आहे का? मनरेगा बदलण्यावर विस्तृत लेख...
11
प्रदूषणकारी मेट्रो-२ बीच्या आरएमसी प्लांटचे काम थांबवा; ‘एमएमआरडीए’च्या कंत्राटदाराला नोटीस 
12
निश्चित नसलेल्या जागी कुत्र्यांना अन्न देण्यापासून रोखणे गुन्हा ठरत नाही; मुंबई उच्च न्यायालयाने दिला महत्त्वपूर्ण निर्वाळा  
13
म्हाडा अधिकारी राजकीय दबावाला बळी का पडतात? पुनर्विकास थांबविल्याने उच्च न्यायालयाचा सवाल
14
गृहप्रकल्पात गोदरेजची ११० कोटींची फसवणूक; अहमदाबादच्या सिद्धी ग्रुपविरुद्ध गुन्हा दाखल 
15
जयंत नारळीकर यांना मरणोत्तर विज्ञान रत्न पुरस्कार; मराठी शास्त्रज्ञांचाही राष्ट्रपतींकडून गौरव
16
बांगलादेशात हिंदूची हत्या; दिल्ली, कोलकाता पेटले   
17
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
18
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
19
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
20
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Election 2019 : राज्यात ५ वाजेपर्यंत सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 21, 2019 18:35 IST

कोल्हापूर जिल्ह्यांतील दहा मतदार संघात अत्यंत ईर्षेने ग्रामपंचायत निवडणूकीला होते तसे मतदान सोमवारी विधानसभा निवडणूकीसाठी झाले. राज्यात ५ वाजेपर्यंत सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर मतदारसंघात ७८. ३२ टक्के इतके झाले आहे.

ठळक मुद्देकोल्हापूरला ईर्षेने ७५ टक्के मतदानशांततेत बजावला हक्क : पावसाने उसंत

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यांतील दहा मतदार संघात अत्यंत ईर्षेने ग्रामपंचायत निवडणूकीला होते तसे मतदान सोमवारी विधानसभा निवडणूकीसाठी झाले. राज्यात ५ वाजेपर्यंत सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर मतदारसंघात ७८. ३२ टक्के इतके झाले आहे.

मतदानास अजून तासाचा अवधी शिल्लक असल्याने किमान ७५ टक्के मतदान होईल असा अंदाज निवडणूक विभागाने व्यक्त केला. मागील दोन दिवस जिल्ह्यात मुसळधार पाऊस झाला होता त्यामुळे मतदानादिवशी काय होते याची सर्वांनाच चिंता लागून राहिली होती परंतू दिवसभर पावसाने उसंत घेतल्याने मतदार व उमेदवारांचाही उत्साह वाढला. जिल्ह्यांत किरकोळ शाब्दिक बाचाबाची वगळता कुठेही अनुचित प्रकार अथवा दुबार मतदानाच्या तक्रारी झाल्या नाहीत.जिल्ह्यांत दहा मतदार संघात १०६ उमेदवार रिंगणात आहेत. भाजपचे प्रदेशाध्यक्ष व महसूल मंत्री चंद्रकांत पाटील, राष्ट्रवादीचे नेते आमदार हसन मुश्रीफ, काँग्रेसचे नेते आमदार सतेज पाटील, जनसुराज्य पक्षाचे नेते विनय कोरे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी, भाजपचे उपाध्यक्ष धनंजय महाडिक व शिवसेनेचे खासदार संजय मंडलिक या सर्वांचीच राजकीय प्रतिष्ठा या निवडणूकीत पणाला लागली आहे.

गेली आठवडाभर रोजच दुपारनंतर पाऊस येत असल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी सकाळच्या टप्प्यातच मतदान करावे असे आवाहन केले होते. त्यास चांगला प्रतिसाद मिळाला व सकाळी सातपासूनच मतदान प्रक्रियेने वेग घेतला. सकाळच्या टप्प्यात गावोगावी वैरण, शेतीची कामे करण्यात लोक गुंतल्याचे चित्र दिसत होते.अनेकांनी अगोदर मतदान केले व मगच दैनंदिन कामासाठी लोक बाहेर पडले.

पाऊस सुरु झाला तर वृध्द, आजारी, दिव्यांग मतदारांना बाहेर काढणे शक्य होणार नाही म्हणून अगोदर त्यांना प्राधान्याने मतदानास आणण्यात आले. मतदारांना आणण्यासाठी सर्रास वाहनांचा वापर झाला. कांही ठिकाणी मतदान केल्यानंतर प्रक्रिया पूर्ण होण्यासाठी थोडा वेळ लागत होता त्यामुळेही लांबच्या लांब रांगा लागल्या. तरुणांईसह महिला, वृध्द, ज्येष्ठ नागरिकांनीही मतदानाचा हक्क बजावल्यानेच मतदानाचा टक्का वाढल्याचे चित्र आहे. निवडणूकीत चुरस जरुर होती परंतू कुठेही तणाव नव्हता त्यामुळे लोकांनी निर्भयपणे येवून मतदान केले. 

 

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019kolhapurकोल्हापूरkarvir-acकरवीर