शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
2
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
3
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
4
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
5
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
6
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
7
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
8
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
9
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
10
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
11
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
12
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
13
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
14
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
15
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
16
ती माझी मैत्रीण! दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीबाबत एल्विश यादवचा खुलासा, म्हणाला- "तो फोटो पाहिल्यानंतर..."
17
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
18
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
19
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
20
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!

Maharashtra Bandh : कोल्हापूरात अवघा मराठा रस्त्यावर : भगव्याची लाट, पाळला अभूतपूर्व अन् कडकडीत बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 9, 2018 16:57 IST

कडकडीत बंद कसा असावा याचा इतिहासात एक मानदंड ठरावा असा कोल्हापूरकरांनी गुरुवारी अभूतपूर्व बंद पाळला. नोकरी आणि शिक्षणात आरक्षण मिळालेच पाहिजे या मागणीसाठी अवघा मराठा बंदच्या निमित्ताने रस्त्यावर उतरल्याने शहरातील सगळे रस्ते भगव्या जनसागराच्या गर्दीने फुलून गेले.

ठळक मुद्देअवघा मराठा रस्त्यावर : भगव्याची लाटआरक्षण घेतल्याशिवाय आता माघार नाही : निर्धार

कोल्हापूर : कडकडीत बंद कसा असावा याचा इतिहासात एक मानदंड ठरावा असा कोल्हापूरकरांनी गुरुवारी अभूतपूर्व बंद पाळला. नोकरी आणि शिक्षणात आरक्षण मिळालेच पाहिजे या मागणीसाठी अवघा मराठा बंदच्या निमित्ताने रस्त्यावर उतरल्याने शहरातील सगळे रस्ते भगव्या जनसागराच्या गर्दीने फुलून गेले.

बंदच्या काळात शहरात एकही दुकान उघडले नाहीच शिवाय साधी चहाची टपरीही कुठे दिसून आली नाही. रॅलीसाठी वापरल्या गेलेल्या दुचाकी वगळता एकही वाहन रस्त्यावर पहायला मिळाले नाही. गल्ली बोळातून, चौकाचौकातून, प्रमुख्य रस्त्यावरुन हातात भगवे ध्वज घेऊन ‘आरक्षण आमच्या हक्काचे’अशा घोषणा देत फिरणारे मराठा समाजातील तरुण असेच चित्र संपूर्ण शहरभर पहायला मिळाले.कोल्हापूर शहरात गेल्या अनेक दिवसापासून मराठा समाजाच्या आरक्षक्षण मागणीसाठी ठिय्या आंदोलन सुरु आहे. त्यामुळे शहरासह जिल्ह्याच्या ग्रामिण भागातील समाजही या आंदोलनात सहभागी झाला आहे. आंदोलनाचाच एक भाग म्हणून सकल मराठा क्रांती मोर्चाने महाराष्ट्र बंदची हाक दिली होती. या बंदला कोल्हापुरात अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला. बंद कसा असू शकतो याचा एक परिपाठही आजच्या बंदने लिहिला गेला. एरव्ही अर्धी अधिक दुकाने सुरु असतात. मात्र गुरुवारी एकाही दुकानाचा दरवाजा उघडला नाही.गुरुवारी पूर्वनियोजित बंद असल्याने सकाळी कोणीही दुकानदार आपल्या दुकानाकडे फिरकले नाही. उद्योजक, व्यापारी, व्यावसायिक, रिक्षा चालक यांनी आधीच बंदमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे संपूर्ण शहराची चाकं बंद झाली. शहरातील सर्व महाविद्यालये, शाळा बंद राहिल्या. त्यांचे दरवाजेही उघडले गेले नाहीत. मध्यवर्ती बस स्थानक, रंकाळवेश बस स्थानक पूर्णपणे बंद ठेवले होते. एस.टी. व केएमटीची एकही बस वर्कशॉपमधून बाहेर पडली नाही. बस स्थानकाच्या परिसरात शुकशुकाट होता.

विशेष म्हणजे एसटी बसस्थानकांचे मुख्य दरवाजेच बंद ठेवले होते. शहरात दररोज सुमारे सात ते आठ हजार रिक्षा धावत असतात, पण गुरुवारी मात्र एकही रिक्षा रस्त्यावर न आणता रिक्षा सेवा बंद ठेवणेच रिक्षा मालकांनी पसंत केले. त्यामुळे वाहतुकीची सर्वच मार्ग आपोआप बंद झाले. चित्रपटगृहे, मल्टीप्लेक्स सिनेमागृहे, हॉटेल्स, उपहारगृहे बंद राहिले.शहरातील सर्व प्रमुख व्यापारी पेठा, भाजी मंडई, मार्केट यार्ड, लक्ष्मीपुरीतील धान्य बाजार, मॉल, पेट्रोल पंप बंद राहिले. बाजार समितीत गुरुवारी कमी प्रमाणात भाजीपाल्याची आवक झाली पण त्याचीही विक्री झाली नसल्याने हा माल तेथेच पडून राहिला. शहरात केवळ औषध दुकाने व रुग्णालये वगळता एकाही दुकानाचा दरवाजा अथवा शटर उघडले गेले नाही. अत्यंत कडकडीत बंद पाळला गेला. विशेष म्हणजे कुठेही कसलाही अनुचित प्रकार घडला नाही. 

सर्वाधिक संख्येने तरुण रस्त्यावरमराठा समाजातील तरुणांमध्ये मराठा समाजाच्या आरक्षणाबाबतीत मोठा आक्रोश आहे. नोकरी नसल्याने त्यांच्यात सरकार विरुध्द तीव्र असंतोष आहे. हा आक्रोश आणि असंतोष गुरुवारी रस्त्यावर पहायला मिळाला. आजच्या बंदमध्ये तरुणांनी मोठ्या संख्यने भाग घेतला. डोकीवर भगवी टोपी, हातात भगवा ध्वज आणि ‘आरक्षण आमच्या हक्काचे, नाही कोणाच्या बापाचे’ अशा घोषणा देत तरुण दसरा चौकाकडे जात होते. त्यापाठोपाठ तरुणांची संख्याही लक्षणिय होती. अनेक तरुणांनी भगवे, काळे, पिवळे अशा रंगाचे टी शर्ट देखिल परिधान केले होते.रॅलींमुळे दणाणले शहरअवघा मराठा समाज गुरुवारी रस्त्यावर उतरला होता. ऐतिहासिक दसरा चौकात सभेला येण्याचे आवाहन सकल मराठा समाजातर्फे करण्यात आले होते. परंतु त्याठिकाणी सर्वांना एकत्र येणे अशक्य होते. त्यामुळे पोलिसांनी चहूबाजूंनी दसरा चौकाकडे जाणारे रस्ते तीन टप्प्यात बॅरिकेटस् टाकून रोखले होते. सदरा चौक गर्दीने फुलून गेल्याने हजारो तरुणांना तिकडे जाता आले नाही. त्यामुळे १००-२०० तरुणांचे जत्थे तयार व्हायला लागले. या जत्थांनी मग मोटार सायकल रॅली काढण्यास सुरुवात केली. अनेक तरुणांनी आपापल्या भागातूनच मोटारसायकल रॅली काढली.

या रॅलीज व्हीनस कॉर्नर, फोर्ड कॉर्नर, लक्ष्मीपुरी, बिंदू चौक, शिवाजी पुतळा, मिरजकर तिकटी, महाद्वार, गंगावेश, रंकाळवेश, पापाची तिकटी, माळकर तिकटी, राजारामपुरी, शाहूपुरी या भागातून फिरायला लागल्या. सालेन्सर काढलेल्या दुचाकी, हवेत भिरभिरणारे भगवे ध्वज आणि ‘जय भवानी - जय शिवाजी, मराठ्यांना आरक्षण मिळालेच पाहिजे’ अशा घोषणांनी अवघे शहर दणाणून गेले. सकाळी साडे अकरा ते दुपारी अडीच या वेळेत तर गल्लीबोळात, चौकाचौकात, प्रमुख रस्त्यांवर या रॅलीच पहायला मिळत होत्या. जेवढे लोक दसरा चौक परिसरात होते,त्यापेक्षा किती तरी लोक अशा रॅलीतून सहभागी झाले होते.बॅँकाच्या शाखा सक्तीने पाडल्या बंदराजारामपुरी परिसरातील सर्व गल्ल्यातील व्यापार पेठीतील कापड दुकाने, हॉटेल बंद होती. परंतु राष्ट्रीयकृत तसेच खासगी बॅँकांची कार्यालये, विमा कंपन्यांची कार्यालये, वित्तीय कंपन्यांची कार्यालये नेहमीप्रमाणे सुरु होती. ही माहिती शिवसेना शहर प्रमुख दुर्गेश लिंग्रज, कमलाकर जगदाळे यांना समजताच त्यांनी दोनशे तरुणांना सोबत घेऊन मोटारसायकल रॅली काढली. बॅँकांच्या कार्यालयात घुसून कर्मचारी व अधिकाऱ्यांना दमबाजी करत कामकाज बंद ठेऊन शटर बंद ठेवण्याच्या सक्त सुचना दिल्या. एवढेच नाही तर कामकाज करत बसलेल्या सर्व कर्मचाऱ्यांनाही आतून बाहेर काढले आणि घरी जायला सांगितले. आयसीआयसीआय, स्टेट बॅँक आॅफ इंडिया, कॉसमॉस, युनियन बॅँक, कॅनरा बॅँक,एक्सीस बॅँक, जीपी पारसिक बॅँक आदी बॅँकाच्या शाखा सक्तीने बंद पाडल्या गेल्या.

 

टॅग्स :Maharashtra Bandhमहाराष्ट्र बंदkolhapurकोल्हापूर