शहरं
Join us  
Trending Stories
1
इतर देशांवर अवलंबित्व हाच आपला खरा शत्रू; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली स्वयंपूर्णतेची हाक
2
आजचे राशीभविष्य, २१ सप्टेंबर २०२५: आर्थिक निर्णय टाळा, भावनेच्या भरात मोठी चूक होण्याची शक्यता
3
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयानं आता अमेरिकेत नोकरी करणे महाग; भारतीयांना बसणार फटका
4
IND vs PAK यांच्यातील मॅच आधी PCB अध्यक्ष मोहसीन नक्वी यांच्यावर आली पळ काढण्याची वेळ! कारण...
5
युरोपातील विमानतळांवर सायबर हल्ला; उड्डाणे विस्कळीत, वेळापत्रकावर परिणाम
6
BCCI New President : ठरलं! पुन्हा एकदा माजी क्रिकेटर होणार बीसीसीआयचा 'कारभारी'; पण कोण?
7
IND vs PAK Live Streaming : टीम इंडिया पुन्हा पाकचा बुक्का पाडणार? मैदानातील माहोल कसा असणार?
8
ST मध्ये नोकरी करणार का? १७,४५० जागांची संधी; भविष्यात येणाऱ्या ८ हजार बसेससाठी हवे मनुष्यबळ
9
डिसेंबरपर्यंत मुंबईत स्वयंचलित दरवाजांच्या नॉन एसी लोकल धावणार; रेल्वेमंत्र्यांची माहिती
10
कुजबुज! भाजपने आणला नवा ‘ब्रँड’; CM देवेंद्र फडणवीसांनी कौतुक करत राज ठाकरेंना लगावला टोला
11
गरब्यांमध्ये फक्त हिंदूंनाच प्रवेश, प्रत्येकाच्या कपाळी टिळा लावा; विश्व हिंदू परिषदेची भूमिका
12
राज्यात पावसाचा कहर, धरणे भरली, नद्यांना पूर; ३५ धरणांमधून ३ लाख १८,८५९ क्युसेकचा विसर्ग
13
‘शेतकऱ्यांनो, हताश होऊ नका, भरपाई लवकरच’; कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांची ग्वाही
14
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
15
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
16
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
17
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
18
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
19
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
20
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ

Vidhan Sabha Election 2024: राजकीय पक्ष सुस्त, बंडखोर सुसाट; नेतृत्वाचा धाक संपला 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 11, 2024 16:17 IST

निलंबन निवडणुकीपुरतेच

कोल्हापूर : विधानसभा निवडणुकीचा फड चांगलाच रंगला आहे. मात्र, जिल्ह्यातील बहुतांशी मतदारसंघांत बंडखोरांमुळे अनेकांची कोंडी झाली आहे. नेतृत्वाचा धाक संपल्याने बंडोबांची संख्या वाढली आहे. त्यामुळेच बंडखोर सुसाट सुटले आहेत आणि राजकीय पक्ष सुस्त दिसत आहेत. त्यातही या मंडळीसमोर एक-दोन नव्हे सहा सक्षम व इतर डझनभर पक्षांचा पर्याय असल्याने ते राजकीय परिणामाची पर्वा करत नाहीत.यंदाच्या निवडणुकीत बंडखोरांची संख्या वाढली आहे. ‘कोल्हापूर उत्तर ‘राधानगरी’, ‘चंदगड’, ‘इचलकरंजी’ येथे, तर राजकीय पक्षांसमोर बंडखोरांनी तगडे आव्हान उभे केले. ‘कोल्हापूर उत्तर’मध्ये बंडखोरासाठी कॉंग्रेस पक्षाच्या अधिकृत उमेदवाराला माघार घ्यावी लागली.‘राधानगरी’त राष्ट्रवादी कॉंग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील यांनी बंडखोरी करून आव्हान उभे केले आहे. ‘चंदगड’मध्ये कॉंग्रेसचे अप्पी पाटील, भाजपचे शिवाजी पाटील यांनी आपल्याच उमेदवारांविरोधात दंड थोपटले आहे. येथे अपक्ष कोणाचा गेम करणार? याविषयी उत्सुकता आहे.‘इचलकरंजी’मध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेस (अजित पवार गट) पक्षाचे शहराध्यक्ष विठ्ठल चोपडे यांनी महायुतीविरोधात मैदानात उडी घेतली आहे. ‘हातकणंगले’त ‘स्वाभिमानी’चे जिल्हाध्यक्ष वैभव कांबळे यांनी बंड केले. त्याशिवाय ‘हातकणंगले’मध्ये आघाडीचे डॉ. सुजीत मिणचेकर व ‘शिरोळ’ मध्ये उल्हास पाटील यांनी ‘स्वाभिमानी’चा झेंडा हातात घेतला आहे.यापुर्वी बंडखोरी व्हायच्या, पण त्याला मर्यादा असायच्या. त्यावेळी जेमतेम दोन किंवा तीन पक्ष होते, त्यावेळी सहा वर्षांच्या निलंबनाची भीती असायची. निलंबन म्हणजे राजकीय कारकीर्द संपुष्टात असे वाटायचे. आता, प्रमुख सहा आणि इतर डझनभर पक्ष झाल्याने येथे नाही, तर तिथे संधी मिळते, म्हणून बंडखोरही बिनधास्त आहेत.

सावकारांच्या मनात आहे तरी काय?आमदार विनय कोरे यांना महायुतीने ‘शाहूवाडी’ व ‘हातकणंगले’ जागा सोडली. पण, त्यांनी ‘करवीर’ व ‘चंदगड’मध्ये उमेदवार दिले आहेत. त्यांच्या या राजकीय गणिताचे अनेकांना कोडे पडले असून, त्यांच्या मनात नेमके आहे तरी काय? अशी चर्चा सुरू आहे.

निलंबन निवडणुकीपुरतेचपक्ष विरोधी एखाद्याने काम केले, तर त्याला सहा वर्षांसाठी पक्षातून निलंबित केल्याची नोटीस काढली जाते. मात्र, निकाल लागल्यानंतर जेमतेम महिन्याभरातच पक्षात पुन्हा फुलांच्या पायघड्या घालून घेतले जाते. त्यामुळे धाक संपला हे जरी खरे असले, तरी आता पक्षच एवढे झालेत की, कायमस्वरूपी दारे बंद केली, तर पक्ष कसा चालणार? अशीही भीती पक्षनेतृत्वाला असते.

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४western maharashtra regionपश्चिम महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024