शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
4
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
5
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
6
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीची संतापजनक पोस्ट, नेमके प्रकरण काय?
7
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
8
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
9
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
10
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
11
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
12
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
13
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
14
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
15
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
16
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
17
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
18
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
19
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
20
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट

Vidhan Sabha Election 2024: राजकीय पक्ष सुस्त, बंडखोर सुसाट; नेतृत्वाचा धाक संपला 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 11, 2024 16:17 IST

निलंबन निवडणुकीपुरतेच

कोल्हापूर : विधानसभा निवडणुकीचा फड चांगलाच रंगला आहे. मात्र, जिल्ह्यातील बहुतांशी मतदारसंघांत बंडखोरांमुळे अनेकांची कोंडी झाली आहे. नेतृत्वाचा धाक संपल्याने बंडोबांची संख्या वाढली आहे. त्यामुळेच बंडखोर सुसाट सुटले आहेत आणि राजकीय पक्ष सुस्त दिसत आहेत. त्यातही या मंडळीसमोर एक-दोन नव्हे सहा सक्षम व इतर डझनभर पक्षांचा पर्याय असल्याने ते राजकीय परिणामाची पर्वा करत नाहीत.यंदाच्या निवडणुकीत बंडखोरांची संख्या वाढली आहे. ‘कोल्हापूर उत्तर ‘राधानगरी’, ‘चंदगड’, ‘इचलकरंजी’ येथे, तर राजकीय पक्षांसमोर बंडखोरांनी तगडे आव्हान उभे केले. ‘कोल्हापूर उत्तर’मध्ये बंडखोरासाठी कॉंग्रेस पक्षाच्या अधिकृत उमेदवाराला माघार घ्यावी लागली.‘राधानगरी’त राष्ट्रवादी कॉंग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील यांनी बंडखोरी करून आव्हान उभे केले आहे. ‘चंदगड’मध्ये कॉंग्रेसचे अप्पी पाटील, भाजपचे शिवाजी पाटील यांनी आपल्याच उमेदवारांविरोधात दंड थोपटले आहे. येथे अपक्ष कोणाचा गेम करणार? याविषयी उत्सुकता आहे.‘इचलकरंजी’मध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेस (अजित पवार गट) पक्षाचे शहराध्यक्ष विठ्ठल चोपडे यांनी महायुतीविरोधात मैदानात उडी घेतली आहे. ‘हातकणंगले’त ‘स्वाभिमानी’चे जिल्हाध्यक्ष वैभव कांबळे यांनी बंड केले. त्याशिवाय ‘हातकणंगले’मध्ये आघाडीचे डॉ. सुजीत मिणचेकर व ‘शिरोळ’ मध्ये उल्हास पाटील यांनी ‘स्वाभिमानी’चा झेंडा हातात घेतला आहे.यापुर्वी बंडखोरी व्हायच्या, पण त्याला मर्यादा असायच्या. त्यावेळी जेमतेम दोन किंवा तीन पक्ष होते, त्यावेळी सहा वर्षांच्या निलंबनाची भीती असायची. निलंबन म्हणजे राजकीय कारकीर्द संपुष्टात असे वाटायचे. आता, प्रमुख सहा आणि इतर डझनभर पक्ष झाल्याने येथे नाही, तर तिथे संधी मिळते, म्हणून बंडखोरही बिनधास्त आहेत.

सावकारांच्या मनात आहे तरी काय?आमदार विनय कोरे यांना महायुतीने ‘शाहूवाडी’ व ‘हातकणंगले’ जागा सोडली. पण, त्यांनी ‘करवीर’ व ‘चंदगड’मध्ये उमेदवार दिले आहेत. त्यांच्या या राजकीय गणिताचे अनेकांना कोडे पडले असून, त्यांच्या मनात नेमके आहे तरी काय? अशी चर्चा सुरू आहे.

निलंबन निवडणुकीपुरतेचपक्ष विरोधी एखाद्याने काम केले, तर त्याला सहा वर्षांसाठी पक्षातून निलंबित केल्याची नोटीस काढली जाते. मात्र, निकाल लागल्यानंतर जेमतेम महिन्याभरातच पक्षात पुन्हा फुलांच्या पायघड्या घालून घेतले जाते. त्यामुळे धाक संपला हे जरी खरे असले, तरी आता पक्षच एवढे झालेत की, कायमस्वरूपी दारे बंद केली, तर पक्ष कसा चालणार? अशीही भीती पक्षनेतृत्वाला असते.

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४western maharashtra regionपश्चिम महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024