शहरं
Join us  
Trending Stories
1
नरेंद्र मोदींचा उत्तराधिकारी कोण बनणार? सरसंघचालक मोहन भागवतांचं सूचक विधान, म्हणाले...    
2
ज्या देशाच्या कारमधून पुतिन यांनी केला प्रवास; आता त्यांच्याचविरोधात उतरवले लढाऊ जहाज, तणाव वाढला
3
रोहित शर्मा नवा 'सिक्सर किंग'! पाकिस्तानचा शाहिद आफ्रिदी म्हणतो, "जो विक्रम झालाय तो..."
4
जुने बँक खाते बंद करताय? थांबा! 'या' ५ चुका केल्यास तुमच्या खिशातून कापले जातील एक्स्ट्रा चार्ज
5
“८ दिवसांत ई-वाहनांना टोलमाफीची अंमलबजावणी करा”; विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांचे निर्देश
6
अविवाहित मुलीच्या संपत्तीचा खरा वारसदार कोण? कायद्यानुसार कोणाचे असतात प्रथम अधिकार?
7
पोलिसांनी लाईनमनला केली अटक, संतापलेल्या वीज कर्मचाऱ्यांनी असा घेतला बदला, अखेरीस...
8
संतापजनक! "आधी ४ लाख भरा, मग मृतदेह न्या"; बिल पाहून नातेवाईकांचा रुग्णालयावर गंभीर आरोप
9
'या' कर्जमुक्त कंपनीच्या शेअरवर गुंतवणूकदारांच्या उड्या; ₹६० पेक्षा कमी आहे किंमत, दमानींचीही गुंतवणूक
10
Travel : भारतातून १००००० रुपये घेऊन थायलंड ट्रिपला निघताय? राहणं, खाणं आणि फिरणं एकूण किती होईल खर्च?
11
“देशात कधीही झाले नाही, ती परंपरा PM मोदी अन् CM फडणवीसांनी सुरू केली”; कुणी केली टीका?
12
Akola Live in Partner killed: २८ वर्षाच्या प्रेयसीची पवनने हत्या केली आणि पोलीस ठाण्यात जाऊन म्हणाला, 'तिने माझ्या घरात...'
13
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी, सरकारनं 'या' महत्त्वाच्या नियमांत केला बदल; १५ डिसेंबरपासून लागू होणार
14
संतापजनक...! गुजरातमध्ये 6 वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचार, नराधमानं प्रायव्हेट पार्टमध्ये...; आरोपी 3 मुलांचा बाप!
15
३१ डिसेंबर आहे अखेरची तारीख, 'ही' २ कामं पटापट आटोपून घ्या; केली नाही तर समस्यांना सामोरं जावं लागेल
16
क्रिकेट कोचला बॅटने बेदम मारहाण; २० टाके पडले! संघात न घेतल्यानं तिघे भडकले, अन्....
17
प्रेम, धोका आणि ब्लॅकमेलिंग! व्यापाऱ्याचा महिला DSP वर कोट्यवधी रुपये हडपल्याचा गंभीर आरोप
18
शिंदेंचा ‘वाघ’ थेट बिबट्याच्या वेशात विधान भवनात; हात जोडून सरकारला विनवणी, “गेली २० वर्षे...”
19
ममता बॅनर्जींनी केंद्र सरकारच्या आदेशाचा कागद फाडला! कशावरून रंगला 'हाय-व्होल्टेज' ड्रामा?
20
पाकिस्तानात शूट झालाय रणवीर सिंगचा 'धुरंधर'? अभिनेत्याचा मोठा खुलासा, म्हणाला- "तिथले गँगस्टर..."
Daily Top 2Weekly Top 5

Vidhan Sabha Election 2024: राजकीय पक्ष सुस्त, बंडखोर सुसाट; नेतृत्वाचा धाक संपला 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 11, 2024 16:17 IST

निलंबन निवडणुकीपुरतेच

कोल्हापूर : विधानसभा निवडणुकीचा फड चांगलाच रंगला आहे. मात्र, जिल्ह्यातील बहुतांशी मतदारसंघांत बंडखोरांमुळे अनेकांची कोंडी झाली आहे. नेतृत्वाचा धाक संपल्याने बंडोबांची संख्या वाढली आहे. त्यामुळेच बंडखोर सुसाट सुटले आहेत आणि राजकीय पक्ष सुस्त दिसत आहेत. त्यातही या मंडळीसमोर एक-दोन नव्हे सहा सक्षम व इतर डझनभर पक्षांचा पर्याय असल्याने ते राजकीय परिणामाची पर्वा करत नाहीत.यंदाच्या निवडणुकीत बंडखोरांची संख्या वाढली आहे. ‘कोल्हापूर उत्तर ‘राधानगरी’, ‘चंदगड’, ‘इचलकरंजी’ येथे, तर राजकीय पक्षांसमोर बंडखोरांनी तगडे आव्हान उभे केले. ‘कोल्हापूर उत्तर’मध्ये बंडखोरासाठी कॉंग्रेस पक्षाच्या अधिकृत उमेदवाराला माघार घ्यावी लागली.‘राधानगरी’त राष्ट्रवादी कॉंग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील यांनी बंडखोरी करून आव्हान उभे केले आहे. ‘चंदगड’मध्ये कॉंग्रेसचे अप्पी पाटील, भाजपचे शिवाजी पाटील यांनी आपल्याच उमेदवारांविरोधात दंड थोपटले आहे. येथे अपक्ष कोणाचा गेम करणार? याविषयी उत्सुकता आहे.‘इचलकरंजी’मध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेस (अजित पवार गट) पक्षाचे शहराध्यक्ष विठ्ठल चोपडे यांनी महायुतीविरोधात मैदानात उडी घेतली आहे. ‘हातकणंगले’त ‘स्वाभिमानी’चे जिल्हाध्यक्ष वैभव कांबळे यांनी बंड केले. त्याशिवाय ‘हातकणंगले’मध्ये आघाडीचे डॉ. सुजीत मिणचेकर व ‘शिरोळ’ मध्ये उल्हास पाटील यांनी ‘स्वाभिमानी’चा झेंडा हातात घेतला आहे.यापुर्वी बंडखोरी व्हायच्या, पण त्याला मर्यादा असायच्या. त्यावेळी जेमतेम दोन किंवा तीन पक्ष होते, त्यावेळी सहा वर्षांच्या निलंबनाची भीती असायची. निलंबन म्हणजे राजकीय कारकीर्द संपुष्टात असे वाटायचे. आता, प्रमुख सहा आणि इतर डझनभर पक्ष झाल्याने येथे नाही, तर तिथे संधी मिळते, म्हणून बंडखोरही बिनधास्त आहेत.

सावकारांच्या मनात आहे तरी काय?आमदार विनय कोरे यांना महायुतीने ‘शाहूवाडी’ व ‘हातकणंगले’ जागा सोडली. पण, त्यांनी ‘करवीर’ व ‘चंदगड’मध्ये उमेदवार दिले आहेत. त्यांच्या या राजकीय गणिताचे अनेकांना कोडे पडले असून, त्यांच्या मनात नेमके आहे तरी काय? अशी चर्चा सुरू आहे.

निलंबन निवडणुकीपुरतेचपक्ष विरोधी एखाद्याने काम केले, तर त्याला सहा वर्षांसाठी पक्षातून निलंबित केल्याची नोटीस काढली जाते. मात्र, निकाल लागल्यानंतर जेमतेम महिन्याभरातच पक्षात पुन्हा फुलांच्या पायघड्या घालून घेतले जाते. त्यामुळे धाक संपला हे जरी खरे असले, तरी आता पक्षच एवढे झालेत की, कायमस्वरूपी दारे बंद केली, तर पक्ष कसा चालणार? अशीही भीती पक्षनेतृत्वाला असते.

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४western maharashtra regionपश्चिम महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024