शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रंप टॅरिफविरोधात भारतीय सैन्याची एन्ट्री; ५४ वर्षांपूर्वीची कारस्थाने बाहेर काढली...
2
सरकारांना ईव्हींवर आणखी ऑफर्स द्याव्या लागणार? विक्रीच्या वेगावर निती आयोगाचे वक्तव्य...
3
छोट्या भावावर हात उचलणाऱ्याला कायमचं संपवलं; भावाचा बदला घेणारी २२ वर्षीय 'लेडी डॉन' कोण?
4
नवऱ्याचं पोट फाडलं, मृतदेहावर अ‍ॅसिड ओतलं; बॉयफ्रेंडसाठी तबस्सुमनं गाठला क्रूरतेचा कळस 
5
Jalana: "भाजप प्रवेशाच्या निव्वळ अफवा"; राजेश टोपेंनी चर्चांना दिला पूर्णविराम
6
कथावाचक प्रदीम मिश्रा यांच्या कुबेरेश्वर धाममध्ये चेंगराचेंगरी, २ महिलांचा मृत्यू, अनेकजण जखमी   
7
Satyapal Malik Death: जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांचे निधन; राम मनोहर लोहिया रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
8
Thane: ठाण्यातील प्रतिष्ठित शाळेत ४ वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचार, पालकांच्या आरोपानंतर तपास सुरू
9
“मुंबई महानगरपालिका निवडणुकीत ठाकरे बंधूंना चांगले यश मिळेल”; महायुतीतील नेत्याचा मोठा दावा
10
Satyapal Malik: 'मला सत्य सांगायचे आहे', शेवटच्या पोस्टमध्ये काय म्हणाले होते सत्यपाल मलिक?
11
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! दिवाळीपूर्वी पगारात होणार इतकी वाढ? कोणाला मिळणार फायदा?
12
"Help Me! गर्लफ्रेंडसोबत फिरायला जायचंय..."; बॉयफ्रेंडने लावले UPI स्कॅनर असलेले पोस्टर
13
Mumbai: कबुतरांना दाणे टाकताना रोखलं, वृद्ध व्यक्तीसह त्यांच्या मुलावर लोखंडी रॉडने हल्ला!
14
शर्टचा फोटो, अज्ञात चेहरा...४३४ कोटींच्या एमडी ड्रग्जबाबत खुलासा; कर्नाटकातून मुंबईत कसं यायचे?
15
शांतता अन् निसर्ग सौंदर्याचा अनोखा मिलाफ; बीच लव्हर असाल तर भारतातील 'या' समुद्र किनाऱ्यांना नक्की भेट द्या!
16
"कोण खरा भारतीय, कोण नाही हे कोर्ट ठरवू शकत नाही’’, प्रियंका गांधींनी केला राहुल गांधींचा बचाव
17
ये वर्दी सिर्फ हिंमत नही बलिदान भी मांगती है! फरहान अख्तरच्या '१२० बहादुर'चा टीझर रिलीज
18
राज ठाकरेंशी युतीला कौल? इंडिया-मविआवर पाणी सोडण्याची तयारी? दिल्लीत उद्धव ठाकरेंची परीक्षा
19
Anil Ambani at ED Office : अनिल अंबानी ED च्या कार्यालयात दाखल; १७ हजार कोटींच्या कर्जाच्या फसवणुकीप्रकरणी झाले हजर
20
मी तिचा पहिला रूग्ण, ती माझी शेवटची डॉक्टर, १३ दिवसांचा ड्रामा नको...; इंजिनिअरनं संपवलं जीवन

महाडिकांचा कारभार ईस्ट इंडिया कंपनीसारखा : सतेज पाटील यांची टीका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2021 16:59 IST

GokulMilk Kolhapur : महाडिकांचा कारभार म्हणजे ईस्ट इंडिया कंपनीसारखा असून कोल्हापूरात आले आणि एक एक संस्था ताब्यात घेतल्या आणि त्याचा वापर स्वतासाठी केला. मात्र कोल्हापूरच्या स्वाभिमानी जनतेला माहीती आहे, आपलं कोण आणि परके कोण आहे? अशी टीका पालकमंत्री सतेज पाटील यांनी केली. दूध उत्पादकांच्या हितासाठी आम्ही एकत्र आलो, स्वताचे टँकर वाचवण्यासाठी यांची धडपड असून दोन नंबर वाल्यांनी आमच्या आघाडीबद्दल बोलू नये, असा इशाराही त्यांनी पत्रकार परिषदेत दिला.

ठळक मुद्देमहाडिकांचा कारभार ईस्ट इंडिया कंपनीसारखा : सतेज पाटील यांची टीका दोन नंबर वाल्यांनी आमच्या आघाडीबद्दल बोलू नये

कोल्हापूर : महाडिकांचा कारभार म्हणजे ईस्ट इंडिया कंपनीसारखा असून कोल्हापूरात आले आणि एक एक संस्था ताब्यात घेतल्या आणि त्याचा वापर स्वतासाठी केला. मात्र कोल्हापूरच्या स्वाभिमानी जनतेला माहीती आहे, आपलं कोण आणि परके कोण आहे? अशी टीका पालकमंत्री सतेज पाटील यांनी केली. दूध उत्पादकांच्या हितासाठी आम्ही एकत्र आलो, स्वताचे टँकर वाचवण्यासाठी यांची धडपड असून दोन नंबर वाल्यांनी आमच्या आघाडीबद्दल बोलू नये, असा इशाराही त्यांनी पत्रकार परिषदेत दिला.सतेज पाटील म्हणाले, सभासदांच्या पाठींब्यामुळेच आमचा आत्मविश्वास वाढला असून राजर्षि शाहू शेतकरी आघाडीचे सर्वच्या सर्व उमेदवार विजयी होणार हे निश्चित आहे. आमच्यावर टीका करणारे धनंजय महाडीक यांचा सारखा खोटे बोलणार माणूस राजकारणात शोधून सापडणार नाही. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या दारात २०१७ ला आपला एकही टँकर नसल्याचे जाहीर केले, आणि त्यांचे चुलते आमचे ४० टँकर आहेत, म्हणून सांगतात.

लोकसभेला जननेते त्यांचा खरा चेहरा ओळखला, आताही तेच करतील. जिल्हा बँकेचे संचालक अशोक चराटी यांच्याबद्दल विचारले असता, अशोक चराटी यांच्याशी चर्चा झाली होती, स्थानिक राजकीय दबावापोटीच त्यांनी भूमिका बदलली असली तरी ते आमच्यासोबतच राहतील, असे मंत्री पाटील यांनी सांगितले.ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ म्हणाले, गोकुळमध्ये विरोधी आघाडीच्या विजयाची औपचारिकता राहिली आहे. सत्ता आमची येणारच आहे. गोकुळच्या कारभाराबाबत अनेक वर्षे आरोप ऐकत आहे, आता उबग आली असून सभासदांनी मताव्दारे या मंडळींना हुसकावून लावण्याची वेळ आली आहे. गोकुळमध्ये चुकीचे चालले आहे, ते थांबवण्यासाठी आम्हाला सत्ता हवी आहे. राजकीय अड्डा करण्याचा प्रश्नच नाही, आम्ही दोघेही मंत्री आहे, त्यामुळे गोकुळमध्ये आमचा जीव असायचे कारणच नाही. 

टॅग्स :Gokul MilkगोकुळElectionनिवडणूकSatej Gyanadeo Patilसतेज ज्ञानदेव पाटीलkolhapurकोल्हापूर