शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
3
Pahalgam Terror Attack : "मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
4
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
5
शिक्षक, स्पर्धा परीक्षांची तयारी अन् अचानक झाला गायब; २६ पर्यटकांना मारणारा आदिल दहशतवादी कसा बनला?
6
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला
7
वंदे भारत आणि शताब्दी एक्सप्रेस गाड्यांचा खरा मालक कोण? अनेकांच्या मनात गैरसमज
8
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
9
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
10
"मी दहशतवाद्यांना एकच गोष्ट सांगेन की..."; 'केसरी २'च्या स्क्रीनिंगला अक्षय कुमारचा संताप अनावर, काय घडलं?
11
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
12
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
13
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
14
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
15
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
16
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
17
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
18
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
19
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
20
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका

Maharashtra Assembly Election 2019 १३ दिवसात आमदार : उत्तर’मध्ये चंद्रकांत जाधव यांना लॉटरी-क्षीरसागर यांची हॅट्रीक हुकली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 24, 2019 18:35 IST

Maharashtra Assembly Election 2019 प्रत्येक फेरीत त्यांनी निर्णायक आघाडी घेत अखेरीस विजय संपादन केला. दहाव्या, तेराव्या आणि चौदाव्या फेरीत क्षीरसागर यांना बऱ्यापैकी मते मिळाली खरे पण त्यांना जाधवांची घोडदौड रोखणे अवघड झाले.

ठळक मुद्देजाधव यांना कॉँग्रेसचे तिकीट मिळाल्यापासून केवळ १३ दिवसात आमदार होण्याचा मान मिळाला.

कोल्हापूर : आमदार राजेश क्षीरसागर यांच्या हॅट्रीकला लगाम घालत कॉँग्रेसच्या चंद्रकांत जाधव यांनी पहिल्याच दणक्यात विजयी गोलची नोंद करीत ‘कोल्हापूर उत्तर’मध्ये तब्बल दहा वर्षांनी कॉँग्रेसचा झेंडा फडकावला. शिवसेनेत क्षीरसागर यांच्याबद्दल असलेल्या असंतोषाचा फायदा उठवत आणि कॉँग्रेस - राष्टÑवादीची मोट बांधत चंद्रकांत जाधव यांनी १५ हजार १९९ इतक्या मताधिक्याने विजय संपादन केला. जाधव यांना कॉँग्रेसचे तिकीट मिळाल्यापासून केवळ १३ दिवसात आमदार होण्याचा मान मिळाला.

कोल्हापूर उत्तर मतदार संघात झालेल्या १ लाख ७५ हजार ३२५ मतदानापैकी चंद्रकांत जाधव यांना ९१ हजार ०५३ तर राजेश क्षीरसारग यांना ७५ हजार ८५४ इतक ी मते मिळाली. भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे सतिशचंद्र कांबळे (१४८३ मते), वंचित आघाडीच्या राहूल राजहंश (११५४ मते) यांचा या निवडणुकीत दारुण पराभव होऊन डिपॉझिट सुध्दा जप्त झाली.

मतमोजणीच्या अगदी पहिल्या फेरीपासून चंद्रकांत जाधव आघाडीवर होते. पहिल्या फेरीत त्यांना ३९०० चे मताधिक्य मिळाले. तेथून त्यांच्या विजयाची घोडदौड सुरु झाली. नवव्या फेरीपर्यंत त्यांचे मताधिक्य १२ हजाराच्या पुढे गेले आणि त्याचवेळी त्यांच्या विजयाची खात्री झाली. प्रत्येक फेरीत त्यांनी निर्णायक आघाडी घेत अखेरीस विजय संपादन केला. दहाव्या, तेराव्या आणि चौदाव्या फेरीत क्षीरसागर यांना बऱ्यापैकी मते मिळाली खरे पण त्यांना जाधवांची घोडदौड रोखणे अवघड झाले.

जाधव यांना मतदार संघातील कसबा बावडा, लाईनबाजार, सदर बाजार, विचारेमाळ, कदमवाडी, जाधववाडी, रुईकर कॉलनी, ताराबाई पार्क, शाहूपुरी, महाराणा प्रतापचौक, अकबर मोहल्ला, गंजीमाळ, शिवाजी पेठ, मंगळवार पेठ, मिरजकर तिकटी सुसरबाग, वरुणतिर्थ राजारामपुरी, मातंगवसाहत या भागात मताधिक्य मिळाले आहे. तर राजेश क्षीरसागर यांना शुक्रवारपेठ, शाहू उद्यान, बाबुजमाल, उत्तरेश्वर, खोलखंडोबा, सिध्दार्थनगर, भवानी मंडप आदी भागात चांगली मते मिळाली. गेल्या दोन निवडणुकीत क्षीरसागर यांना बावडा, शिवाजी पेठ या भागात मोठे मताधिक्य मिळाले होते, याच भागात जाधव यांनी सुरुंग लावून त्यांचे मतदान फोडले. ताराबाई पार्क, शिवाजी पार्क, टाकाळा, साईक्स, उद्यमनगर या भागात दोघांनाही पन्नास पन्नास टक्के मते मिळाली.

  • क्षीरसागर यांना नाराजी नडली

निवडणुक जाहीर झाल्यापासून ‘क्षीरसागर नकोत’एवढी एकच भावना विविध घटकात निर्माण झाली होती. त्यामुळे हे सर्व घटक पहिल्या दिवसापासून प्रत्यक्ष अप्रत्यक्ष त्यांच्या पराभवासाठी कामाला लागले होते. भीमा कोरेगांव दंगलीवेळची वादग्रस्त भूमिकाही त्यांना चांगलीच भोवली.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019Electionनिवडणूकcongressकाँग्रेसkolhapur-pcकोल्हापूर