शहरं
Join us  
Trending Stories
1
'लाडकी बहीण'नंतर आणखी एका योजनेची घोषणा; महायुती सरकारची नोकरदार महिला वर्गाला मोठी भेट
2
"मर्सिडिज, महागडा फोन अन् ३५ लाख दिले तरीही..."; मृत्यूपूर्वी युवकाचा भाजपा नेत्यावर गंभीर आरोप
3
घर सोडले, गाव सोडले अन् निघाल्या थेट मुंबईकडे; टीसीच्या सतर्कतेमुळे 'त्या' दोघी सुखरूप बचावल्या
4
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
5
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
6
१८ किमी अंतर, २० मिनिटांचा वेळ...फिल्मी स्टाईलनं अर्चना तिवारीनं बदलला लूक, CCTV मध्ये कैद
7
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
8
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
9
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
10
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
11
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
12
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
13
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
14
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
15
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
16
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
17
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
18
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
19
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
20
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!

भारत-चीनचे ताणलेल्या सबंधाकडे संधी म्हणून पहा :चेतन नरके

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2020 17:06 IST

भारत-चीनचे ताणलेले सबंध व कोरोना या पार्श्वभूमीवर स्थानिक उद्योजकांनी याकडे संधी म्हणून पाहून तोच ट्रेंड पकडून काम केले तर यशस्वी होण्यास वेळ लागणार नाही. असा विश्वास थायलंडचे उपपंतप्रधानाचे वाणिज्य सल्लागार चेतन अरूण नरके यांनी लोकमतशी बोलताना व्यक्त केला.

ठळक मुद्देथायलंडचे वाणिज्य सल्लागार चेतन नरके यांचे स्थानिक उद्योजकांना आवाहन जागतिक पातळीवर सगळ्यांशी संबध बिघडवणे चीनला अडचणीचे

कोल्हापूर : चीनच्या उत्पादनांवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय केवळ भावनिक करून चालणार नाही. त्याचा फटका दोन्ही देशांच्या अर्थव्यवस्थेला बसू शकतो, जागतिक पातळीवर सर्वच देशांशी बिघडलेले सबंध चीनला भविष्यात अडचणीचे ठरू शकतात. भारत-चीनचे ताणलेले सबंध व कोरोना या पार्श्वभूमीवर स्थानिक उद्योजकांनी याकडे संधी म्हणून पाहून तोच ट्रेंड पकडून काम केले तर यशस्वी होण्यास वेळ लागणार नाही. असा विश्वास थायलंडचे उपपंतप्रधानाचे वाणिज्य सल्लागार चेतन अरूण नरके यांनी लोकमतशी बोलताना व्यक्त केला.चेतन नरके यांनी मंगळवारी लोकमत कार्यालयास सदिच्छा भेट देत भारत-चीन मधील ताणलेले सबंध आणि कोरोनामुळे घसरलेला जेडीपी यावर सविस्तर चर्चा केली.

नरके म्हणाले, चीनी वस्तूंवर बहिष्कार टाकणे हा भावनिक मुद्दा असला तरी अर्थकारणाचा विचार केला पाहिजे. आपली औषध, खते, आयर्न, स्टील निर्मिती चीनवर अवलंबून आहे. भारतात ज्या प्रमाणे शेतीला अनुदान दिले जाते, त्याप्रमाणे तिथे इलेक्ट्रॉनिक वस्तूंसह इतर उत्पादनांवर अनुदान दिले जात असल्याने त्यांना कमी दरात विक्री करणे परवडते. आपण चीन ५ टक्के निर्यात करतो मात्र १४ टक्के चीनमधून आयात करत आहे. यावरून आपले मार्केट चीनी उत्पादनांनी किती काबीज केले हे स्पष्ट होते.चीनशी बिघडलेले संबधांचा कमी अधिक प्रमाणात सर्वच देशांना फायदा, तोटा होणार आहे. थायलंडची अर्थव्यवस्था सक्षम होण्यात तेथील पर्यटन व्यवसायाचा खूप हातभार आहे. भारतातून दर वर्षी २० लाख पर्यटक थायलंडला जातात. थायलंड मध्ये काही रेडलाईट भाग आहे, ते म्हणजे थायलंड नव्हे तर त्यापेक्षाही येथील शेती, मासेमारी, पर्यटन ही त्यांची बळस्थाने आहेत. थायलंडकडून ही गोष्ट भारताला पर्यायाने महाराष्ट्राला घेण्यासारखी आहे.

महाराष्ट्रात गडकोट किल्ले आहेत, यासह एकूणच पर्यटन स्थले विकसीत केली तर परदेशी पर्यटकांचा ओढा सुरू होईल, आणि यातून किमान ९ लाख रोजगार उपलब्ध होऊ शकतील. याबाबत आपण राज्याचे पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांच्याशी चर्चा केली असून ते सकारत्मक आहेत. नागरी सहकारी बँकांवर रिझर्व्ह बँकेने स्वतंत्र यंत्रणेच्या माध्यमातून अंकुश आणला, हे चांगले आहे. सहकार आणि रिझर्व्ह बँकेंने एकत्रित येऊन काम केले तर सहकार चळवळ बळकट होण्यास मदत होईल, असा विश्वास चेतन नरके यांनी व्यक्त केला. यावेळी लोकमतचे वरिष्ठ सरव्यवस्थापक मकरंद देशमुख, मुख्य बातमीदार विश्वास पाटील आदी उपस्थित आहे. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याkolhapurकोल्हापूर