शहरं
Join us  
Trending Stories
1
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
2
पहलगाम हल्ल्यानंतर घेतलेल्या भूमिकेवरून काँग्रेसनं मोदींना घेरलं, हे चार प्रश्न उपस्थित करून केली कोंडी
3
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
4
बंगळुरूत 'पाकिस्तान जिंदाबाद' म्हणणाऱ्या व्यक्तीला बेदम मारहाण, जागीच मृत्यू; गृहमंत्री म्हणाले...
5
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
6
बाजार सपाट पातळीवर बंद; रिलायन्सचा शेअर पुन्हा आला धावून, 'या' सेक्टरवर दबाव
7
ATM मधून वारंवार पैसे काढायची सवय असेल तर ती बदला, नाहीतर १ मे पासून होईल नुकसान
8
अण्वस्त्रांची धमकी देणाऱ्या पाकिस्तानच्या संरक्षण मंत्र्यांचे तोंड भारताने केले बंद; एक्स अकाउंटवर घातली बंदी
9
Viral Video: बिबट्या थेट पोलीस ठाण्यातच आला! पोलिसाने पाहिलं, पण नंतर काय घडलं?
10
इलेक्ट्रिक व्हेईकल घेणाऱ्यांसाठी CM फडणवीसांची मोठी घोषणा; टोलमाफी देण्याचा मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय
11
...म्हणून मुलाचं नाव बॉबी ठेवलं! किशोरी शहाणेंनी सांगितलं कारण, म्हणाल्या- "मी मराठी, नवरा पंजाबी आणि सासू..."
12
Mumbai Accident: ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न अंगलट; दुचाकीवर पाठी बसलेल्या तरुणीचा ट्रकखाली चिरडून मृत्यू
13
पाकिस्तानने कुठे लपवलाय अण्वस्त्रांचा साठा? 'या' अहवालाने केली पाकची पोलखोल...
14
Pune: पुण्याच्या विमानतळ परिसरात बिबट्या, सगळ्यांना फुटला घाम; तुम्ही व्हिडीओ बघितला का?
15
डॉलरच्या तुलनेत रुपयाची जोरदार कामगिरी; आशियातील सर्वात मजबूत चलन, ही आहेत ५ कारणे
16
टक्केवारीच्या आरोपानंतर परभणीचे जिल्हा नियोजन अधिकारी कार्यमुक्त; अधिकाऱ्यांमध्ये खळबळ
17
पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठीचा प्लॅन तयार, पंतप्रधान मोदी बुधवारी घेणार चार बैठका, त्यानंतर...  
18
'बुके नको बुकं द्या'! बिरदेव डोणेचं आवाहन, बॉलिवूड अभिनेत्रीच्या बॉयफ्रेंडने पाठवली हजार पुस्तकं
19
'जबाबदारीच्या वेळीच बेपत्ता'; काँग्रेसचा PM मोदींवर वार, भाजपचे नेतेही भडकले
20
इन्फोसिसमध्ये वर्षात तिसरी नोकरकपात! १९५ कर्मचाऱ्यांना दाखवला बाहेरचा रस्ता; काय आहे कारण?

भारत-चीनचे ताणलेल्या सबंधाकडे संधी म्हणून पहा :चेतन नरके

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2020 17:06 IST

भारत-चीनचे ताणलेले सबंध व कोरोना या पार्श्वभूमीवर स्थानिक उद्योजकांनी याकडे संधी म्हणून पाहून तोच ट्रेंड पकडून काम केले तर यशस्वी होण्यास वेळ लागणार नाही. असा विश्वास थायलंडचे उपपंतप्रधानाचे वाणिज्य सल्लागार चेतन अरूण नरके यांनी लोकमतशी बोलताना व्यक्त केला.

ठळक मुद्देथायलंडचे वाणिज्य सल्लागार चेतन नरके यांचे स्थानिक उद्योजकांना आवाहन जागतिक पातळीवर सगळ्यांशी संबध बिघडवणे चीनला अडचणीचे

कोल्हापूर : चीनच्या उत्पादनांवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय केवळ भावनिक करून चालणार नाही. त्याचा फटका दोन्ही देशांच्या अर्थव्यवस्थेला बसू शकतो, जागतिक पातळीवर सर्वच देशांशी बिघडलेले सबंध चीनला भविष्यात अडचणीचे ठरू शकतात. भारत-चीनचे ताणलेले सबंध व कोरोना या पार्श्वभूमीवर स्थानिक उद्योजकांनी याकडे संधी म्हणून पाहून तोच ट्रेंड पकडून काम केले तर यशस्वी होण्यास वेळ लागणार नाही. असा विश्वास थायलंडचे उपपंतप्रधानाचे वाणिज्य सल्लागार चेतन अरूण नरके यांनी लोकमतशी बोलताना व्यक्त केला.चेतन नरके यांनी मंगळवारी लोकमत कार्यालयास सदिच्छा भेट देत भारत-चीन मधील ताणलेले सबंध आणि कोरोनामुळे घसरलेला जेडीपी यावर सविस्तर चर्चा केली.

नरके म्हणाले, चीनी वस्तूंवर बहिष्कार टाकणे हा भावनिक मुद्दा असला तरी अर्थकारणाचा विचार केला पाहिजे. आपली औषध, खते, आयर्न, स्टील निर्मिती चीनवर अवलंबून आहे. भारतात ज्या प्रमाणे शेतीला अनुदान दिले जाते, त्याप्रमाणे तिथे इलेक्ट्रॉनिक वस्तूंसह इतर उत्पादनांवर अनुदान दिले जात असल्याने त्यांना कमी दरात विक्री करणे परवडते. आपण चीन ५ टक्के निर्यात करतो मात्र १४ टक्के चीनमधून आयात करत आहे. यावरून आपले मार्केट चीनी उत्पादनांनी किती काबीज केले हे स्पष्ट होते.चीनशी बिघडलेले संबधांचा कमी अधिक प्रमाणात सर्वच देशांना फायदा, तोटा होणार आहे. थायलंडची अर्थव्यवस्था सक्षम होण्यात तेथील पर्यटन व्यवसायाचा खूप हातभार आहे. भारतातून दर वर्षी २० लाख पर्यटक थायलंडला जातात. थायलंड मध्ये काही रेडलाईट भाग आहे, ते म्हणजे थायलंड नव्हे तर त्यापेक्षाही येथील शेती, मासेमारी, पर्यटन ही त्यांची बळस्थाने आहेत. थायलंडकडून ही गोष्ट भारताला पर्यायाने महाराष्ट्राला घेण्यासारखी आहे.

महाराष्ट्रात गडकोट किल्ले आहेत, यासह एकूणच पर्यटन स्थले विकसीत केली तर परदेशी पर्यटकांचा ओढा सुरू होईल, आणि यातून किमान ९ लाख रोजगार उपलब्ध होऊ शकतील. याबाबत आपण राज्याचे पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांच्याशी चर्चा केली असून ते सकारत्मक आहेत. नागरी सहकारी बँकांवर रिझर्व्ह बँकेने स्वतंत्र यंत्रणेच्या माध्यमातून अंकुश आणला, हे चांगले आहे. सहकार आणि रिझर्व्ह बँकेंने एकत्रित येऊन काम केले तर सहकार चळवळ बळकट होण्यास मदत होईल, असा विश्वास चेतन नरके यांनी व्यक्त केला. यावेळी लोकमतचे वरिष्ठ सरव्यवस्थापक मकरंद देशमुख, मुख्य बातमीदार विश्वास पाटील आदी उपस्थित आहे. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याkolhapurकोल्हापूर