शहरं
Join us  
Trending Stories
1
'शांतता चर्चा केली नाही तर युक्रेनचा आणखी भाग बळकावू'; व्लादिमीर पुतीन यांची धमकी, युरोपीय नेत्यांना म्हणाले डुकराच्या औलादी
2
अमेरिकेची आणखी २० देशांना 'नो एंट्री'; राष्ट्रीय सुरक्षेसाठी डोनाल्ड ट्रम्पच्या सरकारने घेतला निर्णय
3
Ram Sutar: शिल्पकलेचा उपासक काळाच्या पडद्याआड! महाराष्ट्र भूषण राम सुतार यांचे निधन
4
'धुरंधर'ला मिळालेलं प्रेम पाहून अखेर अक्षय खन्नाने दिली पहिली प्रतिक्रिया, तीन शब्दांत म्हणाला-
5
दिल्ली-एनसीआर दाट धुक्यात बुडाले, IND विरुद्ध SA चौथा T20I सामना रद्द; दृश्यमानता शून्यावर
6
SEBI नं तीन दशकं जुन्या ब्रोकिंगच्या नियमांत केले महत्त्वाचे बदल; अनेक मोठ्या सुधारणांनाही मंजुरी, जाणून घ्या
7
...तर पाकिस्तानात उद्रेक होणार?, फिल्ड मार्शल असीम मुनीर संकटात सापडले; अमेरिकेचा दबाव वाढला
8
नाशिकमध्ये भाजपा-शिंदेसेना महायुतीत ८५-३७ चा फॉर्म्युला; उद्धवसेना-मनसेचं तगडं आव्हान
9
आजचे राशीभविष्य, १८ डिसेंबर २०२५: या राशींना धनप्राप्ती होईल, आज यांचे विवाह जुळतील
10
आता कुठे गेले कोपर-ढोपर? आयपीएलचे करोडोंचे लिलाव आणि हतबल शेतकऱ्याची 'किडनी' विक्री
11
जास्त पीक! शेतात तयार झाल्या प्रचंड 'विहिरी'! तुर्कीतील शेतकऱ्यांनी स्वतःहून ओढवून घेतलेली आपत्ती
12
शरद पवार गट काँग्रेसची साथ सोडून ठाकरे बंधूंच्या आघाडीत सहभागी?
13
कोकाटेंना भोवला सदनिका घोटाळा; आमदारकी गेली, खाते काढून घेतले!
14
कार्गो वाहतूक नवी मुंबईहून झाल्यास राज्याला फायदा; वाहतूककोंडीवर मात करण्यास होणार मदत
15
किडनी विक्रीमागे सावकारी की आंतरराष्ट्रीय तस्करी?; शेतकऱ्याला कंबोडियाला पाठविणारा डॉ. क्रिष्णा पोलिसांच्या रडारवर
16
डॉ. आंबेडकर यांचा पुतळा युनेस्कोच्या मुख्यालयात हे देशासाठी गौरवास्पद! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे उद्‌गार 
17
काँग्रेस 'मविआ'त नाही; आता मनसे, उद्धवसेनेची आघाडी, मुंबई महापालिकेचे गणित बदलले
18
भारतीय चवीचा जागतिक गौरव! जगभरातील सर्वोत्तम गोड पदार्थांत कुल्फी, फिरनीचा समावेश
19
आता टोल नाक्यांवर एआय, जाता येणार ८०च्या स्पीडने; थांबण्याची अन् ट्रॅफिकची कटकट संपणार, २०२६ मध्ये अंमलबजावणी
20
अणुऊर्जा क्षेत्र आता खासगी क्षेत्रासाठी खुले होणार; शांती विधेयक लोकसभेत बहुमताने मंजूर!
Daily Top 2Weekly Top 5

दीर्घकालीन अनुभवाने विजयाची खात्री, महाराष्ट्र महिला क्रिकेट संघाची कर्णधार अनुजा पाटीलने व्यक्त केला विश्वास

By सचिन यादव | Updated: December 5, 2024 17:04 IST

मूळची कोल्हापूरची असलेली आणि वयाच्या अकराव्या वर्षी बॅट हातात घेतलेली अनुजा एक धडाकेबाज फलंदाज तर आहेच, शिवाय उत्तम ऑफ ...

मूळची कोल्हापूरची असलेली आणि वयाच्या अकराव्या वर्षी बॅट हातात घेतलेली अनुजा एक धडाकेबाज फलंदाज तर आहेच, शिवाय उत्तम ऑफ स्पिन गोलंदाजही आहे. उजव्या हाताने फलंदाजी आणि ऑफब्रेक गोलंदाजी करते. अष्टपैलू कामगिरी कामगिरी केलेल्या अनुजा पाटील यांची महाराष्ट्र महिला क्रिकेट संघाच्या कर्णधारपदी निवड झाली. या यशाबद्दल लोकमतने त्यांना बोलते केले.सचिन यादवकोल्हापूर : दीर्घकालीन अनुभवामुळे स्पर्धेत विजयाची खात्री आहे. सामन्यात सांघिक कौशल्य दिसेल. महाराष्ट्र वरिष्ठ महिला क्रिकेट संघात यंगस्टार आणि वरिष्ठ महिला असा मिलाफ आहे. कर्णधारपदामुळे माझ्या सहकाऱ्यांबद्दल सहानुभूती निर्माण झाली. जे सांघिक खेळात खूप महत्त्वाचे असते. त्यामुळे माझ्या नेतृत्व कौशल्यात आणि माझ्या खेळातही कमालीची सुधारणा झाली. दिल्ली येथे होत असलेल्या स्पर्धेतही विजयश्री खेचून आणू, असा विश्वास महाराष्ट्र महिला क्रिकेट संघाच्या कर्णधार अनुजा पाटील यांनी व्यक्त केला .

कर्णधारपदाची भूमिका काय असते?कर्णधार हा खूप महत्त्वाचा आणि वैयक्तिकरित्या सर्वांना बरोबर घेवून जाणारा असतो. या जबाबदारीने माझ्या कारकीर्दीला आकार देण्यास खूप मदत केली. ते सामन्याची तयारी, तंत्र सुधारणा आणि खेळापूर्वी खेळाडूची मानसिकता तयार करण्याचे तंत्र माझ्या प्रशिक्षकांकडून शिकले. त्यांनी दिलेल्या अनुभवाचा करिअरमध्ये फायदा होत आहे. प्रतिभा स्वतःमध्ये असते परंतु प्रशिक्षक ती कौशल्ये अधिक धारदार करण्यास मदत करतो.

क्रिकेट खेळणाऱ्या तरुण मुलींसाठी काय संदेशसध्याच्या काळात जग बदलले आहे. मुली सर्वच क्षेत्रात अग्रेसर आहेत. अनेक ठिकाणी अकॅडमीमध्ये सुविधा चांगल्या पद्धतीने मिळत आहेत. मात्र त्यासह कठोर परिश्रम करणे, लक्ष केंद्रित करणे, सुविधांचा सुज्ञपणे वापर करणे आणि फिटनेसवर लक्ष देणे अत्यंत महत्वाचे आहे.

क्रिकेटमध्ये करिअर आहे काखेळाडूंना आता पूर्वीपेक्षा वेगळी ओळख, मान्यता आणि करार मिळत आहेत. भारतात महिला क्रिकेट बदलत आहे. लोक महिला क्रिकेट मध्ये अधिक रस घेत आहेत. शहरासह, ग्रामीण भाग, गल्लोगल्ली तरुण मुलीही क्रिकेट खेळू लागल्या आहेत. पालक त्यांच्या मुलींना करिअरचा पर्याय म्हणून क्रिकेटकडे पाहत असल्याने त्यांना अधिक पाठिंबा मिळत आहे.

कोणत्या संघासोबत सामने होणार आहेतदिल्ली येथे एकदिवशीय स्पर्धा होणार आहेत. महाराष्ट्र, सौराष्ट्र, हरियाणा , विदर्भ, उत्तरप्रदेश, बिहार आणि पंजाब या संघात ६ सामने होतील. या स्पर्धेत सौराष्ट्रासोबत झालेल्या पहिल्याच सामन्यात महाराष्ट्राच्या संघाने विजयी सलामी दिली आहे.

संघाला काय तंत्र दिलेएखाद्याची ताकद आणि संघाच्या गरजा जाणून घेतल्याने या फॉरमॅटमध्ये मदत होते आणि मी तेच करण्याचा प्रयत्न करते. क्षेत्ररक्षण अत्यंत महत्त्वाचे आहे. कारण त्यामुळे संघाच्या त्या अतिरिक्त धावा वाचवल्या जातात. ज्या खूप पुढे जातात आणि गोलंदाजांनाही मदत करतात.

टॅग्स :kolhapurकोल्हापूर