शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
2
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
3
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
4
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
5
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
6
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
7
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
8
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
9
ती माझी मैत्रीण! दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीबाबत एल्विश यादवचा खुलासा, म्हणाला- "तो फोटो पाहिल्यानंतर..."
10
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
11
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
12
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
13
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
14
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
15
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या
16
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
17
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थयथयाट
18
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
19
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
20
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!

दीर्घकालीन अनुभवाने विजयाची खात्री, महाराष्ट्र महिला क्रिकेट संघाची कर्णधार अनुजा पाटीलने व्यक्त केला विश्वास

By सचिन यादव | Updated: December 5, 2024 17:04 IST

मूळची कोल्हापूरची असलेली आणि वयाच्या अकराव्या वर्षी बॅट हातात घेतलेली अनुजा एक धडाकेबाज फलंदाज तर आहेच, शिवाय उत्तम ऑफ ...

मूळची कोल्हापूरची असलेली आणि वयाच्या अकराव्या वर्षी बॅट हातात घेतलेली अनुजा एक धडाकेबाज फलंदाज तर आहेच, शिवाय उत्तम ऑफ स्पिन गोलंदाजही आहे. उजव्या हाताने फलंदाजी आणि ऑफब्रेक गोलंदाजी करते. अष्टपैलू कामगिरी कामगिरी केलेल्या अनुजा पाटील यांची महाराष्ट्र महिला क्रिकेट संघाच्या कर्णधारपदी निवड झाली. या यशाबद्दल लोकमतने त्यांना बोलते केले.सचिन यादवकोल्हापूर : दीर्घकालीन अनुभवामुळे स्पर्धेत विजयाची खात्री आहे. सामन्यात सांघिक कौशल्य दिसेल. महाराष्ट्र वरिष्ठ महिला क्रिकेट संघात यंगस्टार आणि वरिष्ठ महिला असा मिलाफ आहे. कर्णधारपदामुळे माझ्या सहकाऱ्यांबद्दल सहानुभूती निर्माण झाली. जे सांघिक खेळात खूप महत्त्वाचे असते. त्यामुळे माझ्या नेतृत्व कौशल्यात आणि माझ्या खेळातही कमालीची सुधारणा झाली. दिल्ली येथे होत असलेल्या स्पर्धेतही विजयश्री खेचून आणू, असा विश्वास महाराष्ट्र महिला क्रिकेट संघाच्या कर्णधार अनुजा पाटील यांनी व्यक्त केला .

कर्णधारपदाची भूमिका काय असते?कर्णधार हा खूप महत्त्वाचा आणि वैयक्तिकरित्या सर्वांना बरोबर घेवून जाणारा असतो. या जबाबदारीने माझ्या कारकीर्दीला आकार देण्यास खूप मदत केली. ते सामन्याची तयारी, तंत्र सुधारणा आणि खेळापूर्वी खेळाडूची मानसिकता तयार करण्याचे तंत्र माझ्या प्रशिक्षकांकडून शिकले. त्यांनी दिलेल्या अनुभवाचा करिअरमध्ये फायदा होत आहे. प्रतिभा स्वतःमध्ये असते परंतु प्रशिक्षक ती कौशल्ये अधिक धारदार करण्यास मदत करतो.

क्रिकेट खेळणाऱ्या तरुण मुलींसाठी काय संदेशसध्याच्या काळात जग बदलले आहे. मुली सर्वच क्षेत्रात अग्रेसर आहेत. अनेक ठिकाणी अकॅडमीमध्ये सुविधा चांगल्या पद्धतीने मिळत आहेत. मात्र त्यासह कठोर परिश्रम करणे, लक्ष केंद्रित करणे, सुविधांचा सुज्ञपणे वापर करणे आणि फिटनेसवर लक्ष देणे अत्यंत महत्वाचे आहे.

क्रिकेटमध्ये करिअर आहे काखेळाडूंना आता पूर्वीपेक्षा वेगळी ओळख, मान्यता आणि करार मिळत आहेत. भारतात महिला क्रिकेट बदलत आहे. लोक महिला क्रिकेट मध्ये अधिक रस घेत आहेत. शहरासह, ग्रामीण भाग, गल्लोगल्ली तरुण मुलीही क्रिकेट खेळू लागल्या आहेत. पालक त्यांच्या मुलींना करिअरचा पर्याय म्हणून क्रिकेटकडे पाहत असल्याने त्यांना अधिक पाठिंबा मिळत आहे.

कोणत्या संघासोबत सामने होणार आहेतदिल्ली येथे एकदिवशीय स्पर्धा होणार आहेत. महाराष्ट्र, सौराष्ट्र, हरियाणा , विदर्भ, उत्तरप्रदेश, बिहार आणि पंजाब या संघात ६ सामने होतील. या स्पर्धेत सौराष्ट्रासोबत झालेल्या पहिल्याच सामन्यात महाराष्ट्राच्या संघाने विजयी सलामी दिली आहे.

संघाला काय तंत्र दिलेएखाद्याची ताकद आणि संघाच्या गरजा जाणून घेतल्याने या फॉरमॅटमध्ये मदत होते आणि मी तेच करण्याचा प्रयत्न करते. क्षेत्ररक्षण अत्यंत महत्त्वाचे आहे. कारण त्यामुळे संघाच्या त्या अतिरिक्त धावा वाचवल्या जातात. ज्या खूप पुढे जातात आणि गोलंदाजांनाही मदत करतात.

टॅग्स :kolhapurकोल्हापूर