शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
3
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
4
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
5
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
6
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
7
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
8
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
9
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
10
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
11
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
12
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान
13
"कपडे काढून बस अन्...", साजिद खानने अभिनेत्रीकडे केली होती विचित्र मागणी; म्हणाली...
14
"....नाहीतर मी मेलो असतो"; केदार शिंदेंच्या आयुष्यात स्वामी समर्थ कसे आले?
15
Astro Tips: अचूक उत्तर मिळण्यासाठी ज्योतिषांकडे एखादा प्रश्न घेऊन कधी जायला हवे? जाणून घ्या!
16
सुनील मित्तल यांच्यानंतर मुकेश अंबानीही पुढे आले; चीनच्या 'या' कंपनीच्या मागे का पडलेत हे दिग्गज?
17
दहशतवाद्यांचा, हल्ल्यांचा आकडा ! गेल्या ३२ वर्षांत २३,३८६ दहशतवादी मारले; ६४१३ जवान शहीद झाले
18
इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांना आता ४० नाही तर फक्त ५ दिवसात मिळणार अनुदान; कसा करायचा अर्ज?
19
१ मेपासून बदलणार पैशांशी निगडीत हे नियम; खिशावर होणार थेट परिणाम
20
"माझा विनयभंग झाला असता", अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक प्रसंग; धोनीला अवॉर्ड दिल्यानंतर...

कृषी विभाग अखेर झाला जागा; कोल्हापुरात तेरा भरारी पथकांद्वारे लिंकिंग तपासणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2025 15:12 IST

दोन दिवसांत अहवाल सादर करण्याचे आदेश : गुणनियंत्रण निरीक्षकांवर जबाबदारी

कोल्हापूर : युरियासह इतर खतांवर शेतकऱ्यांना नको असणारी रासायनिक खते माथी मारली जात आहेत. विशेष म्हणजे आरोग्यमंत्री प्रकाश आबीटकर यांनी लिकिंग करणाऱ्याविरोधात कारवाईचे आदेश दिले असतानाही राजरोसपण लिकिंग दिले जाते, हा विषय ‘लोकमत’ने लावून धरल्यानंतर कृषी विभागाला अखेर जाग आली. त्यांनी जिल्ह्यात तेरा भरारी पथकाद्वारे घाऊक व किरकोळ खतविक्रेत्यांची तपासणी करण्याचे आदेश दिले आहेत. दोन दिवसात याबाबतचा अहवाल सादर केला जाणार आहे.खत उत्पादक कंपन्या शेतकऱ्यांना नको असणारी खते विक्रेत्यांच्या माध्यमातून देतात, या तक्रारीबद्दल दि. ६ जानेवारी रोजी आरोग्यमंत्री प्रकाश आबीटकर यांनी खत कंपन्या व विक्रेत्यांची बैठक शासकीय विश्रामगृहात घेतली होती. लिकिंग करणाऱ्याविरोधात थेट कारवाई करण्याचे आदेश त्यांनी दिले होते. तरीही, कंपन्यांची मग्रुरी वाढल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत.याबाबत, ‘लोकमत’ने सातत्याने आवाज उठविल्यानंतर कृषी विभागाने तपासणीचा धडाका लावला आहे. जिल्ह्यातील सर्व गुणनियंत्रण निरीक्षकांना तपासणी करण्याचे आदेश काढले. त्यानुसार तेरा भरारी पथकामार्फत विक्रेत्यांची तपासणी सुरू झाली आहे. यामध्ये जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी जालिंदर पांगरे, जिल्हा परिषदेच्या कृषी विकास अधिकारी सारिका रेपे, मोहीम अधिकारी सुशांत लव्हटे, जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक संभाजी शेणवे, पंचायत समितीचे कृषी अधिकारी सतीश देशमुख हे उपस्थित होते.‘आरसीएफ’, ‘चंबळ’ वर नजरदोन-तीन दिवसांपूर्वी लागलेल्या रेकमध्ये ‘आरसीएफ’ व ‘चंबळ’ या खत उत्पादक कंपनीचे खत वाटप सुरू आहे. खत उपलब्ध झालेल्या विक्रेत्यांची तपासणी सुरू असून, त्यांनी काही लिकिंग दिले का? याची माहितीही घेतली जात आहे.

रब्बी हंगामामध्ये जिल्ह्यासाठी खतांची उपलब्धता व वाटपाबाबत नियोजन करण्यात आले असून, मंजूर आवंटनाप्रमाणे खताची पुरेशी उपलब्धतता आहे. - सारिका रेपे, कृषी विकास अधिकारी, जिल्हा परिषद

टॅग्स :kolhapurकोल्हापूरAgriculture Sectorशेती क्षेत्र