शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली स्फोट प्रकरणात नवा खुलासा; डॉ. शाहीन अन् डॉ. परवेज सख्खे भाऊ बहीण, तपासात काय सापडलं?
2
"पाकिस्तान युद्ध स्थितीत..." इस्लामाबादमध्ये आत्मघाती हल्ला, संरक्षण मंत्री संतापले, टार्गेटवर कोण? 
3
कॉलेज तरुणीने उबर बुक केली...! अपघात झाला अन् ड्रायव्हर पळाला; आईने कंपनीला तीन प्रश्न विचारले...
4
Delhi Red Fort Blast : अल फलाह विद्यापीठाच्या प्रयोगशाळेत आरडीएक्स तयार केले होते? ८०० पोलिस आणि एनआयए तपास करणार
5
बाजारात 'रिकव्हरी'चा वेग! महिंद्रा-अदाणी कंपनीचे शेअर्स सुस्साट! टाटा-बजाज आपटले
6
दिल्ली स्फोट: दुसऱ्या दिवशी सकाळी झाडावर लटकलेला मृतदेह सापडला; मृतांचा आकडा १० वर...
7
"मी २०३० मध्ये IAS होऊनच...", कुटुंबाचा लग्नासाठी दबाव, ९२% मिळालेल्या टॉपरने सोडलं घर
8
सुझलॉन एनर्जीचे शेअर्स ३०% घसरले! गुंतवणूकदारांनी काय करावं? ब्रोकरेज फर्मने दिलं रेटींग
9
Delhi Red Fort Blast : दिल्ली स्फोट प्रकरणात देवेंद्र आणि दिनेश कनेक्शन; कोण आहेत 'ही' दोन नावं?
10
"बाय बाय मुंबई, मी लवकरच...", प्राजक्ता माळी अचानक चालली तरी कुठे?, चाहते पडले चिंतेत
11
अमेरिकेतून भारतासाठी आली आनंदाची बातमी! 'या' कंपन्यांच्या शेअर्समध्ये मोठी तेजी, गुंतवणूकदारांच्या उड्या
12
Delhi Blast : देशभरात हायअलर्ट! दिल्ली कार स्फोटाचा तपास NIA करणार; गृह मंत्रालयाचा मोठा निर्णय
13
कालभैरव जयंती २०२५: कालभैरवाच्या कृपेने 'या' ८ राशींच्या आयुष्यात घडणार अविस्मरणीय घटना!
14
पहलगामनंतर आता दिल्ली..; 7 महिन्यात 41 भारतीयांचा मृत्यू, काँग्रेसचा मोदी-शाहांवर निशाणा
15
पाकिस्तानी क्रिकेटर संघासोबत असताना घरावर गोळीबार, खिडक्या फुटल्या, कुटुंबीयांमध्येही घबराट
16
Groww IPO Allotment and GMP: ग्रे मार्केटमध्ये Groww ची स्थितीही वाईट; उच्चांकापासून ८२% घसरली किंमत; कसं चेक कराल तुम्हाला शेअर्स मिळाले की नाही?
17
वाहतूककोंडीचा त्रास संपवण्यासाठी AI तंत्रज्ञानावर आधारित अद्ययावत टोल नाक्याचा प्रस्ताव
18
घोसाळकरांना धक्का, पेडणेकरांचा मार्ग मोकळा; मुंबई मनपा आरक्षण सोडत जाहीर! जाणून घ्या संपूर्ण यादी...
19
Delhi Red Fort Blast : स्फोट प्रकरणात पुलवामा कनेक्शन समोर; डॉ. उमरचा जवळचा मित्र डॉ. सज्जाद अहमद याला अटक
20
Video - रीलचा नाद लय बेक्कार! व्यूजसाठी घरी केला खतरनाक स्टंट; गरम तव्यावर बसला अन्...

करंजे, एजिवडे, दाउतवाडी या गावांचा रेंगाळलेला पुनर्वसन प्रश्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2021 04:23 IST

राधांनगरी अभयारण्यातील करंजे, एजिवडे, दाउतवाडी या गावांचा रेंगाळलेला पुनर्वसन प्रश्न भाग-१ संजय पारकर/ लोकमत न्यूज नेटवर्क/ राधांनगरी : ...

राधांनगरी अभयारण्यातील करंजे, एजिवडे, दाउतवाडी या गावांचा रेंगाळलेला पुनर्वसन प्रश्न भाग-१

संजय पारकर/ लोकमत न्यूज नेटवर्क/

राधांनगरी : राधांनगरी अभयारण्यात वन्यजीव संपदेचा असलेला मोठा साठा सवर्धन करण्यासाठी यात समाविष्ट असलेल्या वाड्या-वस्त्यांचे पुनर्वसन करण्याचा निर्णय २0 वर्षांपूर्वी झाला. त्यासाठी गावोगावी गावसभा झाल्या. येथे अनेक अडचणींना तोंड देऊन वैतागलेल्या लोकांनी पुनर्वसनाला समंती दिली. यावेळी झालेल्या पाहणीत १२ महसुली गावातील ३० वाड्यांतील ११५६ कुटुंबे, १४९९ खातेदार त्यांची १४७७ घरे व २४११.९८ हेक्टर जमीन बाधित होत होती. या शिवाय दूधगंगा धरणाच्या काठावरील अगोदर विस्थापित झालेल्या ८ गावांतील ४११ खातेदारांची ५२९ हेक्टर शिल्लक जमीन संपादित करावी लागेल, असा अहवाल तयार झाला.

२०१० मध्ये केलेल्या अंदाजपत्रकानुसार यासाठी २१४.८२ कोटी निधी लागणार होता. मात्र आतापर्यंत एकाही गावाचे पूर्णपणे पुनर्वसन झालेले नाही. करंजे, एजिवडे, दाउतवाडी या तीन गावांची सुरू असलेली पुनर्वसन प्रक्रियाही अर्धवट आहे.यावर १८.३० कोटी खर्च पडले आहेत. अजून १८.५६ कोटी निधीची गरज आहे. मात्र अनेक वर्षे विविध पातळीवर पाठपुरावा सुरू असूनही त्याची तरतूद झालेली नाही. यामुळे ना वन्यजिवांच्या सुरक्षेसाठी लोकांना स्थलांतर करण्याचा उद्देश सफल झाला ना लोकांची गैरसोय दूर झाली अशी स्थिती आहे.

संस्थान काळात शाहू महाराजांनी दाजीपूरचे हे जंगल शिकरीसाठी राखीव ठेवले होते. स्वातंत्र्यानंतर १९५८ साली याचे राज्यातील पहिले अभयारण्य करण्यात आले. येथे विपूल व दुर्मिळ जैववैविध्य असल्याने १९८५ मध्ये त्याचा विस्तार करण्यात आला त्याचे क्षेत्रफळ ३५१.१४ चौरस किमी झाले. यात राधांनगरी तालुक्यातील सलग्न १२ गावांतील २९ वाड्या-वस्त्या व गगनबावडा तालुक्यातील एका गावांचा समावेश झाला. मात्र त्यावेळी या लोकांना कोणत्याही प्रकारची माहिती दिली नव्हती.

जसजसे वन्यजीव विभागाचे निर्बंध सुरू झाले अशी लोकांची गैरसोय सुरू झाली. लोकांची ओरड सुरू झाल्यावर २००० सालात महसूल व वन्यजीव विभागाने लोकांचे हक्क व सवलतीची पाहणी केली. यासाठी प्रत्येक गावात गावसभा झाल्या. यात बहुतांशी गावांनी आपले पुनर्वसन करावे, अशी मागणी केली. मात्र याचा सविस्तर अहवाल होण्यासाठी दहा वर्षे लागली.

ठळक- अभयारण्य होण्यापूर्वी येथील लोकं जंगलातील मध, डिंक, हिरडा, बेहडा, तमालपत्री यांसारख्या वनउपज वस्तू जमा करून विकत असत, वनविभाग त्यासाठी लिलाव करत असे. मात्र हे सर्व आता बंद झाले आहे. हा सर्व परिसर केवळ पावसाळ्यातील पिकावर अवलंबून आहे. त्यामुळे लोकांना रोजगारासाठी मोठ्या शहरात धाव घ्यावी लागते. परिणामी येथे राहणार्‍या लोकांची संख्या तुरळक आहे. एरवी बाहेर राहावे लागतेच मग पुनर्वसन झाले तर बरेच अशी या लोकांची मानसिकता आहे.

Sent from vivo smartphone