शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्टील आणि सेमीकंडक्टरवरही टॅरिफ दावणार ट्रम्प? अमेरिकन राष्ट्राध्यक्षांचं उत्तर ऐकूण वाढेल संपूर्ण जगाचं टेन्शन!
2
'वाळवा तालुका स्वाभिमानी, सहजासहजी वाकत नाही, लढाई शेवटपर्यंत...', जयंत पाटलांचा अजितदादांसमोर टोला
3
NCERT: भारताच्या फाळणीला तीन नेते जबाबदार; एनसीआरटीच्या पुस्तकात कुणाची नावे?
4
HDFC Bank च्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी; कॅश पासून फ्री चेकबुकपर्यंतचे नियम बदलले, जाणून घ्या
5
दहीहंडी २०२५: पहिला १० थरांचा विश्वविक्रम; जोगेश्वरीच्या कोकण नगर गोविंदा पथकाचा पराक्रम
6
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा GST रिफॉर्म; दूध, दही, टीव्ही, सायकल सर्वकाही स्वस्त होणार?
7
“गुजरातींकडे नाही, मुंबई मराठी माणसाकडेच राहिली पाहिजे, हे ठाकरे बंधूंचे टार्गेट”: संजय राऊत
8
तुम्हाला माहित्येय? बाइक अथवा कारमागे का धावतात कुत्रे? जाणून घ्या, होईल फायदा...!
9
प्रेमात पडले, लग्न केलं, पण आता गायब झाली पत्नी, प्रेमविवाह ठरला रहस्य, नेमका प्रकार काय?  
10
५० टक्के ट्रम्प टॅरिफवर RSS नेते थेट बोलले; म्हणाले, “राष्ट्रहित समोर ठेवून भारताचे निर्णय”
11
"देशाचे स्वातंत्र्य हे असंख्य क्रांतिकारकांच्या त्यागाचे, बलिदानाचे आणि संघर्षाचे फळ"; CM योगींनी आपल्या निवासस्थानी फडकावला तिरंगा
12
Asia Cup 2025 : संजू अन् रिंकू आउट! आशिया कपसाठी भज्जीनं दिली केएल राहुलसह रियानला पसंती
13
Gopal Kala 2025: देवकीने जन्म दिला, तरी मातृसौख्य यशोदेला; कोणत्या हिशोबाची कृष्णाने केली परतफेड?
14
काँग्रेसकडून भाजपाला मोठा धक्का, माजी मंत्र्याने केली घरवापसी, पद्माकर वळवी यांचा पक्षप्रवेश
15
Jolly LLB 3: अ‍ॅडव्होकेट जगदीश त्यागी बनून पुन्हा एकदा अरशद वारसी येतोय भेटीला, चाहत्यांची उत्सुकता शिगेला
16
Health: हाताच्या दोन बोटांवरून लक्षात येतं, शरीरात वाढलेलं कोलेस्ट्रॉल; त्वरित करा 'हे' उपाय 
17
ठाकरे बंधूंना निवडणूक ‘बेस्ट’ ठरणार नाही? उमेदवारीवरून शिवसैनिकांत नाराजी; ‘समृद्धी’चे आव्हान
18
SBI चा ग्राहकांना दिलासा, कर्जाचा हप्ता होणार कमी; होमलोन, कार लोन स्वस्तात मिळणार
19
'या' दिवशी ७ तासांसाठी बंद राहणार HDFC च्या बँकिंग सुविधा; पाहा कोणत्या सेवांचा लाभ घेता येणार नाही?
20
सकाळी बँकर, नंतर रॅपिडो रायडर! महिला प्रवाशाला आला थक्क करणारा अनुभव; म्हणाली, “प्रेरणादायी”

करंजे, एजिवडे, दाउतवाडी या गावांचा रेंगाळलेला पुनर्वसन प्रश्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2021 04:23 IST

राधांनगरी अभयारण्यातील करंजे, एजिवडे, दाउतवाडी या गावांचा रेंगाळलेला पुनर्वसन प्रश्न भाग-१ संजय पारकर/ लोकमत न्यूज नेटवर्क/ राधांनगरी : ...

राधांनगरी अभयारण्यातील करंजे, एजिवडे, दाउतवाडी या गावांचा रेंगाळलेला पुनर्वसन प्रश्न भाग-१

संजय पारकर/ लोकमत न्यूज नेटवर्क/

राधांनगरी : राधांनगरी अभयारण्यात वन्यजीव संपदेचा असलेला मोठा साठा सवर्धन करण्यासाठी यात समाविष्ट असलेल्या वाड्या-वस्त्यांचे पुनर्वसन करण्याचा निर्णय २0 वर्षांपूर्वी झाला. त्यासाठी गावोगावी गावसभा झाल्या. येथे अनेक अडचणींना तोंड देऊन वैतागलेल्या लोकांनी पुनर्वसनाला समंती दिली. यावेळी झालेल्या पाहणीत १२ महसुली गावातील ३० वाड्यांतील ११५६ कुटुंबे, १४९९ खातेदार त्यांची १४७७ घरे व २४११.९८ हेक्टर जमीन बाधित होत होती. या शिवाय दूधगंगा धरणाच्या काठावरील अगोदर विस्थापित झालेल्या ८ गावांतील ४११ खातेदारांची ५२९ हेक्टर शिल्लक जमीन संपादित करावी लागेल, असा अहवाल तयार झाला.

२०१० मध्ये केलेल्या अंदाजपत्रकानुसार यासाठी २१४.८२ कोटी निधी लागणार होता. मात्र आतापर्यंत एकाही गावाचे पूर्णपणे पुनर्वसन झालेले नाही. करंजे, एजिवडे, दाउतवाडी या तीन गावांची सुरू असलेली पुनर्वसन प्रक्रियाही अर्धवट आहे.यावर १८.३० कोटी खर्च पडले आहेत. अजून १८.५६ कोटी निधीची गरज आहे. मात्र अनेक वर्षे विविध पातळीवर पाठपुरावा सुरू असूनही त्याची तरतूद झालेली नाही. यामुळे ना वन्यजिवांच्या सुरक्षेसाठी लोकांना स्थलांतर करण्याचा उद्देश सफल झाला ना लोकांची गैरसोय दूर झाली अशी स्थिती आहे.

संस्थान काळात शाहू महाराजांनी दाजीपूरचे हे जंगल शिकरीसाठी राखीव ठेवले होते. स्वातंत्र्यानंतर १९५८ साली याचे राज्यातील पहिले अभयारण्य करण्यात आले. येथे विपूल व दुर्मिळ जैववैविध्य असल्याने १९८५ मध्ये त्याचा विस्तार करण्यात आला त्याचे क्षेत्रफळ ३५१.१४ चौरस किमी झाले. यात राधांनगरी तालुक्यातील सलग्न १२ गावांतील २९ वाड्या-वस्त्या व गगनबावडा तालुक्यातील एका गावांचा समावेश झाला. मात्र त्यावेळी या लोकांना कोणत्याही प्रकारची माहिती दिली नव्हती.

जसजसे वन्यजीव विभागाचे निर्बंध सुरू झाले अशी लोकांची गैरसोय सुरू झाली. लोकांची ओरड सुरू झाल्यावर २००० सालात महसूल व वन्यजीव विभागाने लोकांचे हक्क व सवलतीची पाहणी केली. यासाठी प्रत्येक गावात गावसभा झाल्या. यात बहुतांशी गावांनी आपले पुनर्वसन करावे, अशी मागणी केली. मात्र याचा सविस्तर अहवाल होण्यासाठी दहा वर्षे लागली.

ठळक- अभयारण्य होण्यापूर्वी येथील लोकं जंगलातील मध, डिंक, हिरडा, बेहडा, तमालपत्री यांसारख्या वनउपज वस्तू जमा करून विकत असत, वनविभाग त्यासाठी लिलाव करत असे. मात्र हे सर्व आता बंद झाले आहे. हा सर्व परिसर केवळ पावसाळ्यातील पिकावर अवलंबून आहे. त्यामुळे लोकांना रोजगारासाठी मोठ्या शहरात धाव घ्यावी लागते. परिणामी येथे राहणार्‍या लोकांची संख्या तुरळक आहे. एरवी बाहेर राहावे लागतेच मग पुनर्वसन झाले तर बरेच अशी या लोकांची मानसिकता आहे.

Sent from vivo smartphone