शहरं
Join us  
Trending Stories
1
‘दोन शून्यां’ची बेरीज केली, त्यावर कितीही शून्य जोडले तरी…; भाजपाचा ठाकरे बंधूंना खोचक टोला
2
CM रेखा गुप्तांवर हल्ला करणाऱ्या व्यक्तीचा फोटो आला समोर, आरोपी गुजरातचा रहिवासी
3
India China Talks: व्यापारापासून ते थेट उड्डाणांपर्यंत; भारत-चीन यांच्यातील चर्चेत अनेक समस्यांवर निघाला तोडगा
4
BMC: पावसाळ्यात कुठे अडकलात तर काय कराल? मुंबई महानगरपालिकेची महत्त्वाची पोस्ट!
5
'हिला भुतांनी पछाडलेले आहे'; तांत्रिक गरम सळीने चटके देत राहिला, वेदनेने मुलीचा मृत्यू झाला
6
खळबळजनक! बीडमधील कोर्टात सरकारी वकिलाने स्वतःला संपवलं; कारण काय?
7
"चहलने तो टीशर्ट स्टंट खरंच केला? माझा विश्वासच बसत नव्हता..", धनश्री वर्माने व्यक्त केल्या भावना
8
पंतप्रधान अन् मुख्यमंत्र्यांनाही पदावरुन हटवण्याची तरतूद; केंद्र सरकारच्या नवीन विधेयकात नेमकं काय?
9
BEST Election Results: ना ठाकरे बंधू, ना भाजपा; शशांक राव यांच्या पॅनलला १४ जागा, आकडेवारी पाहाच
10
आधी बोलत होता, अचानक हात खेचला, धक्का दिला; रेखा गुप्ता यांच्यावर कसा हल्ला झाला? प्रत्यक्षदर्शी म्हणाले...
11
Toll: खराब रस्त्यांवर टोल नाही; सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय!
12
दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्यावर हल्ला; जनसुनावणीदरम्यान कागद हातात दिला, केस ओढले अन्....
13
रात्रीच्या वेळी शेतामध्ये प्रियकरासोबत आक्षेपार्ह अवस्थेत होती मुलगी; मागून गेलेल्या वडिलांनी बघितलं, उचललं टोकाचं पाऊल अन्...
14
फक्त ३ वर्षात पैसे दुप्पट! FD पेक्षाही जास्त परतावा देणारे टॉप ५ म्युच्युअल फंड, १० वर्षांत कोट्यधीश
15
व्हाट्सॲप युजर्ससाठी महत्त्वाची बातमी: 'Meta AI' मुळे ग्रुप चॅट्सची प्रायव्हसी धोक्यात? पेटीएम संस्थापकांचा दावा
16
बेस्ट निवडणूक २०२५: शशांक राव-महायुती पॅनलची बाजी, ठाकरे बंधू चितपट; विजयी उमेदवारांची यादी
17
HDFC बँकेच्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी! २२-२३ ऑगस्टला 'या' ऑनलाईन सेवा राहणार बंद
18
BEST Election Results: 'ब्रँडचे बॉस एकही जागा जिंकले नाहीत'; बेस्ट निवडणुकीतील पराभवावरुन ठाकरे बंधूंना भाजपचा टोला
19
India-China Trade: भारत की चीन.. या मैत्रीचा सर्वाधिक फायदा कोणाला होणार? काय सांगते आकडेवारी
20
महाराष्ट्र जलमय... पिके खरडली, घरे बुडाली; मराठवाड्यात ११ जीव गेले, ४९८ जनावरे दगावली

पाडळीतील गोपाळ समाजाच्या घरात पडला उजेड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2021 04:17 IST

लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : पाडळी खुर्द (ता. करवीर) येथील गोपाळ समाजातील कुटुंबात अखेर उजेड पडला. महावितरणने जिल्हा नियोजनच्या ...

लोकमत न्यूज नेटवर्क

कोल्हापूर : पाडळी खुर्द (ता. करवीर) येथील गोपाळ समाजातील कुटुंबात अखेर उजेड पडला. महावितरणने जिल्हा नियोजनच्या निधीतून वीज जोडणी दिल्याने या कुटुंबामधून समाधान व्यक्त होत आहे.

गेली अनेक वर्षे गोपाळ समाजातील वीस कुटुंब गावापासून दूर राहतात. त्यामुळे त्यांना शेती पंपांच्या फिडरवरुन वीज जोडली होती. मात्र, पावसाळ्यात तीन-चार महिने त्यांना अंधारातच राहावे लागत होते. याबाबत इरिगेशन फेडरेशनकडे या कुटुंबांनी तक्रार केली होती. पावसाळ्यात या कुटुंबांची होणारी परवड पाहून महावितरणचे अधीक्षक अभियंता अंकुर कावळे यांनी नवीन ट्रान्सफार्मर बसविण्याचा निर्णय घेतला. वास्तविक शासकीय अधिकाऱ्यांनी दिलेली आश्वासने वेळेत पूर्ण होतातच असे नाही. मात्र, याला अंकुर कावळे हे अपवाद ठरले. त्यांनी वेळेपूर्वी या कुटुंबांना वीज दिली.

ट्रान्सफार्मरचे उद्घाटन अंकुर कावळे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी इरिगेशन फेडरेशनचे अध्यक्ष विक्रांत पाटील-किणीकर, चंद्रकांत पाटील, आर. के. पाटील, सखाराम चव्हाण, मारूती पाटील, प्रकाश पाटील, बाबुराव पाटील, गुणाजी जाधव, बालिंगा स्टेशनचे कनिष्ठ अभियंता जोशिलकर, आदी उपस्थित होते.

फोटो ओळी : पाडळी खुर्द (ता. करवीर) येथील गोपाळ समाजासाठी नवीन ट्रान्सफार्मर बसविण्यात आला. यावेळी महावितरणचे अधीक्षक अभियंता अंकुर कावळे, विक्रांत पाटील, आदी उपस्थित होते. (फोटो-२७०६२०२१-कोल- पाडळी)