शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

चला... ‘काजवा’ भ्रमंतीला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2019 23:17 IST

राधानगरी नेचर क्लब आणि परिस्थितीकी विकास समिती राजापूरतर्फे यावर्षी काजवा भ्रमंतीचे आयोजन करण्यात येत आहे. ही भ्रमंती ११ ते २६ मे या कालावधीत होणार असून, निसर्गप्रेमींना अद्भुत नजारा राधानगरीत पाहावयास मिळणार आहे.

- संदेश म्हापसेकरराधानगरी नेचर क्लब आणि परिस्थितीकी विकास समिती राजापूरतर्फे यावर्षी काजवा भ्रमंतीचे आयोजन करण्यात येत आहे. ही भ्रमंती ११ ते २६ मे या कालावधीत होणार असून, निसर्गप्रेमींना अद्भुत नजारा राधानगरीत पाहावयास मिळणार आहे.राधानगरी असं उच्चारताच डोळ्यांसमोर ज्या ज्या गोष्टी उभ्या राहतात त्यामध्ये काजव्यांचा समावेश प्रामुख्याने होतो. भर उन्हाळ्यात पावसाच्या आगमनाची चाहूल लागली की, हा निसर्गाचा अद्भुत नजारा पाहायला मिळतो. रात्री अंधाऱ्या ठिकाणाहून समोर नजर टाकल्यास हा काजव्यांचा नजारा पाहायला मिळतो. निसर्गाची मुक्त उधळण आणि आविष्कार पाहायचा असेल तर नक्कीच राधानगरी भ्रमंतीला यायला हवे. हा आपल्या आयुष्यातील आनंद देणारा काळ असेल.हिरडा, बेहडा, सादडा, जांभूळ, आंबा, उंबर अशा निवडक झाडांवरच काजवे बसलेले असतात. लुकलुकत होणारी काजव्यांची प्रकाशफुले आपल्या डोळ्यांना सुखावून जातात. कुतूहलमिश्रित आणि विस्मयचकित मुद्रेने निसर्गवैभव आपण पाहतच राहतो आणि पाहता-पाहता भान हरपून जाते. कोल्हापूरपासून ५० किलोमीटरवर असणाºया राधानगरी आणि काळम्मावाडी तलावाच्या परिसरात एक समृद्ध जैवविविधता आढळते. खिंडी व्हरवडे घाटापासून निसर्गसौंदर्याने नटलेल्या परिसराची झलक दाखवितो. येथे भर उन्हात जाणवणारा नैसर्गिक हवेचा गारवा, सह्याद्रीच्या कुशीत जन्मलेले वृक्षवल्ली आणि इथल्या समृद्ध जैवविविधतेचा सर्वच ऋतूत अनुभव घेण्यासाठी राधानगरीला पर्यटकांची गर्दी होत असते. अशा आडवाटेवरच्या ठिकाणावर सगळ्या प्रकारच्या सुविधा मिळणं शक्य नसतं, सुरक्षित व पर्यावरणपूरक पर्यटनासाठी राधानगरी नेचर क्लब अभयारण्य पर्यटनस्थळी अनेक सोयी उपलब्ध करून देत आहे.पिवळ्या रंगाचे ठिपके कायमस्वरूपी आपल्या जीवनात आनंद साजरा करताना एक वर्तुळ तयार करते, हा निसर्गाचा आविष्कार म्हणजे काजवा भ्रमंती. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे आजच्या काळातील महत्त्व ओळखून तो सर्वसामान्यांसाठीही खुला करण्याचे काम राधानगरी नेचर क्लबच्यावतीने केले आहे. अतिपर्यटन आणि त्याचा पर्यावरणाला होणारा धोका टाळण्यासाठी यावेळच्या काजवा भ्रमंतीसाठी पर्यटकांना मर्यादित प्रवेश दिले जाणार आहेत. यासाठी पर्यटकांनी आपल्या प्रवेश निश्चित करावा लागणार आहे. या पर्यावरणपूरक पर्यटनाला म्हणजे काजवा भ्रमंती प्रत्येकांनी करावी.शेवटी निसर्गात जाताना आपण निसर्गाचा एक जबाबदार घटक आहोत याची जाणीव ठेवून निसर्गाचे संतुलन बिघडणार नाही याची खबरदारी आपण प्रत्येकाने घ्यायला हवी. 

(लेखक राधानगरी नेचर क्लबचे संस्थापक अध्यक्ष आहेत.)

टॅग्स :forestजंगलkolhapurकोल्हापूर