शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
3
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
4
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
5
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
6
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
7
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
8
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
9
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
10
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
11
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
12
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
13
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
14
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
15
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
16
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
17
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
18
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
19
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
20
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!

आंबेओहोळ धरणाचे काम पूर्ण करूया

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2020 04:23 IST

उत्तूर : रखडलेला आंबेओहोळ प्रकल्प (ता. आजरा) येथील धरणग्रस्तांचे पुनर्वसन करून लाभक्षेत्रात पाणी मिळावयाचे असल्यास धरणग्रस्त व लाभक्षेत्रातील लाभधारक ...

उत्तूर : रखडलेला आंबेओहोळ प्रकल्प (ता. आजरा) येथील धरणग्रस्तांचे पुनर्वसन करून लाभक्षेत्रात पाणी मिळावयाचे असल्यास धरणग्रस्त व लाभक्षेत्रातील लाभधारक यांच्यात समन्वयाची गरज आहे. धरणग्रस्तांचे पुनर्वसन करूया, धरणाचे काम पूर्ण करूया, असे प्रतिपादन कॉ. संपत देसाई यांनी आंबेओहोळ प्रकल्प (ता. आजरा) येथे लाभधारक व धरणग्रस्त यांना मार्गदर्शन करताना केले. अध्यक्षस्थानी वसंतराव धुरे होते. कॉ. संपत देसाई म्हणाले, लाभधारक शेतकरी व धरणग्रस्त यांच्यात समन्वयाची चांगली गोष्ट आहे. कायद्याच्या चौकटीत राहून पुनर्वसनाचे काम पुढे घेऊन जायचे आहे. केवळ संघर्ष करून प्रश्न सुटेल असे सांगता येत नाही. सत्तेचा वापर सामान्याच्या उन्नतीसाठी आहे. हसन मुश्रीफ यांच्याकडे ताकद आहे. त्यांना घेऊन धरणग्रस्त व लाभधारक एकत्र येऊन आराखडा तयार करून घेऊया.

संकलन रजिस्टर दुरुस्ती सुरू झाली आहे. पुनर्वसनाचा गावनिहाय आराखडा तयार करूया. पॅकेजच्या अडचणी किती आहेत हे गावनिहाय समजून घेऊया. त्यानुसार मागणी करूया, पुनर्वसन केले तर धरणाचे काम सुरू राहील. लाभधारक क्षेत्रातील शेतकऱ्यांनी समजून घेतले पाहिजे. चांगल्या जमिनी दाखवण्यासाठी प्रयत्न करण्यासाठी आग्रह करूया. कडगाव व लिंगनूर येथील भूखंड वाटपाबाबत तातडीने द्यावा. घळभरणीच्यावेळी अनेक प्रश्न उपस्थित होणार आहे. त्यामुळे पुनर्वसनही तितकेच महत्त्वाचे आहे. काशिनाथ तेली म्हणाले, अधिकाऱ्यांच्या नाकर्तेपणाचा त्रास शेतकऱ्यांना होत आहे. त्यामुळे संकलन दुरुस्तीचे काम ताबडतोब करून संबंधित शेतकऱ्यांना लाभ मिळणे गरजेचे आहे. जमिनी चुकीच्या व नाकारलेल्या दाखवतात. संजय येजरे म्हणाले, ८२२ धरणग्रस्तांपैकी ३५५ धरणग्रस्तांना स्वेच्छा पुनर्वसन लादण्यात आले. याबाबत मा. उच्च न्यायालयाने आदेश देऊनही ६५ टक्के रक्कम भरून घेतली जात नाही. त्यामुळे न्याय मिळेपर्यंत लढा सुरूच राहणार आहे. शंकर पावले म्हणाले, पुनर्वसनाचा खोडा हा धरणग्रस्तांनी केला नाही, तो अधिकाऱ्यांनी केला. २००४ मध्ये ७०० हेक्टर उपलब्ध असणारी जमीन कोठे आहे. धरणग्रस्तांनी काम बंद पाडण्यास अधिकारीच जबाबदार आहे. योग्य अधिकाऱ्यांची निवड करा, पुनर्वसन करा, धरणाला विरोध नाही.

वसंतराव धुरे म्हणाले, पुनर्वसनासाठी प्रयत्न करून प्रकल्पात पाणीसाठा करूया. शेतीसाठी परिसर सुजलाम..सुफलाम करूया.

यावेळी पं. स. सदस्य शिरीष देसाई, विठ्ठल कदम, विजय वांगणेकर यांनी मनोगत व्यक्त केले.

यावेळी मारुती घोरपडे, दीपक देसाई, भिकू गुरव, मच्छिंद्र कडगावकर, बबन पाटील, सुरेश खोत, गणपतराव सांगले, शशिकांत लोंखडे, नेताजी पाटील, शहाजी पाटील, संग्राम पाटील, आदींसह धरणग्रस्त व लाभधारक उपस्थित होते.

-----------------

* एकत्रित लढूया, पुनर्वसनासाठी सर्व पक्ष, संघटना यांनी एकत्रित येऊन मतभेद बाजूला ठेवून पुनर्वसनाबरोबरच धरणाचे काम सुरू राहील. मुश्रीफ यांनी प्रयत्न करावेत, अशी भूमिका लाभधारक व धरणग्रस्त यांनी मांडून एकत्रित लढूया, अशी भूमिका अनेकांनी व्यक्त केली.

-------------------------

* फोटो ओळी : आंबेओहोळ प्रकल्प (ता. आजरा) येथे धरणग्रस्त व शेतकऱ्यांना कॉ. संपत देसाई यांनी मार्गदर्शन केले.

क्रमांक : २३१२२०२०-गड-०३