शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
5
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
6
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
7
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
8
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
9
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
10
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
11
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
12
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
13
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
14
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
15
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
16
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
17
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
18
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
19
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
20
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?

Hasan Mushrif: ‘प्रोत्साहनपर’ अनुदान योजनेतील त्रुटी दूर करु, मंत्री हसन मुश्रीफांची ग्वाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 28, 2022 16:26 IST

राज्य सरकारद्वारे २०१७-१८, २०१८-१९ व २०१९-२० या कालावधीत नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना २०१९-२० या कालावधीत परतफेड केेलेल्या रकमेवर ५० हजारापर्यंत प्रोत्साहनपर अनुदान दिले जाणार आहे

कोल्हापूर : नियमित पीक कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजारापर्यंत प्रोत्साहनपर अनुदान दिले जाणार आहे. मात्र निकषांमध्ये काही त्रुटी असून त्या दूर करण्यासाठीच मुख्यमंत्री उध्दव ठाकरे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेणार असल्याची माहिती ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी सोमवारी दिली.राज्य सरकारद्वारे २०१७-१८, २०१८-१९ व २०१९-२० या कालावधीत नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना २०१९-२० या कालावधीत परतफेड केेलेल्या रकमेवर ५० हजारापर्यंत प्रोत्साहनपर अनुदान दिले जाणार आहे. मात्र या योजनेचा पश्चिम महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना फारसा लाभ होणार नाही. पीक कर्जाच्या परतफेडीचा कालावधी पाहिला तर ऊस उत्पादक शेतकऱ्यांना अडचणीचा आहे. त्यातच कोल्हापूर, सांगली व सातारा जिल्ह्यात २०१९ व २०२१ ला महापूर आला होता. या कालावधीत शेतीचे मोठे नुकसान झाल्याने सरकारने नुकसान भरपाई दिली. भरपाई मिळालेल्या शेतकऱ्यांना यातून वगळण्याचे आदेश सहकार विभागाने दिले आहेत. जिल्ह्यातील सव्वा लाख शेतकरी वंचित राहणार आहेत.याबाबत, मंत्री हसन मुश्रीफ यांना विचारले असता, या योजनेत काही त्रुटी आहेत, हे लक्षात आले आहे. याबाबत सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांच्याशी चर्चा झाली आहे. ज्या वर्षी पीक कर्ज घेतले त्याच वर्षी परतफेड करणे ऊस उत्पादकांना अडचणीचे असते. याबाबत मुख्यमंत्री ठाकरे व उपमुख्यमंत्री पवार यांची भेट घेणार असून शेतकऱ्यांना निश्चित न्याय देऊ, असे त्यांनी सांगितले.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरHasan Mushrifहसन मुश्रीफFarmerशेतकरी