शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

पन्हाळा परिसरात बिबट्याचा बैलावर हल्ला, लोक जमा झाल्यानंतर काढला पळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 1, 2017 10:59 IST

पन्हाळा आणि परिसरात बिबट्याचे अस्तित्व असल्याचे पुन्हा एकदा सिध्द झाले आहे. पन्हाळ्याच्या पायथ्याशी असलेल्या आपटी गावात बुधवारी दुपारी बैलगाडी घेउन जाणाऱ्या शेतकऱ्याच्या बैलावर बिबट्याने हल्ला केला. आरडाओरडा झाल्याने जमा झालेल्या लोकांच्या गर्दीमुळे बिबट्याने पळ काढला.बैलांनी बैलगाडीसह शेजारील शेतात पळ काढल्याने बैल बचावले, पण बैलगाडीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.

ठळक मुद्देपन्हाळा आणि परिसरात बिबट्याचे अस्तित्व असल्याचे पुन्हा एकदा सिध्द बैलगाडी घेउन जाणाऱ्या शेतकऱ्याच्या बैलावर बिबट्याने केला हल्ला पळ काढल्याने बैल बचावले, पण बैलगाडीचे मोठ्या प्रमाणात नुकसान

पन्हाळा : पन्हाळा आणि परिसरात बिबट्याचे अस्तित्व असल्याचे पुन्हा एकदा सिध्द झाले आहे. पन्हाळ्याच्या पायथ्याशी असलेल्या आपटी गावात बुधवारी दुपारी बैलगाडी घेउन जाणाऱ्या शेतकऱ्याच्या बैलावर बिबट्याने हल्ला केला. आरडाओरडा झाल्याने जमा झालेल्या लोकांच्या गर्दीमुळे बिबट्याने पळ काढला.पन्हाळा आणि परिसरातील समृद्ध जंगलामुळे येथे अनेक वन्यप्राणी, पशुपक्षी आहेत. बिबट्याचाही वावर पूर्वापार आहे. परंतु गेली काही वर्षे या परिसरात बिबट्याचे अस्तित्व नव्हते. परंतु या परिसरात बिबट्याचा वावर असल्याचे बुधवारी सिध्द झाले.

बुधवारी दुपारी भैरोबाच्या मंदिराजवळील रहिवाशी पांडुरंग गुंडा गिरीगोसावी हे आपल्या शेताकडे बैलगाडी घेवुन येत असता बैलाच्या मागील पायावर दुपारी ११ वाजण्याच्या सुमारास बिबट्याने हल्ला केला. यामुळे भयभित झालेल्या बैलांनी बैलगाडीसह शेजारील शेतात पळ काढल्याने बैल बचावले, पण बैलगाडीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.दरम्यान शेतकरी पांडुरंग गिरिगोसावी आणि त्यांचा मुलगा स्वप्नील यांनी आरडा ओरडा केल्यानंतर परीसरातील लोक तेथे जमा झाले, यामुळे बिबट्या पळुन गेला. याच परिसरात मोठ्या प्रमाणात कोंबडी पालन व्यवसाय सुरु आहे. स्थानिक शेतकऱ्यांची घरेही या परिसरातच आहेत. विशेष म्हणजे महिलांचे वास्तव्य या परिसरात जादा आहे.

आपटी परिसरात बिबट्याचा वावर मोठ्या प्रमाणात आहे. वनविभागाने याचा बंदोबस्त करावा, या बिबट्याला पकडुन दुरच्या जंगलात सोडण्यात यावे.अमर पाटील,सरपंच, आपटी.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरforestजंगल