शहरं
Join us  
Trending Stories
1
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
2
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
3
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
4
“चाळीस चोर संग घेऊन येवल्याचा आलिबाबा छगन भुजबळ लय बोलतो”; मनोज जरांगेंची बोचरी टीका
5
5.8 तीव्रतेच्या भूकंपाने आसाम हादरला, उत्तर बंगाल आणि भूटानमध्येही जाणवले धक्के
6
त्यांच्याकडे अनुभव आणि ताकद; मायावतींनी देशातील दलितांचे नेतृत्व करावे- रामदास आठवले
7
“...तर पहिल्यांदा मिलिंद नार्वेकरांचा राजीनामा घ्या”; कुणी दिले संजय राऊतांना आव्हान?
8
"संविधान न्याय देण्यात अपयशी, राजेशाही..."; नेपाळच्या गोंधळावर मनीषा कोईरालाचे रोखठोक मत
9
विरोधकांची इच्छा पूर्ण होणार...? NDA मध्ये फुट पडणार...? "15 जागा मिळाल्या नाही तर..."; 'या' पक्षानं केली मोदींचं टेन्शन वाढवणारी 'मागणी'
10
'माझ्याकडे पैशांची कमतरता नाही; महिन्याला २०० कोटी कमवण्याची बुद्धी...', नितीन गडकरींचे वक्तव्य
11
IND vs PAK: टॉस अन् मॅचच्या निकालाचा संबंध काय..? जाणून घ्या 'या' मैदानावरचं खास कनेक्शन
12
“ह्याच जागेतून इतिहास घडविला गेला”; हर्षवर्धन सपकाळ यांची लंडन येथील आंबेडकर हाऊसला भेट
13
पितृपक्ष २०२५: ‘ही’ ५ कामे अवश्य करा, लक्ष्मी देवीची कालातीत कृपा होईल; लाभच लाभ मिळतील!
14
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना अनुकूलता, यश-प्रगती-लाभ; बुडालेले पैसे मिळतील, वचन देऊ नये!
15
शेअर असावा तर असा...! 5 दिवस अन् ₹40000 कोटींची कमाई, रिलायन्स-टीसीएसलाही टाकलं मागे; गुंतवणूकदारांना केलं मालामाल
16
सतत मोबाईलचा वापर म्हणजे मृत्यूला आमंत्रण; मेंदू आणि शरीरावर होतो जीवघेणा परिणाम
17
"पाकिस्तानसोबत मॅच खेळायची असेल तर पहलगाममध्ये मारला गेलेला माझा भाऊ परत आणून द्या"
18
‘ते म्हणतील चंद्रावर सर्वप्रथम मारुती गेला होता’, इंडिया आघाडीतील नेत्या कनिमोळींचं विधान  
19
'संजय राऊतांसारखा बिनडोक राजकारणी महाराष्ट्रात होणे नाही', राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाची टीका
20
Smriti Mandhana Run Out : चुकली अन् फसली! शतकी भागीदारीनंतर स्मृती-प्रतिका हिट जोडी फुटली!

अडथळ्यांवर कायदेशीर बंदी कोल्हापूर मनपाचा प्रस्ताव : आराखड्यात बदल आवश्यक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 7, 2018 21:24 IST

अंबाबाई मंदिरातील किरणोत्सवात येणाऱ्या अडथळ्यांना कायदेशीर बंदी घालण्याचा प्रस्ताव महानगरपालिकेच्या प्रशासनाच्या विचाराधीन आहे. बेकायदेशीर बांधकामांवर नियंत्रण ठेवण्यात येणाºया अडचणी आणि प्रशासनाच्या मर्यादा यांवर उपाय

भारत चव्हाण ।कोल्हापूर : अंबाबाई मंदिरातील किरणोत्सवात येणाऱ्या अडथळ्यांना कायदेशीर बंदी घालण्याचा प्रस्ताव महानगरपालिकेच्या प्रशासनाच्या विचाराधीन आहे. बेकायदेशीर बांधकामांवर नियंत्रण ठेवण्यात येणाºया अडचणी आणि प्रशासनाच्या मर्यादा यांवर उपाय म्हणून हा प्रस्ताव समोर आला आहे. २०२० साली जो शहराचा विकास आराखडा तयार केला जाईल, त्यामध्ये मात्र बदल करावा लागणार आहे.

महापालिकेतील अधिकारीही यातील विशेषज्ञ नसल्यामुळे अडथळ्यांची समस्या गेल्या अनेक वर्षांपासून अनुत्तरित राहिली आहे. महानगरपालिकेच्या कायद्यात या अडथळ्यांचा दूर करण्याची कोणतीच तरतूद नसल्यामुळे कारवाई करायची तर कशी? असा प्रश्न सतावत असतो. गेल्या दोन दिवसांपासून जी अतिक्रमणे हटविली ती महापालिकेच्या अधिकाºयांनी संबंधित अधिकाºयांनी विनंत्या करून, धार्मिक परंपरेचे महत्त्व समोर आणून हटविली आहेत. परंतु संबंधित इमारतमालकांनी त्याला न्यायालयात आव्हान दिले तर प्रशासनासमोरील अडचणी वाढू शकतात.

किरणोत्सवात अडथळा निर्माण करणाºया इमारती या सन १९४८ पूर्वीच्या असून, त्या तत्कालीन नगरपालिकेची रीतसर बांधकाम परवाने घेऊन बांधलेल्या आहेत. त्यामुळे कारवाई करताना कायदेशीर अडचणी होत्या. तरीही शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत, उपशहर रचनाकार, उपशहर अभियंता प्रत्येक वर्षी किरणोत्सवाच्या आठ ते दहा दिवस आधी किरणोत्सवाच्या मार्गातील अडथळे आणि त्यांच्यावरील कारवाईचा मुद्दा प्रकर्षाने चर्चेला येतो; परंतु पुढे कायमस्वरूपी कोणतीच उपाययोजना केली जात नाही. 

महानगरपालिका प्रशासन सन २०२० मध्ये नवीन विकास आराखडा जाहीर करेल. या आराखड्यात किरणोत्सवातील अडथळ्यांना बंदी करणाºया गोष्टींचा समावेश केला पाहिजे. ‘नगररचना’च्या अखत्यारीतील हा प्रश्न असला तरी आतापासूनच विचार आवश्यक आहे.- एस. के. माने ,उपशहर अभियंता

टॅग्स :Mahalaxmi Temple Kolhapurमहालक्ष्मी मंदिर कोल्हापूरkolhapurकोल्हापूर