शहरं
Join us  
Trending Stories
1
शुबमन गिल प्लेईंग ११ बाहेर बसणार, संजू सॅमसनला संधी? भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी मोठा बदल होण्याची शक्यता...
2
भारत-पाकिस्तान सामन्याच्या दिवशीच एकनाथ शिंदेंचे X अकाऊंट हॅक; राजकीय वर्तुळात खळबळ
3
Viral Video : चीनला पोहोचलेल्या भारतीय व्यक्तीने दाखवलं असं काही की पाहणारेही झाले थक्क! तुम्हीही कमाल बघाच
4
चिंता वाढली! एलियन्स, AI आणि तिसरे महायुद्ध; बाबा वेंगाची 2026 वर्षाबद्दल भविष्यवाणी काय?
5
मनोज जरांगेंच्या बैठकीत मधमाशांचा हल्ला, सहकाऱ्यांनी अंगावर उपरणी टाकून पाटलांना वाचवलं
6
"माझ्याशी लग्न कर, तुला सगळ्या सिनेमात घेईन...", प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीने अभिनेत्याला दिलेली ऑफर, नकार देताच करिअर संपवलं
7
हैदराबाद विद्यापीठाच्या निवडणुकीत ABVP चा मोठा विजय; NSUI ला नोटापेक्षा कमी मते...
8
VIRAL : फक्त तिकीटच नाही, तरुणीचे इन्स्टाग्राम अकाऊंटही तपासले! रेल्वेतील टीटीईचा धक्कादायक प्रताप
9
टॅरिफ, H1B व्हिसानंतर अमेरिकेचा आता भारतीय कोळंबीवर डोळा! मच्छीमारांवर संकट येणार?
10
पती, पत्नी आणि तो... वेगळचं प्रकरण! माहेर अन् सासरच्यांनी मिळून केलं विवाहितेचं अपहरण; पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
11
लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या गर्लफ्रेंडची हत्या; सुटकेसमध्ये भरून मृतदेह १०० किमी दूर नदीत फेकला
12
५००० परदेशी लोकांना नोकरीवर बसवले, १६ हजार अमेरिकींना काढले...; ट्रम्प प्रशासनाने H-1B चा पाढाच वाचला...
13
'तुम्ही कुणाला त्रास दिला, तर अजिबात ऐकणार नाही'; अजित पवारांचा इशारा
14
निवडून आलेल्याला २ कोटी मात्र आमदार नसतानाही मला २० कोटी मिळतात; सदा सरवणकरांचं वादग्रस्त विधान
15
पंतप्रधान मोदी आज देशवासियांना संबोधित करणार; पाच वाजता कोणत्या विषयावर बोलणार?
16
शेअर बाजारातील जोखीम घटक काय असतो? तुमची गुंतवणूक वाचवून चांगला नफा कसा कमवायचा?
17
हुंड्यासाठी सुनेला मारहाण, खोलीत कोंडून विषारी साप सोडला; सासरच्यांनी गाठला क्रूरतेचा कळस
18
स्वप्नातील एसयूव्ही खरेदीची संधी! महिंद्रा स्कॉर्पिओ झाली ₹२.१५ लाखांनी स्वस्त; जाणून घ्या नवीन किंमत
19
Nagpur Crime: घरातून बाहेर पडला अन् कारमध्ये मिळाला व्यावसायिकाचा मृतदेह; मृत्यू की हत्या?
20
युद्ध युरोपच्या दाराशी! रशियन ड्रोनची नाटो देशांच्या हद्दीत घुसखोरी, तिसऱ्या महायुद्धाचा धोका वाढला?

गेली तीन वर्षे रोज ४० लाख लिटर शुद्ध पाण्याची गळती, कोल्हापूर महापालिकेचा भोंगळ कारभार 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2023 12:28 IST

शहरात एकीकडे पाण्यासाठी नागरिकांचा ठणठणाट सुरु असतानाच लाखो लिटर पाणी जातंय वाया

कोल्हापूर : शहरातील जलवाहिनींना गळती ही आता नवीन बाब राहिलेली नाही. निम्म्या ई वॉर्डाला पाणी पुरवठा करणाऱ्या कसबा बावडा येथील पंप हाऊसमधून गेली तीन वर्षे रोज ४० लाख लिटर शुद्ध पाण्याची गळती होत असल्याचा प्रकार कृती समितीच्या कार्यकर्त्यांनी उघड केला. या गळतीकडे पाणी पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांचे सोयीस्कर दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करण्यात आला. कसबा बावडा येथील जलशुद्धीकरण केंद्रातून ई वॉर्डाला पाणीपुरवठा केला जातो. या केंद्रातील पंप हाऊसमधून गेली तीन, चार वर्षे रोज चार एमएलडी म्हणजे ४० लाख लिटर शुद्ध पाणी वाहून जात असल्याचा धक्कादायक प्रकार कृती समितीच्या कार्यकर्त्यांनी गुरुवारी उघडकीस आणला. चार वर्षांपासून असलेली गळती महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने काढलेली नाही. त्यामुळे पाणीपुरवठा विभागाचे लाखो रुपये वाया जात आहेत. कृती समितीचे ॲड. बाबा इंदूलकर, आर. के. पोवार, दिलीप देसाई, बाबा पार्टे यांनी जल अभियंत्यांना फोनवरून माहिती दिली. त्यानंतर तांत्रिक विभागाचे सहायक अभियंता जयेश जाधव यांनी त्याठिकाणी भेट दिली. गेली दोन वर्षे पाणी वाहून जात असल्याचे जाधव यांनी मान्य केले.पुईखडी, चंबुखडी आणि कसबा बावडा येथील शुद्धीकरण केंद्रातून कोल्हापूर शहराला पाणीपुरवठा केला जातो. नदीमध्ये भरपूर पाणी आहे, पाण्याची उचलही दिवसाला १५० ते १६० एम.एल.डी. होते; पण गळतीमुळे उचललेल्या पाण्यापैकी ६० टक्के पाण्याचे बिलिंग होते. गळतीमुळे भरपूर पाणी असूनही नागरिकांना मात्र पुरेशा दाबाने पाणी पुरवठा होत नाही. महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी जाणूनबुजून लक्ष दिलेलं नाही, असा आरोप ॲड. बाबा इंदूलकर यांनी केला आहे.गळती होणाऱ्या पाण्याचा पुनर्वापरकसबा बावडा जलशुद्धीकरण केंद्राच्या परिसरातील संपाची बारा वर्षांपूर्वी दुरुस्तीची व गाळ काढण्याची कामे केली आहेत. तसेच या संपामध्ये येणाऱ्या रॉ वॉटर व जाणाऱ्या फिल्टर वॉटर पाइपचे काम चार वर्षांपूर्वी पाणीपुरवठा विभागामार्फत करण्यात आले होते. त्यावेळी होणाऱ्या पाण्याची गळती थांबविण्यात आली होती. हा दगडी बांधकामाचा संप पूर्वीचा असल्याने या ठिकाणी अमृत १ योजनेमधून नवीन संप बांधण्याचे काम प्रस्तावित केले असून, काम ८० टक्के पूर्ण झाले आहे. ते पूर्ण झाल्यावर जुना संप वापरणे बंद केले जाणार आहे. या ठिकाणी संपाच्या तळातून व भिंतीतून पाण्याची गळती आहे. गळतीचे पाणी संपाच्या कोपऱ्यातून बाहेर एकत्रित करून पुन्हा पंपाने उचलून रिसायकल संपामध्ये टाकण्यात येते, असा खुलासा पाणीपुरवठा विभागाने केला आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरWaterपाणी