शहरं
Join us  
Trending Stories
1
Supreme Court: मुंबईविषयी तुम्हाला काही तरी वाटू द्या, अन्यथा तिथे सर्वत्र अतिक्रमण होईल- सर्वोच्च न्यायालय
2
आजचे राशीभविष्य - १८ जून २०२५, खूप मोठा आर्थिक लाभ होईल, सामाजिक स्तरावर यश आणि कीर्ती वाढेल
3
ठाणे, रायगडमधील अनेक पूल बनले धोकादायक!
4
आजचा अग्रलेख: तेलाचा भडका निश्चित!
5
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
6
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
7
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
8
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
9
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
10
विशेष लेख: नायजेरियात पाण्यावरून वाद: १०,००० ठार!
11
लेख: शहरे 'एक्स्प्रेस' धावत सुटली, गावखेड्यांनी काय करायचे?
12
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
13
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
14
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
15
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
16
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
17
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
18
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
19
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
20
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप

गेली तीन वर्षे रोज ४० लाख लिटर शुद्ध पाण्याची गळती, कोल्हापूर महापालिकेचा भोंगळ कारभार 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2023 12:28 IST

शहरात एकीकडे पाण्यासाठी नागरिकांचा ठणठणाट सुरु असतानाच लाखो लिटर पाणी जातंय वाया

कोल्हापूर : शहरातील जलवाहिनींना गळती ही आता नवीन बाब राहिलेली नाही. निम्म्या ई वॉर्डाला पाणी पुरवठा करणाऱ्या कसबा बावडा येथील पंप हाऊसमधून गेली तीन वर्षे रोज ४० लाख लिटर शुद्ध पाण्याची गळती होत असल्याचा प्रकार कृती समितीच्या कार्यकर्त्यांनी उघड केला. या गळतीकडे पाणी पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांचे सोयीस्कर दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करण्यात आला. कसबा बावडा येथील जलशुद्धीकरण केंद्रातून ई वॉर्डाला पाणीपुरवठा केला जातो. या केंद्रातील पंप हाऊसमधून गेली तीन, चार वर्षे रोज चार एमएलडी म्हणजे ४० लाख लिटर शुद्ध पाणी वाहून जात असल्याचा धक्कादायक प्रकार कृती समितीच्या कार्यकर्त्यांनी गुरुवारी उघडकीस आणला. चार वर्षांपासून असलेली गळती महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने काढलेली नाही. त्यामुळे पाणीपुरवठा विभागाचे लाखो रुपये वाया जात आहेत. कृती समितीचे ॲड. बाबा इंदूलकर, आर. के. पोवार, दिलीप देसाई, बाबा पार्टे यांनी जल अभियंत्यांना फोनवरून माहिती दिली. त्यानंतर तांत्रिक विभागाचे सहायक अभियंता जयेश जाधव यांनी त्याठिकाणी भेट दिली. गेली दोन वर्षे पाणी वाहून जात असल्याचे जाधव यांनी मान्य केले.पुईखडी, चंबुखडी आणि कसबा बावडा येथील शुद्धीकरण केंद्रातून कोल्हापूर शहराला पाणीपुरवठा केला जातो. नदीमध्ये भरपूर पाणी आहे, पाण्याची उचलही दिवसाला १५० ते १६० एम.एल.डी. होते; पण गळतीमुळे उचललेल्या पाण्यापैकी ६० टक्के पाण्याचे बिलिंग होते. गळतीमुळे भरपूर पाणी असूनही नागरिकांना मात्र पुरेशा दाबाने पाणी पुरवठा होत नाही. महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी जाणूनबुजून लक्ष दिलेलं नाही, असा आरोप ॲड. बाबा इंदूलकर यांनी केला आहे.गळती होणाऱ्या पाण्याचा पुनर्वापरकसबा बावडा जलशुद्धीकरण केंद्राच्या परिसरातील संपाची बारा वर्षांपूर्वी दुरुस्तीची व गाळ काढण्याची कामे केली आहेत. तसेच या संपामध्ये येणाऱ्या रॉ वॉटर व जाणाऱ्या फिल्टर वॉटर पाइपचे काम चार वर्षांपूर्वी पाणीपुरवठा विभागामार्फत करण्यात आले होते. त्यावेळी होणाऱ्या पाण्याची गळती थांबविण्यात आली होती. हा दगडी बांधकामाचा संप पूर्वीचा असल्याने या ठिकाणी अमृत १ योजनेमधून नवीन संप बांधण्याचे काम प्रस्तावित केले असून, काम ८० टक्के पूर्ण झाले आहे. ते पूर्ण झाल्यावर जुना संप वापरणे बंद केले जाणार आहे. या ठिकाणी संपाच्या तळातून व भिंतीतून पाण्याची गळती आहे. गळतीचे पाणी संपाच्या कोपऱ्यातून बाहेर एकत्रित करून पुन्हा पंपाने उचलून रिसायकल संपामध्ये टाकण्यात येते, असा खुलासा पाणीपुरवठा विभागाने केला आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरWaterपाणी