शहरं
Join us  
Trending Stories
1
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा कार्यक्रम ठरला; कधी होणार महापालिका निवडणुका?
2
VIDEO: उत्तरकाशीमध्ये ढगफुटी; १४ सेकंदात सगळं गाव उद्ध्वस्त, घरांसह अनेकजण ढिगाऱ्याखाली गाडले गेले
3
७०, ५०, ४० की ३५ किलो; ट्रेनमध्ये किती सामान घेऊन जाऊ शकता? अन्यथा मोठा दंड होऊ शकतो
4
खिशातून एक रुपयाही न भरता शेतकऱ्यांना मिळेल वार्षिक ३६,००० पेन्शन, योजनेचा कसा घ्यायचा फायदा?
5
"न्यायपालिकेला राजकीय आखाडा बनवण्याचा प्रकार नाही का?", आरती साठेंच्या न्यायमूर्तीपदी नियुक्तीला रोहित पवारांचा विरोध
6
Mumbai: कबुतरखान्यावरून आदित्य ठाकरेंची देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेंवर टीका
7
"ढगफुटीमुळे हॉटेल्स, लॉज, बाजारपेठा, गाव उद्ध्वस्त..."; प्रत्यक्षदर्शींनी सांगितला भयंकर अनुभव
8
ट्रम्प यांच्या वक्तव्याने भारतीय गुंतवणूकदारांना २ लाख कोटींचा फटका; फक्त 'या' क्षेत्रात झाली वाढ
9
बिहारनंतर आता या राज्यातही होणार मतदार याद्यांचं पुनरीक्षण, निवडणूक आयोगाने दिले आदेश   
10
कॅनडात खलिस्तान्यांच्या कुरापती सुरुच; 'रिपब्लिक ऑफ खलिस्तान' नावाने उभारले बनावट दूतावास
11
मंत्रिमंडळ बैठकीत ७ मोठे निर्णय; स्टार्टअप उद्योजगता धोरण जाहीर, समृद्धी फ्रेट कॉरिडॉर मंजूर
12
मराठीशी पंगा महागात! निशिकांत दुबेंच्या अडचणी वाढण्याची शक्यता; मनसेकडून याचिका दाखल
13
VIDEO: दोन बैलांमध्ये भांडण, स्कूटीवाल्या मुलीला बसली जोरदार धडक, ती रस्त्यावर पडली अन् मग...
14
टाटा ग्रुपचा मोठा धमाका! शेअर बाजारात येणार आणखी एका कंपनीचा IPO, गुंतवणूकदार मालामाल होणार?
15
२०,५००% रिटर्न! बिहारच्या या कंपनीनं ५ वर्षांत ₹१ लाखांचे केले ₹२ कोटी, तुमच्याकडे आहे का?
16
Amit Shah: विक्रमी अमित शाह! 'अशी' कामगिरी करणारे पहिलेच गृहमंत्री, अडवाणींनाही टाकले मागे
17
बिहारमध्ये डोमिसाईल पॉलिसी मंजूर; शिक्षक भरतीमध्ये ८५ टक्के बिहारींनाच नोकरी मिळणार
18
पाकिस्तानातील प्रत्येक सहावा व्यक्ती भिकारी; परदेशात पसरलं नेटवर्क, दरवर्षी ११७ ट्रिलियन कमाई
19
सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय; घटस्फोटानंतर 12 कोटी रुपये अन् BMW कार मागणाऱ्या पत्नीला काय मिळाले?
20
युजवेंद्र चहलने घटस्फोटावर उघडपणे विधान केल्यानंतर Ex-पत्नी धनश्रीची पोस्ट, म्हणाली- शांतता...

राज्यातील साडेतीन लाख घरे ‘सौभाग्य’मुळे उजळणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 29, 2017 22:39 IST

कोल्हापूर : ज्या घरात अजूनही वीज पोहोचली नाही,

ठळक मुद्देघर तिथे वीजजोडणी : देशाच्या तुलनेत राज्याचा वेग अधिकदोन वर्षांत तब्बल १६ लाख कुटुंबांना वीजपुरवठा करण्यात ‘महावितरण’ यशस्वी

विश्वास पाटील ।लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : ज्या घरात अजूनही वीज पोहोचली नाही, अशा कुटुंबात मोफत वीज देण्याची घोषणा पंतप्रधानांनी सोमवारी (दि. २५) केली असून, त्यानुसार महाराष्ट्रात अजून ३ लाख ६४ हजार कुटुंबांत या ‘सौभाग्य’ योजनेतून वीजपुरवठा करण्याचे आव्हान ‘महावितरण’समोर आहे. ‘महावितरण’ने मार्च २०१५ पासून तब्बल १६ लाख कुटुंबांच्या घरांत उजेड पेरण्याचे काम केले आहे.

देशात अजूनही वीज पोहोचली नाही अशी तब्बल चार कोटी कुटुंबे आहेत. त्यांना मार्च २०१९ पर्यंत वीज देण्याचे पंतप्रधानांनी जाहीर केले आहे. त्यासाठी केंद्र सरकार १६ हजार ३२० कोटी रुपये खर्च करणार आहे. सन २०११ च्या सामाजिक व आणि आर्थिक जनगणनेमध्ये नोंदविण्यात आलेल्या गरिबांना मोफत कनेक्शन देण्याची ही ‘सौभाग्य’ योजना आहे. पंतप्रधानांनी योजना जाहीर केल्यावर महाराष्ट्रात अंधारात संसार करणारी किती कुटुंबे आहेत, याचा शोध ‘लोकमत’ने घेतला.

मार्च २०१५ पर्यंत अशी वीज नसलेली राज्यातील ३० जिल्ह्यांत तब्बल १९ लाख ३६ हजार ६९० कुटुंबे होती. ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मनावर घेऊन ‘घर तिथे वीज’ देण्याचा कार्यक्रम अत्यंत कार्यक्षमतेने राबविला. त्यातून दोन वर्षांत तब्बल १६ लाख कुटुंबांना वीजपुरवठा करण्यात ‘महावितरण’ यशस्वी झाले आहे. ज्या अत्यंत दुर्गम भागात वीज नेण्यासाठी अडचणीच आहेत, तिथे महाराष्ट्र ऊर्जा विकास यंत्रणेच्या (महाऊर्जा) माध्यमातून अपारंपरिक ऊर्जासाधनांचा वापर करून वीजपुरवठा करण्याचे प्रयत्न आहेत. मुख्यत: गडचिरोली, नंदूरबार अणि चंद्रपूर जिल्ह्यांत अशी १११ गावे असून, तिथे ३० कोटी खर्चून डिसेंबर २०१७ पर्यंत वीजजोडणी देण्याचे नियोजन आहे.वीजपुरवठा नसलेल्या कुटुंबांची जिल्ह्यांतील संख्यासातारा- १०४८३ सांगली- ५१९१, सिंधुदुर्ग- ४०६५ ठाणे- २२०१३, नाशिक- २१९५८ नंदूरबार ३३६५६, जळगाव- २९३२८ पुणे- २७१३,नांदेड- २२५५८ गडचिरोली- २२४७०,बीड- २२०४४.वीजपुरवठ्यात अडचणी काय...नव्याने वाड्या-वसाहती झालेला भागअत्यंत दुर्गम भागांत वीजजोडणी देण्यात अडचणीअभयारण्य असलेल्या जिल्ह्यांत वनविभागाच्या परवानगीसाठी अडचणीआर्थिक स्थिती गरिबीची असल्याने वीजजोडणीसाठी मागणीच नाही. 

‘पंडित दीनदयाळ उपाध्याय ग्रामज्योती योजने’तून १२ लाख कुटुंबांत वीजपुरवठा करता येईल अशा पायाभूत सुविधांची उभारणी महाराष्ट्रात झाली आहे. वीज पुरवठ्याचे राज्यात ९७ टक्के काम पूर्ण झाले आहे.- किशोर शेगोकार, अधीक्षक अभियंताग्रामीण विद्युतीकरण विभाग