शहरं
Join us  
Trending Stories
1
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
2
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
3
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
4
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
5
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
6
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
7
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
8
पहिल्या डावात झिरो, तोच फायनलचा हिरो! मार्करम हा शतकातील असा पहिला 'शतकवीर' ज्यानं...
9
उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला 
10
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
11
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
12
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
13
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
14
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
15
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
16
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
17
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
18
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
19
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
20
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?

राज्यातील साडेतीन लाख घरे ‘सौभाग्य’मुळे उजळणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 29, 2017 22:39 IST

कोल्हापूर : ज्या घरात अजूनही वीज पोहोचली नाही,

ठळक मुद्देघर तिथे वीजजोडणी : देशाच्या तुलनेत राज्याचा वेग अधिकदोन वर्षांत तब्बल १६ लाख कुटुंबांना वीजपुरवठा करण्यात ‘महावितरण’ यशस्वी

विश्वास पाटील ।लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : ज्या घरात अजूनही वीज पोहोचली नाही, अशा कुटुंबात मोफत वीज देण्याची घोषणा पंतप्रधानांनी सोमवारी (दि. २५) केली असून, त्यानुसार महाराष्ट्रात अजून ३ लाख ६४ हजार कुटुंबांत या ‘सौभाग्य’ योजनेतून वीजपुरवठा करण्याचे आव्हान ‘महावितरण’समोर आहे. ‘महावितरण’ने मार्च २०१५ पासून तब्बल १६ लाख कुटुंबांच्या घरांत उजेड पेरण्याचे काम केले आहे.

देशात अजूनही वीज पोहोचली नाही अशी तब्बल चार कोटी कुटुंबे आहेत. त्यांना मार्च २०१९ पर्यंत वीज देण्याचे पंतप्रधानांनी जाहीर केले आहे. त्यासाठी केंद्र सरकार १६ हजार ३२० कोटी रुपये खर्च करणार आहे. सन २०११ च्या सामाजिक व आणि आर्थिक जनगणनेमध्ये नोंदविण्यात आलेल्या गरिबांना मोफत कनेक्शन देण्याची ही ‘सौभाग्य’ योजना आहे. पंतप्रधानांनी योजना जाहीर केल्यावर महाराष्ट्रात अंधारात संसार करणारी किती कुटुंबे आहेत, याचा शोध ‘लोकमत’ने घेतला.

मार्च २०१५ पर्यंत अशी वीज नसलेली राज्यातील ३० जिल्ह्यांत तब्बल १९ लाख ३६ हजार ६९० कुटुंबे होती. ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मनावर घेऊन ‘घर तिथे वीज’ देण्याचा कार्यक्रम अत्यंत कार्यक्षमतेने राबविला. त्यातून दोन वर्षांत तब्बल १६ लाख कुटुंबांना वीजपुरवठा करण्यात ‘महावितरण’ यशस्वी झाले आहे. ज्या अत्यंत दुर्गम भागात वीज नेण्यासाठी अडचणीच आहेत, तिथे महाराष्ट्र ऊर्जा विकास यंत्रणेच्या (महाऊर्जा) माध्यमातून अपारंपरिक ऊर्जासाधनांचा वापर करून वीजपुरवठा करण्याचे प्रयत्न आहेत. मुख्यत: गडचिरोली, नंदूरबार अणि चंद्रपूर जिल्ह्यांत अशी १११ गावे असून, तिथे ३० कोटी खर्चून डिसेंबर २०१७ पर्यंत वीजजोडणी देण्याचे नियोजन आहे.वीजपुरवठा नसलेल्या कुटुंबांची जिल्ह्यांतील संख्यासातारा- १०४८३ सांगली- ५१९१, सिंधुदुर्ग- ४०६५ ठाणे- २२०१३, नाशिक- २१९५८ नंदूरबार ३३६५६, जळगाव- २९३२८ पुणे- २७१३,नांदेड- २२५५८ गडचिरोली- २२४७०,बीड- २२०४४.वीजपुरवठ्यात अडचणी काय...नव्याने वाड्या-वसाहती झालेला भागअत्यंत दुर्गम भागांत वीजजोडणी देण्यात अडचणीअभयारण्य असलेल्या जिल्ह्यांत वनविभागाच्या परवानगीसाठी अडचणीआर्थिक स्थिती गरिबीची असल्याने वीजजोडणीसाठी मागणीच नाही. 

‘पंडित दीनदयाळ उपाध्याय ग्रामज्योती योजने’तून १२ लाख कुटुंबांत वीजपुरवठा करता येईल अशा पायाभूत सुविधांची उभारणी महाराष्ट्रात झाली आहे. वीज पुरवठ्याचे राज्यात ९७ टक्के काम पूर्ण झाले आहे.- किशोर शेगोकार, अधीक्षक अभियंताग्रामीण विद्युतीकरण विभाग