शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली स्फोटातील कारचा मालक सलमान पोलिसांच्या ताब्यात; गाडी दुसऱ्याला विकल्याचा दावा! पोलिसांची चौकशी सुरू
2
लाल किल्ल्याजवळ कारचा भीषण स्फोट, ८ ठार; 'प्रत्येक अँगलने तपास करा', गृहमंत्री अमित शाह यांचे तातडीचे आदेश!
3
लाल किल्याजवळील स्फोटाने देश हादरला; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा अमित शाह यांना फोन, पोस्ट करत म्हणाले-
4
Red Fort Blast Video: अनेकांच्या उडाल्या चिंधड्या! स्फोटानंतरची दृश्ये बघून होईल थरकाप, नेमकी कुठे घडली घटना?
5
Prem Chopra : दिग्गज अभिनेते प्रेम चोप्रा यांच्या प्रकृतीत सुधारणा; लीलावती रुग्णालयात दाखल
6
Red Fort Blast:  कार हळूहळू सिग्नलजवळ येऊन थांबली अन् झाला स्फोट; पोलीस आयुक्तांनी सांगितली घटना
7
लाल किल्ल्याजवळील स्फोटानंतर महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशमध्ये हाय अलर्ट! तपास यंत्रणा सतर्क
8
Delhi Red Fort Blast: मोठी बातमी! दिल्लीत लाल किल्ल्याजवळ भीषण स्फोट, 8 जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
9
कुणाचा हात तुटून पडला, कुणाचा कोथळा बाहेर आला; प्रत्यक्षदर्शीने सांगितली दिल्ली स्फोटाची हादरवून टाकणारी घटना
10
'त्या' जमीन गैरव्यवहार प्रकरणात पार्थ पवार, शीतल तेजवानींना पोलिसांकडून क्लीन चिट
11
भयानक कोसळणार ...! मी १९७१ पासून सोने खरेदी करतोय, पण...; रॉबर्ट कियोसाकी यांच्या दाव्याने खळबळ 
12
दहशतवाद्यांच्या टोळीत महिला डॉक्टरही सामील, थेट पाकिस्तानशी कनेक्शन; कारमध्ये घेऊन फिरत होती एके ४७!
13
जडेजाला संघाबाहेर काढण्यात धोनी सगळ्यात पुढे असेल! माजी क्रिकेटरनं त्यामागचं कारणही सांगून टाकलं
14
भारताच्या शेजारी देशांत भरतो 'नवरीचा बाजार', खरेदी करण्यासाठी चीनमधून येतात लोक! काय आहे प्रकार?
15
राष्ट्रवादीने हटवले तरी रुपाली ठोंबरे पाटील 'प्रवक्त्या'च; पोस्ट करत म्हणाल्या, 'अजित पवारांना भेटून...'
16
ताजमहालसमोर साखरपुडा...! दोनवेळा ऑस्ट्रेलियाला वर्ल्डकप जिंकविणारी भारताची सून होणार; कोण आहे ती...
17
अभिनेते धर्मेंद्र व्हेंटिलेटरवर? आयसीयूत सुरु आहेत उपचार; टीमने दिली हेल्थ अपडेट, म्हणाले...
18
"मी तुझ्या बापाला मारलं, मृतदेह सुटकेसमध्ये..."; बायकोने नवऱ्याला संपवलं, लेकीला केला फोन
19
Honeymoon Destinations : गुलाबी थंडीत रोमँटिक हनिमून प्लॅन करताय? भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट!
20
"पंक्चर बनवणारे येऊन...!", बिहारमध्ये योगी आदित्यनाथांची तुफान बॅटिंग; विरोधकांवर थेट हल्लाबोल

राज्यातील साडेतीन लाख घरे ‘सौभाग्य’मुळे उजळणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 29, 2017 22:39 IST

कोल्हापूर : ज्या घरात अजूनही वीज पोहोचली नाही,

ठळक मुद्देघर तिथे वीजजोडणी : देशाच्या तुलनेत राज्याचा वेग अधिकदोन वर्षांत तब्बल १६ लाख कुटुंबांना वीजपुरवठा करण्यात ‘महावितरण’ यशस्वी

विश्वास पाटील ।लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : ज्या घरात अजूनही वीज पोहोचली नाही, अशा कुटुंबात मोफत वीज देण्याची घोषणा पंतप्रधानांनी सोमवारी (दि. २५) केली असून, त्यानुसार महाराष्ट्रात अजून ३ लाख ६४ हजार कुटुंबांत या ‘सौभाग्य’ योजनेतून वीजपुरवठा करण्याचे आव्हान ‘महावितरण’समोर आहे. ‘महावितरण’ने मार्च २०१५ पासून तब्बल १६ लाख कुटुंबांच्या घरांत उजेड पेरण्याचे काम केले आहे.

देशात अजूनही वीज पोहोचली नाही अशी तब्बल चार कोटी कुटुंबे आहेत. त्यांना मार्च २०१९ पर्यंत वीज देण्याचे पंतप्रधानांनी जाहीर केले आहे. त्यासाठी केंद्र सरकार १६ हजार ३२० कोटी रुपये खर्च करणार आहे. सन २०११ च्या सामाजिक व आणि आर्थिक जनगणनेमध्ये नोंदविण्यात आलेल्या गरिबांना मोफत कनेक्शन देण्याची ही ‘सौभाग्य’ योजना आहे. पंतप्रधानांनी योजना जाहीर केल्यावर महाराष्ट्रात अंधारात संसार करणारी किती कुटुंबे आहेत, याचा शोध ‘लोकमत’ने घेतला.

मार्च २०१५ पर्यंत अशी वीज नसलेली राज्यातील ३० जिल्ह्यांत तब्बल १९ लाख ३६ हजार ६९० कुटुंबे होती. ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मनावर घेऊन ‘घर तिथे वीज’ देण्याचा कार्यक्रम अत्यंत कार्यक्षमतेने राबविला. त्यातून दोन वर्षांत तब्बल १६ लाख कुटुंबांना वीजपुरवठा करण्यात ‘महावितरण’ यशस्वी झाले आहे. ज्या अत्यंत दुर्गम भागात वीज नेण्यासाठी अडचणीच आहेत, तिथे महाराष्ट्र ऊर्जा विकास यंत्रणेच्या (महाऊर्जा) माध्यमातून अपारंपरिक ऊर्जासाधनांचा वापर करून वीजपुरवठा करण्याचे प्रयत्न आहेत. मुख्यत: गडचिरोली, नंदूरबार अणि चंद्रपूर जिल्ह्यांत अशी १११ गावे असून, तिथे ३० कोटी खर्चून डिसेंबर २०१७ पर्यंत वीजजोडणी देण्याचे नियोजन आहे.वीजपुरवठा नसलेल्या कुटुंबांची जिल्ह्यांतील संख्यासातारा- १०४८३ सांगली- ५१९१, सिंधुदुर्ग- ४०६५ ठाणे- २२०१३, नाशिक- २१९५८ नंदूरबार ३३६५६, जळगाव- २९३२८ पुणे- २७१३,नांदेड- २२५५८ गडचिरोली- २२४७०,बीड- २२०४४.वीजपुरवठ्यात अडचणी काय...नव्याने वाड्या-वसाहती झालेला भागअत्यंत दुर्गम भागांत वीजजोडणी देण्यात अडचणीअभयारण्य असलेल्या जिल्ह्यांत वनविभागाच्या परवानगीसाठी अडचणीआर्थिक स्थिती गरिबीची असल्याने वीजजोडणीसाठी मागणीच नाही. 

‘पंडित दीनदयाळ उपाध्याय ग्रामज्योती योजने’तून १२ लाख कुटुंबांत वीजपुरवठा करता येईल अशा पायाभूत सुविधांची उभारणी महाराष्ट्रात झाली आहे. वीज पुरवठ्याचे राज्यात ९७ टक्के काम पूर्ण झाले आहे.- किशोर शेगोकार, अधीक्षक अभियंताग्रामीण विद्युतीकरण विभाग