शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
3
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
4
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
5
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
6
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
7
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
8
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
9
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
10
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
11
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
12
अमित शाहांची सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक, पाकिस्तानी नागरिकांबद्दल दिला महत्त्वाचा आदेश
13
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
14
गुंतवणुकीत 'ही' काळजी घेतली, तर होऊ शकता मालामाल! कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या?
15
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
16
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
17
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
18
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
19
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
20
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून

कोल्हापूर रेल्वेस्थानकात सुविधांची वानवा; सरकता जिना, तिकीट काउंटर बंद

By संदीप आडनाईक | Updated: December 9, 2023 13:48 IST

कोल्हापूर : अमृत भारत योजनेतून मंजूर झालेल्या निधीतून कोल्हापूर रेल्वेस्थानकाचे विस्तारीकरण आणि आधुनिकीकरण करून त्याचा तोंडवळा बदलता येणे शक्य ...

कोल्हापूर : अमृत भारत योजनेतून मंजूर झालेल्या निधीतून कोल्हापूररेल्वेस्थानकाचे विस्तारीकरण आणि आधुनिकीकरण करून त्याचा तोंडवळा बदलता येणे शक्य आहे. अ वर्गात असल्यामुळे कोल्हापूर हे मॉडेल रेल्वे स्थानक म्हणून गणले जाते. कोल्हापूर-मिरज-पुणे मार्गावरील दुहेरीकरण आणि विद्युतीकरणाला गती मिळाली आहे. परंतु सुविधा नावालाच आहेत. त्या पूर्ववत सुरु होण्याची गरज आहे.छत्रपती शाहू महाराज टर्मिनस हे कोल्हापूरामधील प्रमुख रेल्वे स्थानक आहे. इमारतही १३७ वर्षापूर्वीची हेरिटेज वास्तू आहे. कोल्हापूरचे छत्रपती शाहू महाराज यांच्या नावावरून या रेल्वे स्थानकाचे नाव दिले गेले आहे. भारतीय रेल्वेच्या मध्य रेल्वे विभागाद्वारे या स्थानकाचे नियंत्रण केले जाते. या स्थानकावरुन सुमारे ४० लाख प्रवासी प्रवास करतात. शिवाय वर्षाला ५० कोटी रुपयांचे उत्पन्न मिळते.

२०२० मध्ये प्लॅटफॉर्म विस्तारीकरण करण्यात आले. कोल्हापूर ते वैभववाडी रेल्वे मार्गाचे काम लवकरच सुरु होणार आहे. मिरज-पुणे रेल्वेमार्गाचे दुहेरीकरण झाल्यास गाड्यांची संख्या वाढणार आहे. कोल्हापुरातून सध्या मुंबई, पुणे, नागपूर, तिरुपती, सोलापूर, दिल्ली, अहमदाबाद, धनबाद अशा शहरांकडे किमान १० गाड्या सुटतात. मिरज-कुर्डुवाडी मार्गाचे रुंदीकरण पूर्ण झाल्यानंतर कोल्हापूरपासून सोलापूर आणि हैदराबादपर्यंत रेल्वेप्रवास शक्य झाला आहे.मॉडेल रेल्वेस्थानकामुळे सध्या कोल्हापूरच्या स्थानकावर स्वच्छता मोहीम चांगल्या पद्धतीने राबवली जाते. भाजी मंडईच्या बाजूला सरकता जिना आहे, परंतु त्यांचा वापर प्रवाशांसाठी होत नाही, जेम्स स्टोनकडून रेल्वे प्लॅटफार्मवर येताना प्रवाशांसाठी त्या बाजूलाही तिकीट काउंटर आहे, पण तेही बंद आहे. 

या सुविधांसह कोल्हापूर रेल्वेस्थानकाचे विस्तारीकरण आणि आधुनिकीकरण करणे शक्य आहे. सध्या कोल्हापूर रेल्वेस्थानकावर एक, दोन, तीन आणि चार असे प्लॅटफार्म आहेत. यावरून एक्सप्रेस आणि पॅसेंजर गाड्या सोडल्या जातात. यातील तीन लाइन्स रेल्वेची दुरूस्ती, स्वच्छतेसाठी वापरली जाते. आता या स्थानकावर ८ गाड्या एकाचवेळी थांबण्याची क्षमता आहे.बेळगाव, पंढरपूर, कुर्डूवाडी पॅसेंजरची सोय होईलमिरज ते पंढरपूर विद्युतीकरण झाले पण या मार्गावर गाड्या सोडल्या जात नाहीत. तिथे नव्या गाड्या सोडणे शक्य आहे. बेळगवा, कुर्डूवाडी, पंढरपूर या मार्गावर पॅसेंजर गाड्यां सुरु केल्यास प्रवाशांची सोय होउ शकते.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरrailwayरेल्वे