शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
3
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
4
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
5
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
6
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
7
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
8
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
9
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
10
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
11
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
12
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
13
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
14
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
15
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
16
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
17
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे
18
दहशतवाद्यांचे लॉन्च पॅड, हाफिज सईद, मसूदचे अड्डे, कारवाईदरम्यान या पाच ठिकाणांना भारत करू शकतो लक्ष्य
19
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...

कूजबूज-विश्वास पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2021 04:24 IST

उपमुख्यमंत्री अजित पवार चार दिवसांपूर्वी पूर पाहणी दौऱ्यासाठी येऊन गेले. पहिल्यांदा ते हातकणंगले तालुक्यातील एका गावात गेले. या ...

उपमुख्यमंत्री अजित पवार चार दिवसांपूर्वी पूर पाहणी दौऱ्यासाठी येऊन गेले. पहिल्यांदा ते हातकणंगले तालुक्यातील एका गावात गेले. या महापुरात हे गाव शंभर टक्के बुडाले होते म्हणून ग्रामस्थांनी शासनाकडे पर्यायी जागा देण्याची मागणी केली. पवार यांनी जागा लगेच देतो परंतु गावातील हे जे कोटी-कोटीचे बंगले दिसतात ना ते सरकारजमा करावे लागतील, असे सुचविल्यावर जागा मागणाऱ्यांची चांगलीच पंचाईत झाली.

-------------

असाही फायदा...

गोष्ट दोन दिवसांपूर्वीची. करवीर तालुक्यातील एका गावाच्या कट्ट्यावर चर्चा रंगली होती. साहेबांचा मुलगा झेडपीचा अध्यक्ष झाल्याबद्दल काँग्रेसवाले खुशीत होते. त्यातून विषय सुरू झाल्यावर गावातला एका खडूस कार्यकर्त्याने नेमकं दुखऱ्या नसीवर बोट ठेवलं. म्हणतोय कसा... ‘राहुल अध्यक्ष झाल्याने काँग्रेसचा काय फायदा होणार याचा हिशोब नंतर मांडू; परंतु किमान काँग्रेसमधील दोन्ही प्रमुख साहेबांचे फोटो एका डिजिटलवर झळकले हे काय कमी झाले व्हय? नाहीतर आम्हाला कुणाचा फोटो लावायचा यापेक्षा कुणाचा लावायचा नाही, यावरूनच जास्त तरास व्हायचा हो... त्यातून आता सुटका झाली बघा...’

गुणवत्तेला टोंगा...

‘ऊस डोंगा परी रस नव्हे डोंगा... काय भुललासी वरलिया रंगा’ असा संत चोखोबांचा एक अभंग आहे. परंतु, सध्याचे दिवस वरलिया रंगाला भुलण्याचेच आहेत. हे आठवण्याचे कारण म्हणजे कोल्हापुरात गेल्या आठवड्यात चौकाचौकांत भले मोठे (राजकीय पुढाऱ्यांनाही मागे टाकणारे) डिजिटल झळकले. कारण काय तर या साहेबांना म्हणे कुण्या टोंगा विद्यापीठाने पीएच. डी. प्रदान केली. या विद्यापीठाची आणि त्यांनी दिलेल्या विकतच्या पदव्या घेणाऱ्यांची गुणवत्ता काय, हा संशोधनाचाच विषय आहे. त्यासाठी जिल्हा परिषदेनेही एखादी समिती नेमायला हरकत नसावी, अशी चर्चा हायस्कूलच्या गुरुजींमध्ये सध्या सुरू आहे.