शहरं
Join us  
Trending Stories
1
"एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्याने वाईट वाटलं आणि घरी निघून गेलो,पण पुन्हा..."; रवींद्र चव्हाणांचा गौप्यस्फोट
2
शेवटच्या 3 सेकंदांत 'RUN' वरून 'CUTOFF' झालं 'फ्यूल कंट्रोल स्विच' अ्न...; एअर इंडिया प्लेन क्रॅशवेळी शेवटच्या क्षणाला नेमकं काय घडलं?
3
"माझा नातेवाईक का असेना, टायरमध्ये घालून झोडायला सांगणार"; बारामतीत अजित पवारांचा कडक इशारा
4
KL राहुलची विक्रमी सेंच्युरी; लॉर्ड्सच्या मैदानात अशी कामगिरी करणारा ठरला दुसरा भारतीय
5
भारतातील रस्त्यावरही टेस्लाच्या कार धावणार; या दिवशी पहिलं शोरूम सुरू होणार, लवकरच डिलिव्हरी सुरू होईल
6
Air India Plane Crash :'रिपोर्ट लीक कसा झाला?' अहमदाबाद विमान अपघाताच्या अहवालावर पायलट असोसिएशनने आक्षेप घेतला
7
पंतची मोठी चूक! चोरटी धाव घेण्याच्या नादात फुकटात फेकली विकेट! बेन स्टोक्सचा डायरेक्ट थ्रो अन्...
8
नरेंद्र मोदींनंतर PM म्हणून काँग्रेसकडून राहुल गांधींचा पर्याय? शं‍कराचार्यांचे मोठे विधान
9
“७५ वर्षांचा नियम RSSला लागू करायचा असेल, म्हणून मोहन भागवत तसे म्हणाले असतील”: शंकराचार्य
10
गुरु-चंद्र-राहुचा वसुमान ग्रहण योग: ७ राशींना भरभराट, भाग्योदय; पैसा-प्रतिष्ठा, कल्याण होईल!
11
सात वर्षांपूर्वीच दिला होता ७३७ जेटमधील स्विचच्या समस्येबद्दल इशारा; एअर इंडिया विमान अपघाताला ठरले कारण?
12
"जयंत पाटलांच्या राजीनाम्याची बातमी खोडसाळपणा...", प्रदेशाध्यक्षपदावरुन जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्टच सांगितलं
13
पंतची कडक फटकेबाजी! चौकारासह जोफ्राचं स्वागत अन् स्टोक्सला उत्तुंग षटकार मारत साजरी केली फिफ्टी
14
Radhika Yadav : "मी मुलीचा वध केला, मला फाशी द्या"; राधिकाला संपवल्यावर भावासमोर काय म्हणाले वडील?
15
'तो मला बायको म्हणायचा', मुंबईतील शिक्षिकेचा विद्यार्थ्यासोबतच्या संबंधाबद्दल चक्रावून टाकणारा खुलासा
16
Sankashti Chaturthi 2025: चातुर्मासातली पहिली संकष्टी, बाराही राशींसाठी ठरणार खास; पूर्ण होणार प्रत्येक आस!
17
१८० प्रवाशांऐवजी केवळ १५५ जणांनाच घेऊन उडाले एअर इंडियाचे विमान! विमानतळावर गोंधळ,नेमके झाले काय?
18
पतीचा भर रस्त्यात तमाशा; पत्नीवर केले सपासप वार, जांघेत अडकली तलवार! कशावरून झाला वाद?
19
“२० देशांनी भारताच्या बाजूने मतदान केले, १२ किल्ले जागतिक वारसा स्थळ घोषित झाले”: CM फडणवीस
20
CHYD च्या नवीन पर्वात निलेश साबळेंना मिस करशील का? गौरव मोरे म्हणाला, "मी त्यांच्यासोबत..."

कृष्णा, पंचगंगा शाप की वरदान ?

By admin | Updated: November 18, 2015 00:11 IST

दूषित पाण्याचा विळखा : साथीच्या आजाराने नागरिक त्रस्त, प्रदूषणाचा प्रश्न कधी सुटणार

संदीप बावचे -- जयसिंगपूर -पंचगंगापाठोपाठ कृष्णा नदीही दूषित बनली आहे. त्यामुळे तालुक्यातील जनतेच्या आरोग्याचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. परिणामी मोठ्या प्रमाणात साथीचे आजार फैलावत आहेत. चिकुनगुन्यासदृश साथीचा फैलाव झाला आहे. यामुळे पंचगंगा नदी शिरोळ तालुक्यासाठी आणखी शाप ठरत आहे.कोल्हापूर, इचलकरंजी शहरातील मैलामिश्रित पाणी, औद्योगिक सांडपाणी थेट पंचगंगा नदी पात्रात मिसळत असल्याने हे दूषित पाणी तेरवाड बंधाऱ्यातून खाली सोडण्यात येते. पुढे नृसिंहवाडी येथे कृष्णा नदीत हे दूषित पाणी मिसळते. पावसाळ्यानंतर कर्नाटकातील हिप्परगी धरणाचे दरवाजे बंद केले जातात. त्याचा परिणाम शिरोळ तालुक्यावर दिसून येतो. आॅक्टोबरनंतर शिरोळ तालुक्यातील कृष्णा, पंचगंगा नदीची पाणीपातळी कमी झाल्याने धरणातून पाणी सोडण्यात येते. याचा फायदा नदी प्रदूषित करणारे घटक उचलतात. नव्याने पाणी सोडण्यात आल्यानंतर प्रदूषित पाणी वाहत्या पाण्यात सोडण्यात येते. यामुळे पंचगंगा, कृष्णा नदीपात्रातील मासे मृत पावत असून आरोग्याचा प्रश्न निर्माण होत आहे. हिप्परगी धरणाच्या बॅक वॉटरमुळे प्रदूषित पाणी पुढे प्रवाहित होत नसल्याने याचा परिणाम शिरोळ तालुक्यात सध्या जाणवत आहे. दूषित पाणी पुढे प्रवाहित न झाल्यामुळे कृष्णा व पंचगंगा नदीवर अवलंबून असणाऱ्या सुमारे ४० हून अधिक गावांना त्याचा फटका प्रत्येक वर्षी बसतो. सध्या जवळपास चारही नदी पात्रात दूषित पाणी दाखल झाले आहे. हेच दूषित पाणी नागरिकांना प्यावे लागत आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात तालुक्यातील प्रत्येक गावात साथीचे आजार वाढले आहेत. चिकुनगुन्यासदृश तापाची लागण झाली आहे. सर्व शासकीय रुग्णालयासह खासगी रुग्णालयात रुग्णांची संख्या वाढत आहे. औषधोपचारासह पाणी दूषित असल्याने पाणी गरम करून प्यावे, असा सल्ला वैद्यकीय अधिकारी देऊ लागले आहेत. या दूषित पाण्याचा विळखा कधी थांबणार हाच यक्षप्रश्न शिरोळ तालुक्यातील जनतेसमोर आ वासून उभा आहे. प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून होत नसलेली ठोस कारवाई, निवडणुकीपुरतीच नेत्यांची आश्वासने अशा अनेक चक्रात पंचगंगा नदी प्रदूषणाचा प्रश्न रेंगाळतच पडला आहे. मुंबई उच्च न्यायालयात पंचगंगा प्रदूषणाच्या प्रश्नावर न्यायालयीन लढा सुरू आहे, तो कधी संपणार असाही प्रश्न आजमितीला कायम आहे. (उत्तरार्ध)‘शिरोळ’ला शिक्षा काळ्या पाण्याची ! प्रदूषणात भरदुष्काळसदृश परिस्थितीमुळे यंदा नदी पात्रातील पाण्याची पातळी खालावली आहे. वर्षभर पाणीपुरवठा सुरळीत व्हावा या उद्देशाने धरणातूनही कमी प्रमाणात पाणी सोडण्यात येत आहे. परिणामी शेतीला पाणी कमी प्रमाणात मिळणार आहे. दरम्यान, लवकरच शिरोळ तालुक्यातील कृष्णा नदी पात्रात वाळू प्लॉटचे लिलाव होणार आहेत. मात्र, नदी पात्रात कमी पाणी असल्यामुळे यांत्रिकी बोटीने वाळू उपसा सुरू झाल्यास तेलाचा तवंग पाण्यावर पसरून दूषित पाण्याचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर येणार आहे.