शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
3
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
4
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
5
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
8
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
9
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
10
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
11
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
12
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
13
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
14
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
15
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
16
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
17
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
18
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
19
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
20
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
Daily Top 2Weekly Top 5

कृष्णा, पंचगंगा शाप की वरदान ?

By admin | Updated: November 18, 2015 00:11 IST

दूषित पाण्याचा विळखा : साथीच्या आजाराने नागरिक त्रस्त, प्रदूषणाचा प्रश्न कधी सुटणार

संदीप बावचे -- जयसिंगपूर -पंचगंगापाठोपाठ कृष्णा नदीही दूषित बनली आहे. त्यामुळे तालुक्यातील जनतेच्या आरोग्याचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. परिणामी मोठ्या प्रमाणात साथीचे आजार फैलावत आहेत. चिकुनगुन्यासदृश साथीचा फैलाव झाला आहे. यामुळे पंचगंगा नदी शिरोळ तालुक्यासाठी आणखी शाप ठरत आहे.कोल्हापूर, इचलकरंजी शहरातील मैलामिश्रित पाणी, औद्योगिक सांडपाणी थेट पंचगंगा नदी पात्रात मिसळत असल्याने हे दूषित पाणी तेरवाड बंधाऱ्यातून खाली सोडण्यात येते. पुढे नृसिंहवाडी येथे कृष्णा नदीत हे दूषित पाणी मिसळते. पावसाळ्यानंतर कर्नाटकातील हिप्परगी धरणाचे दरवाजे बंद केले जातात. त्याचा परिणाम शिरोळ तालुक्यावर दिसून येतो. आॅक्टोबरनंतर शिरोळ तालुक्यातील कृष्णा, पंचगंगा नदीची पाणीपातळी कमी झाल्याने धरणातून पाणी सोडण्यात येते. याचा फायदा नदी प्रदूषित करणारे घटक उचलतात. नव्याने पाणी सोडण्यात आल्यानंतर प्रदूषित पाणी वाहत्या पाण्यात सोडण्यात येते. यामुळे पंचगंगा, कृष्णा नदीपात्रातील मासे मृत पावत असून आरोग्याचा प्रश्न निर्माण होत आहे. हिप्परगी धरणाच्या बॅक वॉटरमुळे प्रदूषित पाणी पुढे प्रवाहित होत नसल्याने याचा परिणाम शिरोळ तालुक्यात सध्या जाणवत आहे. दूषित पाणी पुढे प्रवाहित न झाल्यामुळे कृष्णा व पंचगंगा नदीवर अवलंबून असणाऱ्या सुमारे ४० हून अधिक गावांना त्याचा फटका प्रत्येक वर्षी बसतो. सध्या जवळपास चारही नदी पात्रात दूषित पाणी दाखल झाले आहे. हेच दूषित पाणी नागरिकांना प्यावे लागत आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात तालुक्यातील प्रत्येक गावात साथीचे आजार वाढले आहेत. चिकुनगुन्यासदृश तापाची लागण झाली आहे. सर्व शासकीय रुग्णालयासह खासगी रुग्णालयात रुग्णांची संख्या वाढत आहे. औषधोपचारासह पाणी दूषित असल्याने पाणी गरम करून प्यावे, असा सल्ला वैद्यकीय अधिकारी देऊ लागले आहेत. या दूषित पाण्याचा विळखा कधी थांबणार हाच यक्षप्रश्न शिरोळ तालुक्यातील जनतेसमोर आ वासून उभा आहे. प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून होत नसलेली ठोस कारवाई, निवडणुकीपुरतीच नेत्यांची आश्वासने अशा अनेक चक्रात पंचगंगा नदी प्रदूषणाचा प्रश्न रेंगाळतच पडला आहे. मुंबई उच्च न्यायालयात पंचगंगा प्रदूषणाच्या प्रश्नावर न्यायालयीन लढा सुरू आहे, तो कधी संपणार असाही प्रश्न आजमितीला कायम आहे. (उत्तरार्ध)‘शिरोळ’ला शिक्षा काळ्या पाण्याची ! प्रदूषणात भरदुष्काळसदृश परिस्थितीमुळे यंदा नदी पात्रातील पाण्याची पातळी खालावली आहे. वर्षभर पाणीपुरवठा सुरळीत व्हावा या उद्देशाने धरणातूनही कमी प्रमाणात पाणी सोडण्यात येत आहे. परिणामी शेतीला पाणी कमी प्रमाणात मिळणार आहे. दरम्यान, लवकरच शिरोळ तालुक्यातील कृष्णा नदी पात्रात वाळू प्लॉटचे लिलाव होणार आहेत. मात्र, नदी पात्रात कमी पाणी असल्यामुळे यांत्रिकी बोटीने वाळू उपसा सुरू झाल्यास तेलाचा तवंग पाण्यावर पसरून दूषित पाण्याचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर येणार आहे.