शहरं
Join us  
Trending Stories
1
तब्बल २० वर्षांनी राज ठाकरे शिवसेना भवनात जाणार; मनसे स्थापनेनंतर पहिल्यांदाच 'असं' घडणार
2
“आता मोदींचा फोन आला तरी माघार नाही, अपक्ष लढणारच”; तिकीट नाकारताच भाजपा नेत्याचा एल्गार
3
नागपुरात भाजपाच्या बंडखोर उमेदवाराला समर्थकांनीच घरात कोंडलं, गावंडे म्हणाले, "पाया पडतो, मला..."
4
“मोहन भागवत हिंदीत बोलतात, मराठीत बोलताना कधी ऐकले आहे का?”; संजय राऊतांची RSSवर टीका
5
भाजपच्या आणखी दोन जागा बिनविरोध; प्रभाग 19 मधून दर्शना भोईर तर प्रभाग 20 मधून अजय बहिरा बिनविरोध
6
धक्कादायक! भारतात महिला कैद्यांच्या संख्येत विक्रमी १६२% वाढ; पुरुष कैद्यांच्या वाढीच्या तुलनेत वेग दुप्पट!
7
काँग्रेसच्या सर्व्हेनेच राहुल गांधींचा दावा खोटा ठरवला! लोकांचा ईव्हीएमवर विश्वास
8
Nashik Municipal Election 2026: एबी फॉर्म घोटाळा नाट्य; अखेर मुख्यमंत्री मैदानात; घोळ घालणाऱ्यांवर कारवाईचे आश्वासन
9
मुलींच्या मेसेजने हैराण झालाय प्रणित मोरे, चाहतीने घातली थेट लग्नाची मागणी, म्हणाला- "तिने मला पत्रिका पाठवली आणि..."
10
बंटी जहागीरदार हत्या: गोळ्या झाडून फरार झालेल्या आरोपींना समृद्धी महामार्गावर अटक, कसे पकडले?
11
'आम्ही तुझ्याबद्दल विचार करतो..', न्यूयॉर्कचे महापौर जोहरान ममदानी यांचे उमर खालिदला पत्र
12
मी पाकिस्तानी अन् मुस्लिम यामुळे मला...; गंभीर आरोप करत ऑस्ट्रेलियाच्या क्रिकेटरने केली निवृत्तीची घोषणा...
13
हृदयद्रावक! आईला शेवटचा कॉल, पत्नीला पाठवलं लोकेशन; SBI मॅनेजरने नदीत मारली उडी अन्...
14
पहिल्याच दिवशी १००% नं वधारला 'हा' शेअर, गुंतवणूकदारांचे पैसे झाले दुप्पट; IPO ला मिळालेला जोरदार प्रतिसाद
15
Mumbai Crime: डिलिव्हरी बॉय बनून घरात शिरला, चाकूचा धाक दाखवून विद्यार्थिनीला लुटलं अन्... अंधेरीतील थरार!
16
Nashik Municipal Election 2026: भाजप शहराध्यक्षांना नाराजीची गाजरे! सुनील केदार यांना घेराव, पक्ष कार्यालयात कोंडण्याचा प्रयत्न
17
'पागल हो गया है क्या?', अक्षय खन्ना कास्टिंग डायरेक्टरवर चिडलाच; नक्की काय घडलेलं?
18
"देवाने आनंद दिला, पुन्हा हिरावून घेतला"; १० वर्षांनी नवसाने झालेल्या ५ महिन्यांच्या अव्यानचा मृत्यू
19
ज्याची भीती होती ती खरी ठरली, इंदूरमधील मृत्यूचे कारण आले समोर
20
25 वर्षांचा विक्रम मोडला! एका कारने बदलले कंपनीचे नशीब; इतक्या गाड्यांची विक्री...
Daily Top 2Weekly Top 5

पेपरफुटीबाबत कोकण मंडळ सतर्क

By admin | Updated: March 10, 2017 23:10 IST

मोबाईल, इंटरनेट वापरावर प्रतिबंध; सहायक परीरक्षकाच्या अधिकारात वाढ

सागर पाटील -- टेंभ्ये --परीक्षेच्या सुरुवातीच्या काळातच मुंबई, अमरावती व पुणे विभागीय मंडळाच्या कार्यकक्षेत बारावी परीक्षेचा पेपर फुटल्याचा प्रकार घडल्यानंतर कोकण मंडळ सतर्क झाले आहे. हा गैरप्रकार थांबविण्यासाठी राज्य मंडळाने कडक उपाययोजना केली आहे. परीक्षा केंद्रावर केंद्र संचालक व परीरक्षक यांच्या व्यतिरिक्त अन्य कोणत्याही घटकाला मोबाईल अथवा तत्सम साधने वापरण्यास सक्त बंधन घालण्यात आले आहे. परीरक्षक कार्यालयातून प्रश्नपत्रिका घेऊन जाणाऱ्या साहायक परीरक्षकाच्या अधिकारात वाढ करण्यात आली असून, त्यांना बैठ्या पथकाचे काम करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.पेपरफुटीसारख्या गैरप्रकाराला आळा घालण्यासाठी राज्य मंडळाने परीक्षा केंद्रावर परीक्षा कालावधीत भ्रमणध्वनी, टॅबलेट, अन्य इंटरनेट साधने तसेच डिजिटल घड्याळ वापरावर सक्त निर्बंध घातले आहेत. या साधनांच्या माध्यमातूनच पेपर फोडले जात असल्याने परीरक्षक व केंद्र संचालकाव्यतिरिक्त अन्य कोणत्याही घटकाकडे भ्रमणध्वनी अथवा अन्य साधन असणार नाहीत, याची काटेकोर अंमलबजावणी करण्याबाबतचे परिपत्रक कोकण शिक्षण मंडळाने प्रसिद्ध केले आहे.प्रश्नपत्रिका वितरणाबाबतही अधिक दक्षता घेण्यात येणार आहे. निर्धारित वेळेपूर्वी व आवश्यक कार्यपद्धतीचा वापर न करता प्रश्नपत्रिका पाकिटे उघडली जाऊ नयेत, यासाठी काटेकोर तरतूद करण्यात आली आहे. प्रश्नपत्रिका केंद्रावर दिल्यापासून उत्तरपत्रिका परीरक्षकाकडे जमा करेपर्यंत सर्व प्रक्रियेचे पूर्णवेळ परीक्षा केंद्रावर थांबून निरीक्षण व नियंत्रण करण्याचे अधिकार साहाय्यक परीरक्षकांना देण्यात आले आहेत. या बाबीचा अहवाल दैनंदिन स्वरूपात परीरक्षकाकडे सादर करणे साहाय्यक परीरक्षकांना बंधनकारक करण्यात आले आहे.यावर घातली आहेत बंधनेपेपरफुटीसाठी आधुनिक सुविधांचा वापर केला जात असल्याने मोबाईल, टॅबलेट किंवा इंटरनेटचा वापर करता येणारी साधने परीक्षा केंद्रावर नेण्यास बंधन घालण्यात आले आहे. तसेच परीक्षा केंद्रावर डिजिटल घड्याळ वापरण्यावरही निर्बंध घालण्यात आले आहे.काटेकोर अंमलबजावणी सुरूपेपरफुटीचा गैरप्रकार थांबविण्यासाठी राज्य मंडळाने निश्चित केलेल्या उपाययोजनांची कोकण मंडळाने काटेकोरपणे अंमलबजावणी केली आहे. कोकण मंडळाच्या कार्यक्षेत्रात असा कोणताही गैरप्रकार घडणार नाही, याची सर्व प्रकारची काळजी विभागीय मंडळ व प्रशासकीय यंत्रणा घेत आहे. - डॉ. शकुंतला काळे, अध्यक्ष, कोकण परीक्षा मंडळउशिरा येणाऱ्या विद्यार्थ्यांची होणार नोंदपरीक्षा केंद्रावर सकाळी १०.३० नंतर ११.३० पर्यंत येणाऱ्या विद्यार्थ्यांची स्वतंत्र नोंद ठेवणे बंधनकारक करण्यात आले आहे. जर पेपर फुटला तर सकाळच्या वेळात त्याचे वितरण होऊ शकते. त्यामुळे उशिरा येणाऱ्यांची स्वतंत्र नोंद ठेवली जाणार आहे.