शहरं
Join us  
Trending Stories
1
राजस्थानात पाकिस्तान सीमेपासून १५ किमी दूर कोसळलेला ड्रोन सापडला; बीएसएफकडून चौकशी सुरु
2
Mumbai: "युवराज आदित्य ठाकरे या टोलधाडीचे म्होरके होऊन..."; आशिष शेलार ठाकरेंवर भडकले, सगळा घटनाक्रम सांगितला
3
"अफगाणिस्तानचे लोक मनापासून भारतासोबत..." ; मरियम सोलेमानाखिल यांनी पाकिस्तासोबतच्या संबंधावर भाष्य केले
4
Purnam Kumar Shaw : "डोळ्यावर पट्टी बांधून नेलं, टॉर्चर केलं..."; पाकिस्तानातून परतलेल्या BSF जवानाची आपबीती
5
'पाकिस्तानचा अणुबॉम्ब IAEA च्या देखरेखीखाली आणावा', संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची मागणी
6
तुर्कीनं फक्त मैत्रीसाठी केली नाही भारताविरोधात पाकिस्तानची मदत; खरा हेतू तर भलताच...
7
एका झटक्यात सोनं २ हजार रुपयांपेक्षा अधिक झालं स्वस्त, चांदीतही मोठी घसरण; काय आहेत नवे दर?
8
पिता न तू वैरी! किन्नर म्हणत पोटच्या मुलीचा जीव घेतला, नंतर पत्नीच्या पायावर डोकं ठेवत म्हणाला...
9
पाकिस्तानशी यारी, तुर्की-अझरबैजानला पडणार भारी; भारतीयांनी अख्खा बाजार उठवला
10
ना गिल, ना पंत... सुनील गावसकर म्हणतात- 'हा' अनुभवी खेळाडू टीम इंडियाचा कसोटी कर्णधार हवा!
11
"आमचा पुरुषांवरचा विश्वास उडाला"; नवऱ्यांनी फसवलं, दोन मैत्रिणींनी एकमेकींशी लग्न केलं
12
Rajnath Singh : "पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी धर्म विचारुन मारलं, आम्ही त्यांचं कर्म पाहून त्यांना अद्दल घडवली"
13
दिल्ली कॅपिटल्सनं ६ कोटींचा डाव लावला त्यानं दुबईचं फ्लाइट पकडलं! PSL कनेक्शनमुळे तो IPL ला मुकणार?
14
५० हजार पगार, घराचे स्वप्न पूर्ण होईल का? की भाड्यानेच राहणे परवडेल...; असं आहे सोपं गणित
15
हृदयद्रावक! डोक्यावरती अक्षता पडल्या अन् दुसऱ्याच दिवशी सकाळी नववधूला मृत्यूने गाठलं
16
पाकिस्तानी गर्लफ्रेंडला भेटणं भारतीय बॉयफ्रेंडच्या अंगाशी आलं! तुरुंगात कैद होऊन आता म्हणतोय...
17
शिखर धवनची कर्नल सोफिया कुरेशी यांच्यासाठी खास पोस्ट, म्हणाला- 'भारतीय मुस्लिमांना...'
18
तुम्ही भारतातूनही ऑनलाइन स्विस बँकेत खाते उघडू शकता; कशी असते प्रक्रिया? कोणते कागदपत्रे हवीत?
19
"आंबेडकर मालिकेच्या वेळेस साताऱ्यातून एक माणूस भेटायला आला अन्.." अभिनेत्याने सांगितला अंगावर काटा आणणारा किस्सा
20
Maharashtra Politics : डोनाल्ड ट्रम्प यांनाच कुलदैवत माना, गावागावात डोनाल्ड जत्रा भरवा; संजय राऊतांचा भाजपाला टोला

पेपरफुटीबाबत कोकण मंडळ सतर्क

By admin | Updated: March 10, 2017 23:10 IST

मोबाईल, इंटरनेट वापरावर प्रतिबंध; सहायक परीरक्षकाच्या अधिकारात वाढ

सागर पाटील -- टेंभ्ये --परीक्षेच्या सुरुवातीच्या काळातच मुंबई, अमरावती व पुणे विभागीय मंडळाच्या कार्यकक्षेत बारावी परीक्षेचा पेपर फुटल्याचा प्रकार घडल्यानंतर कोकण मंडळ सतर्क झाले आहे. हा गैरप्रकार थांबविण्यासाठी राज्य मंडळाने कडक उपाययोजना केली आहे. परीक्षा केंद्रावर केंद्र संचालक व परीरक्षक यांच्या व्यतिरिक्त अन्य कोणत्याही घटकाला मोबाईल अथवा तत्सम साधने वापरण्यास सक्त बंधन घालण्यात आले आहे. परीरक्षक कार्यालयातून प्रश्नपत्रिका घेऊन जाणाऱ्या साहायक परीरक्षकाच्या अधिकारात वाढ करण्यात आली असून, त्यांना बैठ्या पथकाचे काम करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.पेपरफुटीसारख्या गैरप्रकाराला आळा घालण्यासाठी राज्य मंडळाने परीक्षा केंद्रावर परीक्षा कालावधीत भ्रमणध्वनी, टॅबलेट, अन्य इंटरनेट साधने तसेच डिजिटल घड्याळ वापरावर सक्त निर्बंध घातले आहेत. या साधनांच्या माध्यमातूनच पेपर फोडले जात असल्याने परीरक्षक व केंद्र संचालकाव्यतिरिक्त अन्य कोणत्याही घटकाकडे भ्रमणध्वनी अथवा अन्य साधन असणार नाहीत, याची काटेकोर अंमलबजावणी करण्याबाबतचे परिपत्रक कोकण शिक्षण मंडळाने प्रसिद्ध केले आहे.प्रश्नपत्रिका वितरणाबाबतही अधिक दक्षता घेण्यात येणार आहे. निर्धारित वेळेपूर्वी व आवश्यक कार्यपद्धतीचा वापर न करता प्रश्नपत्रिका पाकिटे उघडली जाऊ नयेत, यासाठी काटेकोर तरतूद करण्यात आली आहे. प्रश्नपत्रिका केंद्रावर दिल्यापासून उत्तरपत्रिका परीरक्षकाकडे जमा करेपर्यंत सर्व प्रक्रियेचे पूर्णवेळ परीक्षा केंद्रावर थांबून निरीक्षण व नियंत्रण करण्याचे अधिकार साहाय्यक परीरक्षकांना देण्यात आले आहेत. या बाबीचा अहवाल दैनंदिन स्वरूपात परीरक्षकाकडे सादर करणे साहाय्यक परीरक्षकांना बंधनकारक करण्यात आले आहे.यावर घातली आहेत बंधनेपेपरफुटीसाठी आधुनिक सुविधांचा वापर केला जात असल्याने मोबाईल, टॅबलेट किंवा इंटरनेटचा वापर करता येणारी साधने परीक्षा केंद्रावर नेण्यास बंधन घालण्यात आले आहे. तसेच परीक्षा केंद्रावर डिजिटल घड्याळ वापरण्यावरही निर्बंध घालण्यात आले आहे.काटेकोर अंमलबजावणी सुरूपेपरफुटीचा गैरप्रकार थांबविण्यासाठी राज्य मंडळाने निश्चित केलेल्या उपाययोजनांची कोकण मंडळाने काटेकोरपणे अंमलबजावणी केली आहे. कोकण मंडळाच्या कार्यक्षेत्रात असा कोणताही गैरप्रकार घडणार नाही, याची सर्व प्रकारची काळजी विभागीय मंडळ व प्रशासकीय यंत्रणा घेत आहे. - डॉ. शकुंतला काळे, अध्यक्ष, कोकण परीक्षा मंडळउशिरा येणाऱ्या विद्यार्थ्यांची होणार नोंदपरीक्षा केंद्रावर सकाळी १०.३० नंतर ११.३० पर्यंत येणाऱ्या विद्यार्थ्यांची स्वतंत्र नोंद ठेवणे बंधनकारक करण्यात आले आहे. जर पेपर फुटला तर सकाळच्या वेळात त्याचे वितरण होऊ शकते. त्यामुळे उशिरा येणाऱ्यांची स्वतंत्र नोंद ठेवली जाणार आहे.