शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
6
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
7
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
8
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
9
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
10
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
11
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
12
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
13
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
14
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
15
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
16
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
17
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
20
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  

गायकवाड कुटुंबीयांच्या मदतीसाठी धावले कोल्हापूरकर, चहाची टपरी पुन्हा उभी : माणुसकीची मदत केंद्राची स्थापना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 5, 2018 15:17 IST

कोरेगाव भीमा घटनेचा निषेध करण्याकरिता बुधवारी निघालेल्या मोर्चावेळी रेल्वे स्थानक परिसरातील टपरी उध्वस्त झाल्याने कुटुंब उघड्यावर आलेल्या श्रीमती शोभा राजाराम गायकवाड (रा. कनाननगर) यांच्या मदतीसाठी गुरुवारी अनेक हात पुढे आले. त्यातून त्यांच्या टपरीसह आयुष्यही उभे राहण्यास मदत झाली. सोशल मीडियावरील डॉ. रासकर मित्रपरिवाराने ‘लोकमत’ शहर कार्यालयात येऊन गायकवाड कुटुंबीयांना आर्थिक मदत दिली.

ठळक मुद्देगायकवाड कुटुंबीयांच्या मदतीसाठी धावले कोल्हापूरकर, चहाची टपरी पुन्हा उभी माणुसकीची मदत केंद्राची स्थापनाडॉ. रासकर मित्रपरिवाराने ‘लोकमत’ कार्यालयात येऊन दिली आर्थिक मदत

कोल्हापूर : कोरेगाव भीमा घटनेचा निषेध करण्याकरिता बुधवारी निघालेल्या मोर्चावेळी रेल्वे स्थानक परिसरातील टपरी उध्वस्त झाल्याने कुटुंब उघड्यावर आलेल्या श्रीमती शोभा राजाराम गायकवाड (रा. कनाननगर) यांच्या मदतीसाठी गुरुवारी अनेक हात पुढे आले. त्यातून त्यांच्या टपरीसह आयुष्यही उभे राहण्यास मदत झाली. सोशल मीडियावरील डॉ. रासकर मित्रपरिवाराने ‘लोकमत’ शहर कार्यालयात येऊन गायकवाड कुटुंबीयांना आर्थिक मदत दिली.पतीच्या अकाली निधनामुळे शोभा गायकवाड यांनी दोन मुलांसह संसाराचा गाडा चालविण्यासाठी रेल्वेस्थानक परिसरात चहा-नाष्ट्याची टपरी सुरू केली. गेली काही दिवस साहित्य आणण्यासाठी पैसे नसल्याने टपरी बंद ठेवली होती. मात्र, घरमालकांकडून काही पैसे उसने घेऊन मंगळवारी सकाळी सर्व साहित्य टपरीत भरले.

मात्र, आंदोलकांनी बंद टपरीही उलथवून टाकली. उसने पैसे घेऊन भरलेले सर्व साहित्य रस्त्यांवर पसरल्याने गायकवाड कुटुंबीय हतबल झाले. या घटनेची माहिती कळताच सर्वजण मदतीसाठी धावून आले.

‘आम्ही कोल्हापुरी’ या सोशल मीडियावरील ग्रुपचे सदस्य गणी आजरेकर, हर्षल सुर्वे, आशपाक आजरेकर,शाकीर शेख, अजिंक्य पाटील यांच्यासह बंडा साळोखे, महेश उरसाल यांनी गायकवाड कुटुंबियांना चहा पावडर, साखर, कपबशा, बॅटरीसह आर्थिक मदत केली.डॉ. देवेंद्र रासकर मित्रपरिवारांने सोशल मिडीयावर मदतीचे आवाहन केले. त्याला प्रतिसाद देत ग्रुपवरील अनेकांनी आर्थिक मदत केली. या ग्रुपच्यावतीने ‘लोकमत’ शहर कार्यालयात ‘लोकमत’चे वरिष्ठ सरव्यवस्थापक मकरंद देशमुख यांच्या हस्ते गायकवाड कुटुंबीयांना आर्थिक मदत देण्यात आली.

यावेळी मुख्य बातमीदार विश्वास पाटील, ग्रुपचे डॉ. रासकर, राहुल राजशेखर, राजश्री सूर्यवंशी, प्रसाद गवस, मनोज सोरप, विकास कांबळे आदी उपस्थित होते. कोल्हापूरकरांच्या माणुसकीच्या मदतीने गायकवाड कुटुंबीय भारावून तर गेलेच; पण दिवसभर त्यांची विचारपूस करण्यासाठी मोठी गर्दी झाली होती.

माणुसकी मदत केंद्रमंगळवारी झालेल्या कोल्हापुरातील दंगलीमध्ये अनेक कष्टकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. त्यांच्या मदतीसाठी ‘आम्ही कोल्हापुरी’ या सोशल मीडियावरील ग्रुपने पुढाकार घेऊन ‘माणुसकी मदत केंद्र’ सुरू केले आहे.

या ठिकाणी नागरिकांनी नुकसानीचे फोटो आणि अर्ज जमा करायचे आहेत. त्यांना मदत केली जाईल तसेच ज्या दानशूर व्यक्तींना मदत करायची आहे त्यांनी व नुकसान झालेल्या नागरिकांनी मदतीसाठी मुस्लिम बोर्डिंग (दसरा चौक), शिवसेना कार्यालय (शनिवार पेठ), अजिंक्यतारा कार्यालय (ताराबाई पार्क), बजरंग दल शाखा, युनिक मेडिकल (महाद्वार रोड), कोल्हापूर प्रेस क्लब येथे भेट द्यावी, असे आवाहन ग्रुपचे सदस्य हर्षल सुर्वे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे. 

 

टॅग्स :Bhima-koregaonभीमा-कोरेगावkolhapurकोल्हापूर