शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
2
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
3
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
4
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
5
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
6
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
7
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
8
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
9
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
10
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
11
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
12
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
13
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
14
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
15
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
16
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
17
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
18
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

Kolhapur: कृषी अधिकारी अभयकुमार चव्हाण यांना सीईओंची नोटीस, कार्यपद्धतीची रंगली चर्चा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 16, 2024 12:24 IST

सोमवारी दिवसभर कार्यालयात अनुपस्थित

कोल्हापूर : जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी अभयकुमार चव्हाण यांना मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस. आणि अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अजयकुमार माने यांनी शिस्तभंगाची कारवाई का करू नये, अशी नोटीस मंगळवारी बजावली आहे. त्यामुळे चव्हाण यांच्या कार्यपद्धतीविषयी चर्चा सुरू झाली आहे.चव्हाण हे जिल्हा परिषदेत हजर झाल्यापासूनच त्यांच्याबद्दल तक्रारी सुरू झाल्या होत्या. कर्मचाऱ्यांपासून इतरांशीही उर्मटपणे बोलणे, एखादा विषयाची माहिती देण्यास विलंब, प्रमुख अधिकाऱ्यांनी बोलावलेल्या बैठकांना अनुपस्थित राहून प्रतिनिधीला पाठवणे यावरून त्यांच्याविषयीची नाराजी आधीपासूनच व्यक्त होत होती. अजयकुमार माने यांनी अनेकदा बोलावलेल्या बैठकीलाही ते अनुपस्थित राहात होते. याबाबत मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडेही तक्रारी झाल्या होत्या.

अशातच मंगळवारी कृषी समितीची बैठक असल्याने अजयकुमार माने यांनी सोमवारी चव्हाण यांना दालनात येण्यासाठी निरोप दिला. परंतु, दुपारी १२ वाजले तरी ते जिल्हा परिषदेत आले नव्हते. माने यांनी त्यांना फोनही केला. परंतु, सायंकाळी सहापर्यंत चव्हाण जिल्हा परिषदेकडे फिरकलेच नाहीत. अखेर माने यांनी याबाबत कार्तिकेयन एस. यांना माहिती दिल्यानंतर तातडीने मंगळवारी संध्याकाळीच ही नोटीस काढण्यात आली.आठवड्याच्या पहिल्या दिवशी अभ्यागत आणि लोकप्रतिनिधी जिल्हा परिषदेत येत असतात. अशावेळी कार्यालयात उपस्थित राहणे आवश्यक असतानाही अनुपस्थित राहिल्याबद्दल महाराष्ट्र नागरी सेवा, शिस्त व अपील नियम १९८१ नुसार आपल्यावर शिस्तभंगविषयक कारवाई करण्याबाबतचा प्रस्ताव शासनाला का पाठवू नये, अशी विचारणा या नोटीसमध्ये केली असून, दोन दिवसात खुलासा करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

वृत्तपत्रांना पत्रिका देणे जीआरमध्ये नाही१ जुलै रोजी जिल्हा परिषदेत आयोजित कृषी दिनाच्या कार्यक्रमाची निमंत्रण पत्रिका वृत्तपत्रांना का दिली नाही, अशी विचारणा पत्रकारांनी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अजयकुमार माने यांना केली होती. तेव्हा माने यांनी चव्हाण यांना बोलावून घेतले. तेव्हा चव्हाण यांनी वृत्तपत्रांना पत्रिका देण्याबाबत शासन आदेशामध्ये काहीही लिहिले नसल्याने मी पत्रिका दिल्या नाहीत, असे स्पष्टपणे सांगितले. यावर माने यांनी डोक्यावर हात मारून घेतला.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरzpजिल्हा परिषद