शहरं
Join us  
Trending Stories
1
India Into Final : सात वेळच्या चॅम्पियनसमोर ८ वर्षांपूर्वीचा रुबाब! विक्रमी विजयासह टीम इंडियानं गाठली फायनल
2
IND vs AUS : "ना फिफ्टीचं सेलिब्रेशन, ना सेंच्युरीचं! विजयी धाव घेताच जेमिमाला अश्रू अनावर; म्हणाली...
3
सरकार शेतकरी कर्जमाफी कधीपर्यंत करणार? मुख्यमंत्री फडणवीसांनी बैठकीनंतर सांगितला प्लॅन
4
"मुख्यमंत्री करा म्हणून किती लाचारी करायची?"; राज ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना डिवचलं, चढवला हल्ला
5
Jemimah Rodrigues Century : शाब्बास जेमी! घरच्या मैदानात अविस्मरणीय शतकी खेळीसह लुटली मैफील
6
Sangli Crime: ‘व्हाईट हाऊस हॉटेल’च्या बारमध्ये मित्रानेच चिरला गळा, तरुणाचा जागेवरच मृत्यू
7
एकीकडे दिलासा, मात्र दुसरीकडे बच्चू कडू, राजू शेट्टी यांच्यासह हजारो शेतकरी आंदोलकांविरोधात गुन्हा दाखल
8
शेतकऱ्यांच्या कायमस्वरूपी कर्जमुक्तीसाठी उच्चाधिकार समितीची स्थापना; मुख्यमंत्री फडणवीस-बच्चू कडू यांच्या बैठकीत निर्णय
9
‘चाचा पीएमओ है हमारे’, एअरपोर्ट ऑथोरिटीत नोकरी मिळवून देण्याच्या नावाखाली बंटी-बबलीकडून ७ लाखांचा गंडा
10
Phaltan Doctor Update: "हॉटेलमध्ये हातावर सुसाईड नोट दिसली नाही, पोस्टमार्टम रुममध्ये दिसली"; वकिलाने कोर्टासमोर मांडली शंका
11
Maoist Leader: ‘देवजी’च्या महासचिवपदी निवडीचा दावा सपशेल खोटा, आत्मसमर्पण करणाऱ्या 'चंद्राण्णा'वर साधला निशाणा
12
IND vs AUS : ७ वेळच्या वर्ल्ड चॅम्पियनसमोर जेमी-हरमनप्रीतची हवा; दोघींनी मिळून सेट केला नवा विक्रम
13
बिहार निवडणुकीत काँग्रेस-राजदला किती जागा मिळणार?; PM नरेंद्र मोदींची 'भविष्यवाणी'
14
विदर्भाला बसला ‘माेंथा’ चक्रीवादळाचा फटका ! पुढचे तीन दिवस अवकाळीचे संकट ; नोव्हेंबरपर्यंत जोर राहणार कायम?
15
शिवरायांच्या गडकिल्ल्यांवर मोदींच्या नावाने उघडणार 'नमो पर्यटन केंद्र'; राज ठाकरेंचा तीव्र विरोध
16
खासगी क्षणात अडथळा ठरत होती प्रेयसीची चिमुकली! प्रियकरानं उचललं टोकाचं पाऊल? जाणून तुमचाही थरकाप उडेल! 
17
याला म्हणतात शेअरचा धमाका...! गुंतवणूकदारांना केलं मालामाल; १०००० चे फक्त १० महिन्यांत बनवले 5 लाख; अजूनही तेजी कायम
18
महाराष्ट्रातला मोर्चा दणदणीत झाला पाहिजे, राज ठाकरेंचं आवाहन; मतचोरीवरून मेळाव्यात केले सादरीकरण
19
सरन्यायाधीश गवई यांच्यानंतर पुढचे सरन्यायाधीश कोण असतील? सरकारने केली मोठी घोषणा
20
Bihar Election: नितीश कुमारी की, तेजस्वी यादव, बिहारमध्ये कोणाचे सरकार येणार? फलोदी सट्टा बाजाराचा कौल काय?

कोल्हापूर जिल्हा परिषदेतील कोरोना कथित घोटाळ्याची याचिका निकाली, उच्च न्यायालयाचा निर्णय

By समीर देशपांडे | Updated: December 12, 2024 13:42 IST

पोलिस तपासात आढळले नाही तथ्य

समीर देशपांडेकोल्हापूर : कोरोना काळात जिल्हा परिषदेत झालेल्या कोरोना खरेदीतील कथित घोटाळ्याची याचिका उच्च न्यायालयाने निकाली काढली आहे. ४ डिसेंबरला हा निर्णय देण्यात आला. गेली दीड वर्षे याबाबत उच्च न्यायालयात सुनावण्या सुरू होत्या. याचिकादारांच्या तक्रारीच्या गुणवत्तेचा आम्ही यामध्ये विचार केलेला नाही. परंतु याबाबतचा पोलिस अहवाल मिळाल्यानंतर पुन्हा योग्य ठिकाणी दाद मागण्याचा याचिकाकर्त्यांना अधिकार आहे, असेही न्यायाधीशांनी नमूद केले आहे. न्यायाधीश पृथ्वीराज चव्हाण आणि रेवती मोहिते डेरे यांनी हा निर्णय दिला.येथील विश्वजित सचिन जाधव आणि इतरांनी याप्रकरणी गेल्यावर्षी याचिका दाखल केली होती. त्याची गेल्या चार महिन्यांपासून सुनावणी सुरू आहे. २३ ऑक्टोबर रोजीच्या ऑनलाइन सुनावणी वेळी उच्च न्यायालयाने जिल्हाधिकारी अमोल येडगे आणि जिल्हा पोलिसप्रमुख महेंद्र पंडित यांच्याकडून माहिती घेतली होती आणि महिनाभरात तपासाचा अहवाल सादर करण्याचे आदेश दिले होते.

त्यानुसार, पंडित यांनी शाहुपुरी पाेलिस ठाण्याचे सहायक पाेलिस निरीक्षक विशाल मुळे यांच्याकडे तपासाची जबाबदारी साेपविली होती. त्यानंतर, मुळे यांनी शाहुपुरी पोलिस ठाणे आणि जिल्हा परिषदेच्या जुन्या कागलकर वाड्यातून चौकशीला सुरुवात केली आहे. २०२० ते २०२२ या कोरोना काळातील खरेदी, खरेदीची गरज, त्याची निविदा प्रक्रिया, तत्कालीन दर, वस्तूंच्या पुरवठ्यातील नेमकेपणा, बिलाची रक्कम अदा करण्याची प्रक्रिया या सगळ्यांची छाननी करण्यात आली आणि यानंतर बंद लिफाफ्यामध्ये या तपासाचा अहवाल न्यायालयात सादर करण्यात आला.मात्र या याचिकेतील आरोपांमध्ये तथ्य नसल्याचा अहवाल जिल्हा पोलिस प्रमुख महेंद्र पंडित यांनी दिला असल्याचे निकालपत्रात नमूद करण्यात आले आहे. ॲड. जयंत बारदेसकर यांनी याचिकाकर्त्यांच्या वतीने तर ॲड. पी. पी. शिंदे यांनी सरकारी वकील म्हणून काम पाहिले.

अधिकारी, कर्मचाऱ्यांचा सुटकेचा नि:श्वासकोरोना संपला परंतु नंतर त्या काळातील खरेदीची कवित्व अजूनही सुरू आहे. त्या काळच्या खरेदी प्रक्रियेतील एकही अधिकारी सध्या जिल्हा परिषदेत कार्यरत नाही. परंतु नव्याने आलेल्या अधिकाऱ्यांना कोट्यवधी रुपयांच्या खरेदी फाईल्स काढणे, तपासणे आणि त्याचे अहवाल करण्याचे काम करावे लागले. गेली तीन वर्षे अधिकारी, कर्मचारी या छाननी आणि अहवालातच अडकले असून उच्च न्यायालयाच्या निर्णयाने या सर्वांनी सुटकेचा नि:श्वास टाकला आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरzpजिल्हा परिषदcorona virusकोरोना वायरस बातम्याCourtन्यायालयHigh Courtउच्च न्यायालय