शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेचे जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
2
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
3
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
4
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
5
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
6
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
7
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
8
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
9
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
10
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
11
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
12
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
13
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
14
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
15
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
16
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
17
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
18
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
19
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
20
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
Daily Top 2Weekly Top 5

विधानपरिषदेच्या रणांगणात कोल्हापूर ‘प्रभाव’हीन..!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2020 19:42 IST

राज्याने दखल घ्यावी असे नेते कोल्हापूरने जरूर दिले परंतु त्यांचे स्वत:चे सुरक्षित मतदारसंघ होते व आहेत. त्यामुळे त्यांना विधान परिषदेवर जाण्यासाठी फारशी धडपड करावी लागली नाही. कोल्हापुरातून विधानसभेवरून विधान परिषदेच्या जागेवर राष्ट्रवादीकडून ए. वाय. पाटील व भाजपकडून धनंजय महाडिक यांच्या नावांची चर्चा झाली; परंतु राज्यपातळीवर कुठेच त्या-त्या पक्षांच्या निर्णयप्रक्रियेत या नावांचा साधा उल्लेखही झाला नाही.

ठळक मुद्देविधानसभा सदस्यांतून निवड प्रक्रिया : ‘शब्द’ पाळण्याच्या राजकारणामुळे आतापर्यंत फक्त एकदाच संधी

विश्वास पाटील।कोल्हापूर : महाराष्ट्र विधान परिषदेवर आमदारांच्या मतांतून निवडून देण्यात येणाऱ्या जागेवर कोल्हापूर जिल्ह्याला गेल्या साठ वर्षांत फक्त एकदाच संधी मिळाली आहे. माजी आमदार दिनकरराव जाधव हे या जागेवर सन १९८२ ते ८८ पर्यंत प्रतिनिधित्व करत होते. त्यांच्यानंतर मात्र ही संधी कुणाला मिळालेली नाही. राज्याचा राजकारणावर प्रभाव पाडू शकेल असे नेतृत्व उमेदवार म्हणून आग्रही नसल्याने कोल्हापूरला ही संधी मिळालेली नाही.सध्या या निवडणुकीची चर्चा सुरू आहे. ती बिनविरोध होण्याचीच शक्यता आहे.

राज्याने दखल घ्यावी असे नेते कोल्हापूरने जरूर दिले परंतु त्यांचे स्वत:चे सुरक्षित मतदारसंघ होते व आहेत. त्यामुळे त्यांना विधान परिषदेवर जाण्यासाठी फारशी धडपड करावी लागली नाही. कोल्हापुरातून विधानसभेवरून विधान परिषदेच्या जागेवर राष्ट्रवादीकडून ए. वाय. पाटील व भाजपकडून धनंजय महाडिक यांच्या नावांची चर्चा झाली; परंतु राज्यपातळीवर कुठेच त्या-त्या पक्षांच्या निर्णयप्रक्रियेत या नावांचा साधा उल्लेखही झाला नाही. ए. वाय. पाटील यांनी माजी आमदार के. पी. पाटील यांच्यासाठी माघार घेतली असली तरी के. पी. यांचा पराभव ते रोखू शकले नाहीत. दीड तालुकावगळता त्यांचा राजकीय प्रभावही मर्यादित आहे. त्यामुळे जरी पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी ‘शब्द’ दिला असला तरी त्यांना संधी मिळाली नाही. पक्षीय पातळीवर ताकदही पणाला लावली गेली नाही. माजी खासदार महाडिक यांचा भाजपकडून विचार होण्याची शक्यताही नव्हतीच. कारण ते लोकसभेला पराभव झाल्यावर भाजपमध्ये आले आहेत. त्यांना पक्षात संघटनात्मक पद दिले होते. आता कुठे त्यांनी पक्षीय काम सुरू केले आहे.

आतापर्यंत या जागेवर कोल्हापुरातून फक्त दिनकरराव जाधव यांनाच संधी मिळाली आहे. राधानगरी-भुदरगड मतदारसंघातून दिनकरराव जाधव हे सन १९७८ च्या विधानसभा निवडणुकीत विजयी झाले परंतु पुलोदचे सरकार पडल्यावर राज्यात लगेच सन १९८० ला निवडणुका लागल्या. त्यामध्ये काँग्रेसमधील अंतर्गत राजकारणातून दिनकरराव जाधव विद्यमान आमदार असतानाही त्यांना डावलून तिथे हरिभाऊ कडव यांना उमेदवारी मिळाली. दिनकरराव जाधव हे उमद्या मनाचे. ते कडव यांना उमेदवारी जाहीर होताच त्यांच्या घरी गेले. तुमचे माझे राजकारण वितुष्ट असले तरी आपल्या दोघांचा पक्ष एकच आहे व मी तुम्हालाच विजयी करण्यासाठी झगडणार, असा ‘शब्द’ देऊन आले व त्यानुसार ते वागले.

हा त्यांचा प्रामाणिकपणा ज्येष्ठ नेते वसंतदादा पाटील यांनी लक्षात ठेवला. त्यांनी पुढे सन १९८२ ला काँग्रेसकडून जाधव यांना विधानपरिषदेवर संधी दिली. त्यांची उमेदवारी जाहीर झाली तेव्हा दिनकरराव जाधव हे शेतात होते. भुदरगड पोलीस त्यांच्या गावी गेले व वसंतदादांनी तुम्हाला मुंबईला बोलावले आहे, असा निरोप देऊन आले तेव्हा ‘शब्दाच्या राजकारणाला जागणारे नेते’ ते म्हणून हे घडले. आताही सर्व पक्षांचे नेते निवडणुकीत राजकीय अडचण आली की असा ‘शब्द’ देतात, परंतु ते सर्वच ‘शब्द’ पाळायचे झाल्यास विधान परिषद सभागृह किमान तीनशे सदस्यांचे करावे लागेल तसे घडत नाही.

स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघकोल्हापूर स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून आतापर्यंत सदाशिव शिदे, दशरथ कांबळे, बाबूराव धारवाडे, अशोकराव जांभळे, त्यानंतर सलग तीनवेळा महादेवराव महाडिक व त्यांच्यानंतर आता पालकमंत्री सतेज पाटील हे प्रतिनिधित्व करत आहेत.

टॅग्स :Politicsराजकारणkolhapurकोल्हापूरDhananjay Bhimrao Mahadikधनंजय भीमराव महाडिक