शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
2
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
3
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
4
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
5
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
6
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
7
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
8
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
9
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
10
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'
11
आधी विष घेतलं पण वाचला, नंतर सागरने तलावात उडी घेत संपवले आयुष्य; असं काय घडलं? 
12
पाकिस्तानने अफगाणिस्तानातील निवासी भागाला लक्ष्य केले, सहा नागरिकांचा मृत्यू
13
अमेरिकन प्रेस सेक्रेटरीवर फिदा, 'या' देशाच्या पंतप्रधानांची मोठी ऑफर, डोनाल्ड ट्रम्पही हैराण
14
"ही आमच्यासमोरील डोकेदुखी आहे, पण..." ऑस्ट्रेलियात मैदान मारूनही असं का म्हणाला सूर्या?
15
Mumbai Local Mega Block: रविवारी तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक; कधी, कुठे आणि कितीवाजेपर्यंत गाड्या बंद? वाचा
16
"भैया क्या कर रहे हो...!"; बेंगलोरमध्ये Rapido कॅप्टनच्या महिलेसोबतच्या कृत्यावर कंपनीची रिअ‍ॅक्शन
17
बिहारमध्ये रस्त्यावर सापडल्या VVPAT स्लिप्स! निवडणूक आयोगाने ARO ला निलंबित केले, FIR दाखल करण्याचे आदेश दिले
18
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
19
कारमध्ये गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड किस करत असतील तर पोलीस पकडू शकता? काय सांगतो नियम? जाणून घ्या
20
"निवडणुकीत बुडण्याची प्रॅक्टिस...!" राहुल गांधींच्या तलावातील उडीवरून पंतप्रधान मोदींचा टोला; RJD वरही निशाणा, स्पष्टच बोलले

कोल्हापूर : रस्त्यांच्या डांबरीकरणामध्ये प्लास्टिकचा वापर : अमन मित्तल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2018 13:50 IST

कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या रस्ते बांधकामामध्ये यापुढे ८ टक्के प्लास्टिक मटेरियल वापरण्यात येणार असल्याची माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल यांनी दिली. त्याचीच पूर्वतयारी म्हणून कोल्हापूर जिल्ह्यात ज्या ठिकाणी प्लास्टिक मोठ्या प्रमाणावर गोळा होते अशा ठिकाणी प्लास्टिकवर प्रक्रिया करणारे प्रकल्प उभारणार असल्याचे ते म्हणाले.

ठळक मुद्देरस्त्यांच्या डांबरीकरणामध्ये प्लास्टिकचा वापर : अमन मित्तलकोल्हापूर जिल्हा परिषदेतर्फे अंमलबजावणी

कोल्हापूर : जिल्हा परिषदेच्या रस्ते बांधकामामध्ये यापुढे ८ टक्के प्लास्टिक मटेरियल वापरण्यात येणार असल्याची माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल यांनी दिली. त्याचीच पूर्वतयारी म्हणून कोल्हापूर जिल्ह्यात ज्या ठिकाणी प्लास्टिक मोठ्या प्रमाणावर गोळा होते अशा ठिकाणी प्लास्टिकवर प्रक्रिया करणारे प्रकल्प उभारणार असल्याचे ते म्हणाले.पंचगंगा प्रदूषण, स्वनिधीचा वापर आणि अन्य अनुषंगिक बाबींबाबत पत्रकारांशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली. ते म्हणाले, इंडियन रोड काँग्रेसने अशा पद्धतीने रस्ते बांधकामामध्ये प्लास्टिकचा ८ ते १० टक्के वापर करण्याची सूचना केली आहे.

एकीकडे प्लास्टिकवर बंदी येत असताना दुसरीकडे आहे त्या प्लास्टिकचे निर्मूलन हा देखील महत्त्वाचा मुद्दा आहे म्हणूनच ४० लाख रुपये खर्चून अशा पद्धतीने रस्ते बनविण्याचा निर्णय जिल्हा परिषदेने घेतला आहे.यामध्ये प्लास्टिकची पावडर तयार करण्यात येईल. रस्ते खडीकरण झाल्यानंतर त्यावर ही पावडर टाकून डांबरीकरण करण्यात येईल. प्लास्टिक लवकर नष्ट होत नाही. या गुणधर्माचा फायदा होऊन हे रस्ते टिकाऊ होतील. यासाठी यापुढे अशा पद्धतीने रस्ते बांधणी करण्यात येणार आहे.पंचगंगा प्रदूषण मुक्तीसाठी काही कंपन्या आम्हाला मदत करायला तयार आहेत. मात्र, त्याआधी जिल्हा परिषदेने यासाठी काय योगदान दिले, अशी विचारणा होते तेव्हा आम्ही केंद्र, राज्य सरकारकडे प्रस्ताव सादर केल्याचे सांगतो. तो मंजूर झाल्यानंतर आम्ही कार्यवाही करणार असल्याचे सांगतो; परंतु एवढ्या प्रचंड कामासाठी किमान जिल्हा परिषदेने थोडा निधी लावून काम सुरू करावे, या भूमिकेतून स्वनिधीतून निधी लावण्यात आला आहे.मोठे काम पूर्ण करण्यासाठी सुरुवातीला छोटी पावले उचलावी लागतात. त्यामुळेच ज्या ठिकाणी थेट सांडपाणी नदीत मिसळते तेथे बंधारे घालून ते पाणी अडवण्यासाठी प्राधान्य देण्यात येणार आहे, असे अमन मित्तल यांनी सांगितले. 

 

टॅग्स :zpजिल्हा परिषदkolhapurकोल्हापूर