शहरं
Join us  
Trending Stories
1
ते कुणालाच नको होते; एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत संजय राऊत यांचा नवा दावा
2
MS Dhoniचा मैदानाबाहेर मारलेला षटकार ठरला CSKच्या पराभवाचे कारण? RCBला मॅच जिंकण्यासाठी झाली मदत
3
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रतापराव भोसले यांचे निधन
4
४० कोटींची रोकड सापडली, मोजणी अजूनही पूर्ण नाही... बुटांच्या व्यापाऱ्यांची अफाट संपत्ती
5
राष्ट्रवादीकडे त्यावेळी मुख्यमंत्रीपदासाठी योग्य उमेदवार नव्हता; शरद पवारांनी सगळंच सांगितलं
6
मतदानाची टक्केवारी अचानक कशी वाढते? निवडणूक आयोगाने स्पष्ट केली बाजू
7
'छगन भुजबळांना मुख्यमंत्रिपद दिले असते तर पक्ष...'; शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट
8
पतंजलीची सोन पापडी गुणवत्ता चाचणीत फेल, सहाय्यक व्यवस्थापकासह तिघांवर कारवाई
9
आनंदवार्ता : यंदा धो-धो बरसणार; मान्सून आज अंदमानात तर ३१ मे रोजी केरळात धडकणार
10
गॅसच्या टँकरचा भीषण स्फोट, आगीत घरे व वाहने भक्ष्यस्थानी; शेलपिंपळगावातील घटना
11
काश्मीरमध्ये निवडणुकीपूर्वी दुहेरी हल्ला; भाजपच्या माजी सरपंचाची गोळ्या झाडून हत्या
12
दिल्लीत महाभ्रष्टाचाऱ्याला इंडी आघाडीने स्वीकारले; काँग्रेसला ४ जागाही लढवता आल्या नाहीत, मोदींचा हल्लाबोल 
13
आजचे राशीभविष्य - १९ मे २०२४, अचानक धनलाभाची शक्यता,व्यावसायिक क्षेत्रात लाभ होतील
14
'हार मानणार नाही..'; कार्तिक आर्यनच्या 'चंदू चँपियन'चा ट्रेलर, मराठमोळ्या हेमांगी कवीने वेधलं लक्ष
15
मविआ राज्यात ४६ जागा जिंकणार; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी व्यक्त केला विश्वास
16
केजरीवाल यांचे माजी पीए बिभव कुमार अखेर अटकेत; स्वाती सहज बाहेर पडल्या, ‘आप’ने जारी केला व्हिडीओ 
17
'सिंघम 3' च्या सेटवरुन अजय देवगण-जॅकी श्रॉफचा फाईट सीन लीक, व्हिडीओ व्हायरल
18
आता भाजप सक्षम, सगळे निर्णय स्वबळावर; रा.स्व. संघाची मदत घेण्याबाबत जे.पी.नड्डा यांचे मत
19
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
20
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 

कोल्हापूर :‘कोरी पाटी’मधून उलगडणार विद्यापीठ हायस्कूलचे विश्र्व

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 01, 2018 12:01 PM

राजर्षी शाहू महाराजांच्या प्रेरणेने साकारलेल्या भक्तिसेवा विद्यापीठ शाळेचा शंभर वर्षांचा उज्ज्वल इतिहास ‘कोरी पाटी’ या माहितीपटातून उलगडणार आहे.

ठळक मुद्दे‘कोरी पाटी’मधून उलगडणार विद्यापीठ हायस्कूलचे विश्र्वसागर तळाशीकर यांची माहिती : सोमवारी माहितीपटाचे प्रदर्शन

कोल्हापूर : राजर्षी शाहू महाराजांच्या प्रेरणेने साकारलेल्या भक्तिसेवा विद्यापीठ शाळेचा शंभर वर्षांचा उज्ज्वल इतिहास ‘कोरी पाटी’ या माहितीपटातून उलगडणार आहे.

शताब्दी वर्षानिमित्ताने शाळेच्या १९८२-८३ बॅचच्या विद्यार्थ्यांनी या माहिती पटाची निर्मिती केली असून त्याचे प्रदर्शन सोमवारी (दि. ३) होणार आहे, अशी माहिती लेखक, दिग्दर्शक, अभिनेते व माजी विद्यार्थी सागर तळाशीकर व ‘आसमा’चे अध्यक्ष संजय रणदिवे,यांनी दिली.

केशवराव भोसले नाट्यगृहात दुपारी चार वाजता शाहू छत्रपती यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम होणार आहे. यावेळी शाळेच्या माजी वयोवृद्ध शिक्षकांचा विशेष सत्कार करण्यात येणार आहे.तळाशीकर म्हणाले,‘ राजर्षी शाहू महाराजांनी तोफखाने गुरुजी आणि दीक्षित गुरुजी यांच्याकडे शाळेची जबाबदारी सोपविली होती. शिक्षणासोबत अनौपचारिक गोष्टींमधून जगणं शिकविण्याची शिक्षणपद्धती ही विद्यापीठ हायस्कूलची ओळख आहे.

स्वातंत्र्यपूर्व काळात या शाळेच्या चौकात स्वातंत्र्यसंग्रामाची भाषणे घुमली आहेत. कस्तुरबा गांधींनी येथे १९२५ साली महिलांची सभा घेऊन मुलांना शाळेत पाठविण्याबाबत जागृती केली. मुलांसोबत मुलींना पोहण्याचे प्रशिक्षण देणे, महात्मा गांधीजींच्या हस्ते चरखा आश्रम, मुलांना औद्योगिक प्रशिक्षण, सहशिक्षण, बालविवाह रोखण्यासाठी मुलांना २१ वर्षापर्यंत ब्रह्मचर्याची शपथ देणे, स्वातंत्र्यसंग्रामातील लढवय्यांसोबत विद्यार्थ्यांना संवाद साधता यावा यासाठी तपोवनच्या माळावर कार्यक्रम घेणे, पर्यावरणाचे महत्त्व जाणून प्रत्येकाने एक रोप लावण्याचा नियम अशा अनेक क्रांतिकारी व पुरोगामी विचारांची बीजे येथे रोवली गेली.

साथीच्या रोगात शाहू महाराजांनी पुरविलेली औषधे गावागावांत पोहोचविण्यासाठी शाळेतील विद्यार्थ्यांनी सारा जिल्हा पिंजून काढला होता. विद्यापीठ हायस्कूलचा हा इतिहास नव्या पिढीपुढे यावा यासाठी १९८२-८३ च्या बॅचमधील कलासक्त विद्यार्थ्यांनी एकत्र येत माहितीपट बनवण्याची संकल्पना मांडली. त्यावर गेल्या दोन वर्षांपासून काम सुरू होते.

या माहितीपटासाठी जुने दस्तऐवज, फोटो संकलित करून त्यातून संहिता लिहिण्यात आली. तसेच शाळेतील जुने शिक्षक, पदाधिकारी यांच्याशी संवाद साधण्यात आला. जवळपास ४७ तासांच्या चित्रीकरणातून ७५ मिनिटांचा हा माहितीपट बनला आहे.

यासाठी संशोधन, लेखन, दिग्दर्शन यांची जबाबदारी सागर तळाशीकर यांनी पेलली आहे; तर माजी विद्यार्थी हरीश कुलकर्णी यांनी कॅमेरा; शेखर गुरव यांनी संकलन, ऐश्वर्य मालगावे यांनी संगीत, गायत्री पंडितराव यांनी संगीत संयोजन, सचिन जगताप यांनी बासरीवादन, केदार गुळवणी यांनी व्हायोलिनवादन, देवी लव्हेकर यांनी गायन; तर आदिती कुलकर्णी यांनी चित्ररेखाटन ही जबाबदारी पार पाडली आहे.